शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

नेते घरात, धरणग्रस्त मात्र ऊन्हात

By admin | Updated: May 12, 2015 23:41 IST

वयोवृद्ध आंदोलकांचे सुरू आहेत हाल : कुडकुडत काढली शनिवारची संपूर्ण रात्र

सातारा : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसन संदर्भातील मागण्यांसाठी जिल्ह्यातील धरणग्रस्तांनी ६ एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. रविवारी आंदोलनाच्या ३५ व्या दिवसांपर्यंत शासनाकडून कोणताही ठोस निर्णय झाला नाही. वयोवृद्ध धरणग्रस्तांचे आंदोलनस्थळी प्रचंड हाल सुरू आहेत. अंगाची लाहीलाही करणारे ऊन, तर अधूनमधून विजेच्या कडकडाटासह येणारा जीवघेणा पाऊस धरणग्रस्तांना मरणाच्या दारात उभा करीत आहे. शासनकर्ते मंत्रालयात, धरणग्रस्तांचे नेते घरात, तर बिचारे धरणग्रस्त मात्र आंदोलनस्थळी ऊन-पावसात रात्री जागून काढीत आहेत.राज्यातील सुमारे ११ तालुक्यांमधील धरणग्रस्तांचे विविध ठिकाणी गेल्या ३५ दिवसांपासून आंदोलन सुरू आहेत. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयापुढेही जिल्ह्यातील सुमारे ६० ते ७० धरणग्रस्त श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलनासाठी बसले असून, त्यात वयोवृद्ध, पुरुष व महिलांचा समावेश आहे. पुनर्वसनासंदर्भातील दीर्घ काळापासूनच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे आंदोलन सुरू असून, शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नाही. मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक लावण्याचे आश्वासन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी धरणग्रस्तांच्या शिष्टमंडळाला दिले होते. राज्यात इतर ठिकाणी सुद्धा याचप्रकारे युती शासनातील मंत्र्यांनी बैठकीचे आश्वासन दिले. मात्र, आजअखेर मुख्यमंत्र्यासमवेत बैठक झाली नाही. वेळोवेळी पाठपुरावा करूनही धरणग्रस्तांच्या अनेक मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहेत. त्यामुळे धरणग्रस्तांपुढे आंदोलनांशिवाय दूसरा पर्याय ऊरलेला नाही. धरणग्रस्तांच्या प्रश्नाकडे शासन कानाडोळा करीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून केला जात असला तरी शासनकर्त्यांवर त्याचा काहीही व कोणताही परिणाम होताना सध्यातरी दिसत नाही. (प्रतिनिधी)धरणग्रस्तांना किती दिवस वेठीस धरणार?धरणग्रस्तांच्या हितासाठीच हे आंदोलन सुरु असले तरी वयोवृद्ध धरणग्रस्तांना किती दिवस वेठीस धरणार असा सवाल जनतेतून उपस्थित होऊ लागला आहे. शनिवारी सायंकाळी वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने पोटात भीतीचा गोळा यावा, अशी भयानक परिस्थिती निर्माण केली होती.केवळ रस्त्यावर अडकलेल्यांच्याच नव्हे तर घरात असणाऱ्या नागरिकांच्याही अंगावर काटा उभा राहिला होता. अशा परिस्थितीत धरणग्रस्त मात्र आंदोलनस्थळी बसून होते. मध्यरात्रीपर्यंत विजेचे लोळ, आकाशात दिसत होते. पाऊस सुद्धा सुरू होता. अशा भीतीदायक वातावरणात धरणग्रस्तांनी आंदोलनस्थळी कुडकुडत रात्र काढली. ज्यांनी न्याय द्यायचा ती राज्यकर्ती मंडळी मंत्रालयात किंवा त्यांच्या अलिशान निवासस्थानी बसून असतील. धरणग्रस्तांचे नेते सुद्धा त्यांच्या घरात बसून राहतात.धरणग्रस्तांसमवेत त्यांनी एखादी रात्र, आंदोलनस्थळी बसून कधीही काढल्याचे ऐकीवात नाही. धरणग्रस्तांना मात्र ऊन-पावसात जीव मुठीत घेऊन आंदोलनस्थळी दिवस ढकलावे लागत आहे.ं