शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

पोलिसांना गस्तीची माहिती देणे सक्तीचे

By admin | Updated: August 6, 2015 00:47 IST

सुनील फुलारी : माहिती न देणाऱ्यांवर कारवाई; अफवा पसरविणाऱ्यांचाही समाचार घेणार

सांगली : रात्रीची गस्त घालताना त्याबाबतची आगाऊ माहिती संबंधित पोलीस ठाण्यांना द्यावी, अन्यथा हत्यारासह फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक सुनील फुलारी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. ते म्हणाले की, गेल्या महिन्याभरापासून महामार्ग, वाळवा, सांगली, मिरज व इतर ग्रामीण भागात चोरांच्या परप्रांतीयांच्या टोळ्या कार्यरत असल्याच्या अफवा जोरदार पसरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी व युवकांनी स्वत:हून रात्रगस्त सुुरू केली आहे. गस्त घालीत असताना युवकांमधील काहीजणांनी स्वत:च वाटमाऱ्या करून चोऱ्या केल्याचे व हुल्लडबाजी करून निरपराध नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. मारहाण करणे, घरावर दगडफेक करणे आदी प्रकार उघडकीस आले आहेत. अशा उपद्रवी लोकांवर इस्लामपूर, विश्रामबाग, सांगली ग्रामीण व आष्टा पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित गावातील लोकांनी, युवकांनी गस्त घालत असताना त्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात याची आगाऊ माहिती देणे आवश्यक आहे. हुल्लडबाजी न करता अफवा न पसरवता गस्त घालावी, यासाठी पोलिसांचीही मदत घेण्यात यावी. रात्री गस्त घालण्यासाठी आता राज्य राखीव दलाची तुकडीही तैनात करण्यात आलेली आहे. यावर पोलीस निरीक्षक, विभागीय पोलीस अधिकारी यावर देखरेख करणार आहेत. सोशल मीडियावरून अफवा पसरवल्या जात असूून, याबाबतही सर्वांनी दक्षता घ्यावी. यासंदर्भात अनेकांना नोटिसाही पाठविण्यात आल्या आहेत. यापुढेही सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. ज्यांना गस्त घालायची आहे, त्यांनी आपली नावे पोलीस ठाण्याला द्यावीत. त्यामधील काहीजणांची ग्राम सुरक्षा दलामध्ये नियुक्ती करण्यात येईल. त्यांच्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपाधीक्षक प्रकाश गायकवाड, बजरंग बनसोडे यांनी दिली. (प्रतिनिधी) आता लाचखोरांच्या साहेबांचीही चौकशी! यापुढे पोलीस ठाणे अथवा शाखेतील कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्याविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई झाल्यास संबंधित विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्यास जबाबदार धरुन कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक सुनील फुलारी यांनी दिली. अर्थात तत्पूर्वी याची सखोल चौकशी करण्यात येईल, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्याच्या अधिन राहूनच कनिष्ठ अधिकारी कर्मचारी काम करीत असतात. त्यांच्याकडे प्रलंतबत असणारे अर्ज, तपासावरील गुन्हे, इतर प्रकरणे यांची नियमित दफ्तर तपासणी वरिष्ठ घेत नाहीत. कर्मचाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करीत नाहीत. नेमून दिलेले काम कनिष्ठ कर्मचारी करतात की नाही, याची खातरजमाही अधिकारी करतान दिसत नाहीत. त्यामुळे कर्मचारी लाचखोरीस प्रवृत्त होतात व त्यांना यासाठी वाव मिळतो. यामुळे पोलीस दलाची बदनामी होऊन पोलिसांकडे पाहण्याचा संशय बळावतो. हे टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी कनिष्ठांवर देखरेख ठेवली पाहिजे. यामध्ये त्यांचीही जबाबदारी असते. यापुढे कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी लाचखोरीमध्ये सापडल्यास संबंधितांच्या प्रभारी अधिकाऱ्याला जबाबदार धरुन त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. तत्पूर्वी प्रभारींच्या भूमिकेचीही चौकशी करण्यात येईल.