शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वीस गुंठ्यातील ढोबळीतून सहा लाख रुपयांचे उत्पन्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : बाजारपेठेचा अभ्यास करुन शेती केली तर फायद्याचीच ठरते हे सिध्द केलंय ते वाई तालुक्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : बाजारपेठेचा अभ्यास करुन शेती केली तर फायद्याचीच ठरते हे सिध्द केलंय ते वाई तालुक्यातील भुईंजच्या रमेश ससाणे या शेतकऱ्याने. अवघ्या २० गुंठे क्षेत्रातील शेडनेटमधील रंगीत ढोबळी मिरचीतून त्यांनी दोन लाख मिळविले असून आणखी चार लाख मिळण्याचा अंदाज आहे. तर ते इतर पिकेही अभ्यास करुनच घेतात. त्यामुळे तोट्याचे गणित शक्यतो त्यांच्या वाट्यालाच नाही.

शेती व्यवसाय हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. हे कोरोना महामारीच्या काळात पुन्हा सिद्ध झाले आहे. कारण, सर्व देश लॉकडाऊन होता. रस्ते थांबले होते. सगळी चाकं जाम होती. पण, शेतकरी पोशिंद्याच्या भूमिकेत होता. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याने तर या कोरोना काळात उत्तम नियोजन करुन प्रत्येकाच्या घरात भाजी जाईल हे पाहिले. त्याला सातारा जिल्हाही अपवाद नव्हता.

सातारा जिल्ह्यातील भाजीपाला अगदी मुंबई, पुणे, कोकणातही जातो. आता तर राज्य शासनाच्या ‘विकेल ते पिकेल’ या योजनेंतर्गत शेतकरी आणि ग्राहक एकत्र येत आहेत. अशाचप्रकारे भुईंज येथील विविध प्रयोग करणारे शेतकरी रमेश बळवंत ससाणे. त्यांच्या संयुक्त कुटुंबाची एकूण ३० एकर शेती आहे. या शेतीमध्ये ते ऊस, आले, हळद अशी पिके घेतात. त्याचबरोबर २० गुंठ्यांची प्रत्येकी दोन शेडनेट आहेत. यातील एका शेडमध्ये काकडी होती. ऐन लॉकडाऊनमध्येच ही काकडी तोडणीस आली. त्यामुळे दराचा फटका बसला. पण, तरीही सरासरी १५ रुपये किलो दर मिळाल्याने साडेचार लाखांचे उत्पन्न मिळाले. तर २ लाख खर्च आलेला. लॉकडाऊन नसता तर उत्पन्नाचे गणित आणखी वाढले असते.

दुसऱ्या २० गुंठ्याच्या शेडनेटमध्ये ढोबळी मिरची आहे. यामधून आतापर्यंत ६ टन उत्पन्न मिळाले आहे. तर आणखी १० टन उत्पन्नाचा अंदाज आहे. त्यातच ही रंगीत मिरची असल्याने दर अधिक मिळतोय. सुरूवातीला ४० रुपयांपर्यंत दर मिळाला. पण, आता मुंबईच्या मार्केटमध्ये या ढोबळी मिरचीला ७० ते ८० रुपये दर मिळू लागलाय. ३ ते ४ दिवसांतून मिरचीची तोड करुन ती मुंबईच्या मार्केटला पाठविण्यात येते. आतापर्यंत २ लाख रुपये मिळाले असून आणखी ४ लाख रुपये अपेक्षित आहेत. कमी क्षेत्रातील ही लाखोंची उड्डाणे मार्गदर्शकच आहेत.

चौकट :

कृषी विभागाचेही मार्गदर्शन...

बाजारपेठेचा अभ्यास आणि कृषी विभागाचे मार्गदर्शन घेतले तर

कमी क्षेत्रातही अधिक उत्पन्न मिळू शकते. हे सातारा जिल्ह्यातील अनेकांनी सिध्द करुन दाखवले आहे. यामधील रमेश ससाणे हे शेतकरी आहेत. त्यांनी ऊस, हळद, आले अशा पिकांतूनही भरघोस उत्पन्न घेतलेले आहे.

कोट :

शेतकऱ्यांनी आधुनिक पध्दतीने व तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती केली तर निश्चितपणे चांगलं उत्पन्न मिळू शकतं. तसेच सतत बाजारपेठेचा अभ्यास करावा. यामुळे कोणते पीक घ्यावं ते समजतं. हे गणित जुळून आलं तर शेती उत्पन्नातून लाखो रुपयेही कमवता येतात. त्यामुळे शेती तोट्याची कधीच होत नाही.

- रमेश ससाणे, शेतकरी भुईंज

फोटो दि.०५सातारा अ‍ॅग्री फोटो...