शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

जीवा-शिवाची बैलजोडं.. आता झुरत्यात दावणीपुढं!

By admin | Updated: April 22, 2015 00:29 IST

शर्यत बंदीचा परिणाम : पशुधन पोसताना बैल मालकांच्या तोंडचं पाणी पळालं

नीलेश भोसले - सायगाव  : काळा कुळकुळीत रंग, दगडी मस्तक, घागरीएवढं वशींड, नुसता फुरफुरला तरी रस्त्यावरचा धुरया उडवणारा ‘खिलार’ जातीचा ‘शिवराज.’ तीन जिल्हे आणि तेरा तालुक्यांमधून तब्बल दिडशेपेक्षा जास्त मैदानं मारलेला ‘शिवराज’ बैल आज दावणीवर टाचा घासत उभा आहे. बैलगाड्या शर्यतीवर बंदी घातलेल्याला जवळपास एक वर्ष उलटत आलं तरी बंदी उठवण्याची काहीही चिन्हं दिसत नसल्यामुळं लाखमोलाचं पशुधन पोसता पोसता बैल मालकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, महामुलकरवाडी, ता. जावली येथील शेतकरी शरद राजाराम महामुलकर यांनी दीड ते दोन वर्षांपूर्वी उंब्रज येथून तीन लाख रुपये किमतीचा खिलार जातीचा बैल घेतला होता. केवळ छंदापोटी घेतलेला हा बैल विविध स्पर्धांमधून बक्षिसे मिळवत होता; परंतु वर्षभरातच बैलगाड्या शर्यतीवर बंदी आल्याने हे लाखमोलाचं पशुधन फक्त पोसण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय उरला नाही. महिन्याकाठी एका बैलाचा दहा ते बारा हजार रुपये खर्च होत असल्याने आणि आज ना उद्या शर्यतीवरील बंदी उठेल, या आशेपोटी ही जीवापाड जपलेली जनावरे कर्ज काढून जगवण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. ही व्यथा कुणा एका ‘शिवराज’ बैलाची किंवा शरद महामुलकरांची नाही. ही व्यथा शर्यतबंदीचा फटका बसलेल्या हजारो बैलमालकांची आहे. जे सरकारने घातलेली बंदी उठण्याकडे डोळे लावून बसले आहेत. वास्तविक पाहता शर्यतीतून फारशी आर्थिक मियकत होत नाही. वाहतूक खर्च, जॅकीचे मानधन जाता फार कमी रक्कम हातात मिळते. हा धोका पत्करून केवळ छंदापोटी आणि शर्यतीची परंपरा टिकवण्यासाठी बैल पाळले जातात.शर्यत बंदीमुळे खेडोपाड्यातील जत्रा आणि त्यावर बेतलेली आर्थिक गणितं कोलमडून पडली. यांत्रिकीकरणामुळं कमी होणारं पशुधन भविष्यात खिलार गायी नामशेष करेल. हे पशुधन वाचायचं असेल तर शर्यतीवरील बंदी उठवणं अगत्याचं आहे, असं जाणकार सांगत आहेत. एका बैलापाठीमागं महिन्याकाठी होणारा खुराकाचा खर्चखपरी पेंड १ पोतं, गहू भुस्सा १ पोतं, मका चुणी १ पोतं, ओला आणि सुका चारा अंदाजे १०० पेंडी, सर्व मिळून सरासरी १० ते १२ हजार खर्च, याव्यतिरिक्त औषधपाणी, वाहतूक खर्च.अश्ी राखली जाते बैलांची निगा दररोज नित्यनियमाने मालीश, दोन दिवसातून एकदा अंघोळ, शिंग, खूर, डोळ्यांची विशेष निगा, पंधरा दिवसांतून एकदा पाय मोकळ करण्यासाठी फेरफटका. हा छंद जीवाला लावी पिसे..!शर्यतीवरच्या प्रेमापोटी घेतलेला ‘शिवराज’ आज आमच्या कुटुंबाचा सदस्य झाला आहे. नुकताच त्याचा आम्ही धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केला. त्यासाठी केकही आणला होता. आज सरकार जनावरांचे हाल होवू नये म्हणून शर्यतीवर बंदी आणत आहे. स्वत:च्या मुलासारखा ज्या जनावरांचा सांभाळ केला, त्याला कुठलाही जातीवंत मालक स्वप्नातसुध्दा त्रास देणार नाही. आज चौखुर उधाळणारं जनावर असं दावणीला उभं बघून काळीज तीळ तीळ तुटतंय..! - शरद महामुलकर (बैलमालक)