शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

जैवविविधता समिती असती तर...

By admin | Updated: August 26, 2014 21:50 IST

कायद्याने बंधनकारक : अंमलबजावणी असती तर टळली असती साताऱ्यातील पूरस्थिती

सातारा : पर्यावरणविषयक कायदे होतात; पण त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने आफत ओढवते, हे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे साताऱ्यात तंतोतंत खरे ठरले आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने जैवविविधता व्यवस्थापन समिती (बायोडायव्हर्सिटी कमिटी) स्थापन करणे बंधनकारक असूनही कायद्याचे पालन झाले नाही. परिणामी, नैसर्गिक घटकांमध्ये होत असलेल्या बदलांवर, हस्तक्षेपांवर लक्षच राहिले नाही आणि गेल्या आठवड्यातील मानवनिर्मित पूरस्थिती ओढवली.जैवविविधता कायदा २००२ मध्ये अस्तित्वात आला. विविध रूपांंतील ‘जीवन’ संवर्धित करणे हा या कायद्याचा हेतू आहे. निसर्गचक्रात होणारे हस्तक्षेप माळीणसारख्या दुर्घटनेपासून गोडोलीतील पुरापर्यंत अनेक धोक्यांना निमंत्रण देतात, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळेच जीवनसंवर्धनाचे काम स्थानिक पातळीवर होणे कायद्याला अपेक्षित आहे. यासाठी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने जैवविविधता समिती स्थापन करावी, असे या कायद्यात नमूद केले आहे. राज्य जैवविविधता मंडळाच्या माध्यमातून केंद्रीय जैवविविधता प्राधिकरणाशी सर्व समित्या जोडल्या जाऊन एक साखळी तयार होणे अभिप्रेत आहे. याकामी आराखडे तयार केल्यास जैवसंपदेच्या जतनासाठी निधीही उपलब्ध होऊ शकतो. जैविक विविधतेच्या देणगीमुळेच साताऱ्याचे नाव जागतिक नकाशावर ठळकपणे आले. डोंगरउतारावर वसलेल्या, वन्यजीवांचा शेजार लाभलेल्या या शहराने अशी समिती स्थापन करून राज्यात आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा नुकत्याच उद््भवलेल्या पूरस्थितीनंतर व्यक्त होत आहे.अशी समिती असती तर विकासकामांच्या आराखड्यांची तज्ज्ञांकडून तपासणी झाली असती आणि नैसर्गिक बाबींचा विचार करून अभिप्राय दिला गेला असता. तसेच शहराला असणाऱ्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित धोक्यांबाबत पूर्वसूचना मिळणे शक्य झाले असते. पर्यायाने ्रपुरामुळे झालेले नुकसान टाळता आले असते. (प्रतिनिधी)साताऱ्याला का उपयुक्त?डोंगरउतारावरील शहर असल्यामुळे निसर्गातील हस्तक्षेपामुळे होणाऱ्या परिणामांची पूर्वकल्पनानिसर्गात होणाऱ्या घातक हस्तक्षेपांवर नजर पालिकेच्या नगररचना विभागाला विविध विषयांत तज्ज्ञांचे मार्गदर्शनपालिकेच्या शिफारशीवर राज्य मंडळ नवी वारसास्थळे घोषित करू शकतेकेंद्रीय प्राधिकरणाशी सल्लामसलत करून वारसास्थळांसाठी नियमावली शक्यजैवसमृद्ध स्थळ जोपासताना कोणी विस्थापित होत असेल तर पुनर्वसनासाठी निधीसमितीत कोण असावे?जैवविविधता समितीत जलस्रोततज्ज्ञ, भूगर्भतज्ज्ञ, भूरचनाशास्त्रज्ञ, प्राणितज्ज्ञ, वनस्पतितज्ज्ञ, परिसरविज्ञान तज्ज्ञ यांबरोबरच आपत्कालीन व्यवस्थापनतज्ज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांचा अंतर्भाव असू शकतो. या सर्व क्षेत्रांत संशोधन करणारे तज्ज्ञ साताऱ्यात उपलब्ध आहेत आणि ही साखळी जोडल्यास विविध मार्गांनी येणारे धोके ओळखण्यास आणि आपत्ती निवारणास मदत होऊ शकते.१ समितीची कामे कोणतीपरिसरातील जैवसंपत्तीचे संवर्धन आणि शाश्वत वापर२ परिसरातील नैसर्गिक अधिवासांची नोंद आणि जतन३ - पाळीव पशुधन आणि अन्य प्राणिसंपदेची नोंद४ - स्थानिक वाणांची नोंद आणि संवर्धन५व्यावसायिक कारणांसाठी होत असलेल्या जैवसंपत्तीच्या वापराची दरनिश्चिती करून पालिकेला उत्पन्न मिळवून देणे