शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

मुंबईत बसेना मेळ, साताऱ्यात घालमेल!

By admin | Updated: September 22, 2014 22:04 IST

महायुतीत अस्वस्थता : माण-खटाव, फलटण मतदारसंघांनी वाढविलाय तिढा

सागर गुजर - सातारा  -महायुतीमधील जागावाटपांचा घोळ अजून कायम आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या महायुतीच्या संभाव्य उमेदवारांची भलतीच घालमेल सुरु आहे. तिकीट मिळेल या अपेक्षेने पक्षात शिरकाव करणाऱ्या पक्षाबाहेरील इच्छुकांची भीती आधीच होती. आता महायुतीतील जागावाटपाचा तिढा अधिकच ताणला गेल्याने मतदारसंघच हातातून निसटतोय काय, या धास्तीने विशेषत: शिवसेना व भाजपच्या जिल्ह्यातील इच्छुकांची झोप उडाली आहे.भाजप व शिवसेनेच्या युतीमधील पूर्वीच्या करारानुसार सातारा, कऱ्हाड दक्षिण व माण-खटाव मतदारसंघ भाजपकडे तर फलटण, वाई, पाटण, कऱ्हाड उत्तर, कोरेगाव हे मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीवेळी खासदार रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष, महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष व खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी पक्ष यांना सोबत घेऊन महायुती निर्माण झाली. फलटण व कऱ्हाड उत्तर मतदारसंघावर ‘स्वाभिमानी’ने तर माण-खटाववर राष्ट्रीय समाज पक्षाने दावा सांगितला आहे. या तीनही मतदारसंघांत भाजप व शिवसेनेला घटकपक्षांच्या बाजूने कौल द्यावा लागणार आहे, अशी परिस्थिती आहे. माण-खटाव हातून गेल्यास वाई किंवा कोरेगाव मागून घ्यायचा, अशा हालचाली भाजपमध्ये सुरु आहेत. वाईतून पुरुषोत्तम जाधव किंवा माजी आमदार मदन भोसले यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली आहेत. असे झाले तर नुकतेच शिवसेनेत गेलेले महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. जर कोरेगाव मिळाला तर माजी आमदार कांताताई नलावडे किंवा महेश शिंदे यांना पालकमंत्र्यांविरोधात उभे करण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरु आहेत. मात्र, राजकीय घडामोडीत शिवसेनेचे इच्छुक असणारे दिनेश बर्गे, दत्ताजी बर्गे, हणमंत चवरे यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.माण-खटाव रासपला गेल्यास भाजपचे डॉ. दिलीप येळगावकर, ओबीसी विभागाचे राज्य सरचिटणीस धनंजय ओंबासे, जिल्हासरचिटणीस बाळासाहेब खाडे, बाळासाहेब मासाळ, डॉ. महादेव कापसे या इच्छुकांना केवळ ‘मम’ म्हणण्याची वेळ येणार आहे. येथून अपक्ष उमेदवारी जाहीर केलेले शेखर गोरे यांनी सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. साताऱ्यातून दत्ताजी थोरात, सुवर्णा पाटील, रवींद्र पवार यांच्या हालचाली वेगवान आहेत. माजी आमदार सदाशिव सपकाळ यांच्या पक्षप्रवेशामुळे या इच्छुकांची घालमेल वाढली आहे. वाई किंवा कोरेगावच्या बदल्यात हा मतदारसंघाला शिवसेनेला मिळाला तरी पक्षातील पाखरे आधीच उडून गेले असल्याने या ठिकाणी सेनेला उमेदवाराची शोधाशोध करावी लागणार आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष दीपक पवार भाजपची उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षेत आहेत; मात्र ती मिळाली नाही तरी लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केल्याने सातारा-जावळीचे वातावरण भलतेच तापले आहे.‘आयारामांना विरोध’ हाच भाजपचा अजेंडाविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षेने भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका जिल्ह्यातील भाजप निष्ठावंतांनी घेतली आहे. मात्र, भाजपच नव्हे, तर शिवसेनेतही ‘आयात’ उमेदवार अनेक ठिकाणी गर्दी झाली आहे. भाजपमधून राष्ट्रवादी आणि पुन्हा भाजप असा प्रवास करणाऱ्या डॉ. दिलीप येळगावकरांनाही अनेकांनी विरोध केला होता. तथापि, ‘निवडून येण्याची क्षमता’ हा निकष लावल्यास अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांतील निष्ठावंतांवर नाराज होण्याची वेळ येऊ शकते.