शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

पोलिसांना गस्तीची माहिती देणे सक्तीचे

By admin | Updated: August 6, 2015 00:47 IST

सुनील फुलारी : माहिती न देणाऱ्यांवर कारवाई; अफवा पसरविणाऱ्यांचाही समाचार घेणार

सांगली : रात्रीची गस्त घालताना त्याबाबतची आगाऊ माहिती संबंधित पोलीस ठाण्यांना द्यावी, अन्यथा हत्यारासह फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक सुनील फुलारी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. ते म्हणाले की, गेल्या महिन्याभरापासून महामार्ग, वाळवा, सांगली, मिरज व इतर ग्रामीण भागात चोरांच्या परप्रांतीयांच्या टोळ्या कार्यरत असल्याच्या अफवा जोरदार पसरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी व युवकांनी स्वत:हून रात्रगस्त सुुरू केली आहे. गस्त घालीत असताना युवकांमधील काहीजणांनी स्वत:च वाटमाऱ्या करून चोऱ्या केल्याचे व हुल्लडबाजी करून निरपराध नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. मारहाण करणे, घरावर दगडफेक करणे आदी प्रकार उघडकीस आले आहेत. अशा उपद्रवी लोकांवर इस्लामपूर, विश्रामबाग, सांगली ग्रामीण व आष्टा पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित गावातील लोकांनी, युवकांनी गस्त घालत असताना त्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात याची आगाऊ माहिती देणे आवश्यक आहे. हुल्लडबाजी न करता अफवा न पसरवता गस्त घालावी, यासाठी पोलिसांचीही मदत घेण्यात यावी. रात्री गस्त घालण्यासाठी आता राज्य राखीव दलाची तुकडीही तैनात करण्यात आलेली आहे. यावर पोलीस निरीक्षक, विभागीय पोलीस अधिकारी यावर देखरेख करणार आहेत. सोशल मीडियावरून अफवा पसरवल्या जात असूून, याबाबतही सर्वांनी दक्षता घ्यावी. यासंदर्भात अनेकांना नोटिसाही पाठविण्यात आल्या आहेत. यापुढेही सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. ज्यांना गस्त घालायची आहे, त्यांनी आपली नावे पोलीस ठाण्याला द्यावीत. त्यामधील काहीजणांची ग्राम सुरक्षा दलामध्ये नियुक्ती करण्यात येईल. त्यांच्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपाधीक्षक प्रकाश गायकवाड, बजरंग बनसोडे यांनी दिली. (प्रतिनिधी) आता लाचखोरांच्या साहेबांचीही चौकशी! यापुढे पोलीस ठाणे अथवा शाखेतील कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्याविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई झाल्यास संबंधित विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्यास जबाबदार धरुन कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक सुनील फुलारी यांनी दिली. अर्थात तत्पूर्वी याची सखोल चौकशी करण्यात येईल, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्याच्या अधिन राहूनच कनिष्ठ अधिकारी कर्मचारी काम करीत असतात. त्यांच्याकडे प्रलंतबत असणारे अर्ज, तपासावरील गुन्हे, इतर प्रकरणे यांची नियमित दफ्तर तपासणी वरिष्ठ घेत नाहीत. कर्मचाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करीत नाहीत. नेमून दिलेले काम कनिष्ठ कर्मचारी करतात की नाही, याची खातरजमाही अधिकारी करतान दिसत नाहीत. त्यामुळे कर्मचारी लाचखोरीस प्रवृत्त होतात व त्यांना यासाठी वाव मिळतो. यामुळे पोलीस दलाची बदनामी होऊन पोलिसांकडे पाहण्याचा संशय बळावतो. हे टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी कनिष्ठांवर देखरेख ठेवली पाहिजे. यामध्ये त्यांचीही जबाबदारी असते. यापुढे कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी लाचखोरीमध्ये सापडल्यास संबंधितांच्या प्रभारी अधिकाऱ्याला जबाबदार धरुन त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. तत्पूर्वी प्रभारींच्या भूमिकेचीही चौकशी करण्यात येईल.