शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वीस गुंठ्यातील ढोबळीतून सहा लाख रुपयांचे उत्पन्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : बाजारपेठेचा अभ्यास करुन शेती केली तर फायद्याचीच ठरते हे सिध्द केलंय ते वाई तालुक्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : बाजारपेठेचा अभ्यास करुन शेती केली तर फायद्याचीच ठरते हे सिध्द केलंय ते वाई तालुक्यातील भुईंजच्या रमेश ससाणे या शेतकऱ्याने. अवघ्या २० गुंठे क्षेत्रातील शेडनेटमधील रंगीत ढोबळी मिरचीतून त्यांनी दोन लाख मिळविले असून आणखी चार लाख मिळण्याचा अंदाज आहे. तर ते इतर पिकेही अभ्यास करुनच घेतात. त्यामुळे तोट्याचे गणित शक्यतो त्यांच्या वाट्यालाच नाही.

शेती व्यवसाय हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. हे कोरोना महामारीच्या काळात पुन्हा सिद्ध झाले आहे. कारण, सर्व देश लॉकडाऊन होता. रस्ते थांबले होते. सगळी चाकं जाम होती. पण, शेतकरी पोशिंद्याच्या भूमिकेत होता. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याने तर या कोरोना काळात उत्तम नियोजन करुन प्रत्येकाच्या घरात भाजी जाईल हे पाहिले. त्याला सातारा जिल्हाही अपवाद नव्हता.

सातारा जिल्ह्यातील भाजीपाला अगदी मुंबई, पुणे, कोकणातही जातो. आता तर राज्य शासनाच्या ‘विकेल ते पिकेल’ या योजनेंतर्गत शेतकरी आणि ग्राहक एकत्र येत आहेत. अशाचप्रकारे भुईंज येथील विविध प्रयोग करणारे शेतकरी रमेश बळवंत ससाणे. त्यांच्या संयुक्त कुटुंबाची एकूण ३० एकर शेती आहे. या शेतीमध्ये ते ऊस, आले, हळद अशी पिके घेतात. त्याचबरोबर २० गुंठ्यांची प्रत्येकी दोन शेडनेट आहेत. यातील एका शेडमध्ये काकडी होती. ऐन लॉकडाऊनमध्येच ही काकडी तोडणीस आली. त्यामुळे दराचा फटका बसला. पण, तरीही सरासरी १५ रुपये किलो दर मिळाल्याने साडेचार लाखांचे उत्पन्न मिळाले. तर २ लाख खर्च आलेला. लॉकडाऊन नसता तर उत्पन्नाचे गणित आणखी वाढले असते.

दुसऱ्या २० गुंठ्याच्या शेडनेटमध्ये ढोबळी मिरची आहे. यामधून आतापर्यंत ६ टन उत्पन्न मिळाले आहे. तर आणखी १० टन उत्पन्नाचा अंदाज आहे. त्यातच ही रंगीत मिरची असल्याने दर अधिक मिळतोय. सुरूवातीला ४० रुपयांपर्यंत दर मिळाला. पण, आता मुंबईच्या मार्केटमध्ये या ढोबळी मिरचीला ७० ते ८० रुपये दर मिळू लागलाय. ३ ते ४ दिवसांतून मिरचीची तोड करुन ती मुंबईच्या मार्केटला पाठविण्यात येते. आतापर्यंत २ लाख रुपये मिळाले असून आणखी ४ लाख रुपये अपेक्षित आहेत. कमी क्षेत्रातील ही लाखोंची उड्डाणे मार्गदर्शकच आहेत.

चौकट :

कृषी विभागाचेही मार्गदर्शन...

बाजारपेठेचा अभ्यास आणि कृषी विभागाचे मार्गदर्शन घेतले तर

कमी क्षेत्रातही अधिक उत्पन्न मिळू शकते. हे सातारा जिल्ह्यातील अनेकांनी सिध्द करुन दाखवले आहे. यामधील रमेश ससाणे हे शेतकरी आहेत. त्यांनी ऊस, हळद, आले अशा पिकांतूनही भरघोस उत्पन्न घेतलेले आहे.

कोट :

शेतकऱ्यांनी आधुनिक पध्दतीने व तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती केली तर निश्चितपणे चांगलं उत्पन्न मिळू शकतं. तसेच सतत बाजारपेठेचा अभ्यास करावा. यामुळे कोणते पीक घ्यावं ते समजतं. हे गणित जुळून आलं तर शेती उत्पन्नातून लाखो रुपयेही कमवता येतात. त्यामुळे शेती तोट्याची कधीच होत नाही.

- रमेश ससाणे, शेतकरी भुईंज

फोटो दि.०५सातारा अ‍ॅग्री फोटो...