शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

मुंबईत बसेना मेळ, साताऱ्यात घालमेल!

By admin | Updated: September 22, 2014 22:04 IST

महायुतीत अस्वस्थता : माण-खटाव, फलटण मतदारसंघांनी वाढविलाय तिढा

सागर गुजर - सातारा  -महायुतीमधील जागावाटपांचा घोळ अजून कायम आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या महायुतीच्या संभाव्य उमेदवारांची भलतीच घालमेल सुरु आहे. तिकीट मिळेल या अपेक्षेने पक्षात शिरकाव करणाऱ्या पक्षाबाहेरील इच्छुकांची भीती आधीच होती. आता महायुतीतील जागावाटपाचा तिढा अधिकच ताणला गेल्याने मतदारसंघच हातातून निसटतोय काय, या धास्तीने विशेषत: शिवसेना व भाजपच्या जिल्ह्यातील इच्छुकांची झोप उडाली आहे.भाजप व शिवसेनेच्या युतीमधील पूर्वीच्या करारानुसार सातारा, कऱ्हाड दक्षिण व माण-खटाव मतदारसंघ भाजपकडे तर फलटण, वाई, पाटण, कऱ्हाड उत्तर, कोरेगाव हे मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीवेळी खासदार रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष, महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष व खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी पक्ष यांना सोबत घेऊन महायुती निर्माण झाली. फलटण व कऱ्हाड उत्तर मतदारसंघावर ‘स्वाभिमानी’ने तर माण-खटाववर राष्ट्रीय समाज पक्षाने दावा सांगितला आहे. या तीनही मतदारसंघांत भाजप व शिवसेनेला घटकपक्षांच्या बाजूने कौल द्यावा लागणार आहे, अशी परिस्थिती आहे. माण-खटाव हातून गेल्यास वाई किंवा कोरेगाव मागून घ्यायचा, अशा हालचाली भाजपमध्ये सुरु आहेत. वाईतून पुरुषोत्तम जाधव किंवा माजी आमदार मदन भोसले यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली आहेत. असे झाले तर नुकतेच शिवसेनेत गेलेले महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. जर कोरेगाव मिळाला तर माजी आमदार कांताताई नलावडे किंवा महेश शिंदे यांना पालकमंत्र्यांविरोधात उभे करण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरु आहेत. मात्र, राजकीय घडामोडीत शिवसेनेचे इच्छुक असणारे दिनेश बर्गे, दत्ताजी बर्गे, हणमंत चवरे यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.माण-खटाव रासपला गेल्यास भाजपचे डॉ. दिलीप येळगावकर, ओबीसी विभागाचे राज्य सरचिटणीस धनंजय ओंबासे, जिल्हासरचिटणीस बाळासाहेब खाडे, बाळासाहेब मासाळ, डॉ. महादेव कापसे या इच्छुकांना केवळ ‘मम’ म्हणण्याची वेळ येणार आहे. येथून अपक्ष उमेदवारी जाहीर केलेले शेखर गोरे यांनी सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. साताऱ्यातून दत्ताजी थोरात, सुवर्णा पाटील, रवींद्र पवार यांच्या हालचाली वेगवान आहेत. माजी आमदार सदाशिव सपकाळ यांच्या पक्षप्रवेशामुळे या इच्छुकांची घालमेल वाढली आहे. वाई किंवा कोरेगावच्या बदल्यात हा मतदारसंघाला शिवसेनेला मिळाला तरी पक्षातील पाखरे आधीच उडून गेले असल्याने या ठिकाणी सेनेला उमेदवाराची शोधाशोध करावी लागणार आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष दीपक पवार भाजपची उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षेत आहेत; मात्र ती मिळाली नाही तरी लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केल्याने सातारा-जावळीचे वातावरण भलतेच तापले आहे.‘आयारामांना विरोध’ हाच भाजपचा अजेंडाविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षेने भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका जिल्ह्यातील भाजप निष्ठावंतांनी घेतली आहे. मात्र, भाजपच नव्हे, तर शिवसेनेतही ‘आयात’ उमेदवार अनेक ठिकाणी गर्दी झाली आहे. भाजपमधून राष्ट्रवादी आणि पुन्हा भाजप असा प्रवास करणाऱ्या डॉ. दिलीप येळगावकरांनाही अनेकांनी विरोध केला होता. तथापि, ‘निवडून येण्याची क्षमता’ हा निकष लावल्यास अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांतील निष्ठावंतांवर नाराज होण्याची वेळ येऊ शकते.