शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

पीक विम्यात फोलपणा; शेतकऱ्यांचा काय गुन्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना असली तरी त्यातून म्हणावा असा लाभ मिळत नाही. यामध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना असली तरी त्यातून म्हणावा असा लाभ मिळत नाही. यामध्ये विमा कंपन्याच मालामाल होत असल्याच्या तक्रारी आहेत. गेल्यावर्षी खरिपात शेतकऱ्यांनी विम्यासाठी ४८ लाख रुपये भरले. पण, १६७ शेतकऱ्यांनाच पाच लाख मिळाले. आता वर्षानंतरही भरपाई कितीजणांना मिळणार, याचा अंतिम आकडाच समोर नाही. त्यामुळे पीक विम्याच्या फोलपणात शेतकऱ्यांचा काय गुन्हा, अशी विचारणा होऊ लागलीय.

शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी एक विमा कंपनी कार्यरत आहे. सुरुवातीला अनेक शेतकऱ्यांना नुकसान झाल्यानंतर पैसे मिळाले. पण, त्यानंतर भरपाई मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली. कारण, भरपाई देण्यासाठी अनेक निकष तयार करण्यात आले. यातून भरपाई कमी मिळू लागली. त्यातच आता विमा योजना ऐच्छिक करण्यात आली आहे. भरपाई कमी आणि योजना ऐच्छिक यामुळे विमाधारक शेतकऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे.

सातारा जिल्ह्याचा विचार करता गेल्यावर्षी खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील ३८,६७२ शेतकऱ्यांनी विमा घेतला होता. भात, सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग, कांदा, नाचणी आदी पिकांसाठी हे विमा कवच होते. जिल्ह्यातील ८,२०० हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले. त्यासाठी शेतकऱ्यांनी ४८ लाख ७७ हजार ५१२ रुपये भरले. २३ कोटी ९० लाख रुपये विमा संरक्षित रक्कम झाली. त्यातच गेल्यावर्षी खरीप हंगामातच अतिवृष्टी झाली. यामध्ये फळबागा, सोयाबीन, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, वर्षानंतरही कितीजणांना लाभ मिळणार, हे निश्चित नाही.

गेल्यावर्षीच्या खरीप हंगामावेळी झालेल्या अतिवृष्टीतील नुकसान झालेल्या अवघ्या १६७ शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळाली आहे. ५ लाख ६ हजार ९१२ रुपये मदत या शेतकऱ्यांना मिळाली. आज वर्ष होऊन गेल्यानंतरही आणखी किती शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम मिळणार, हेही स्पष्ट नाही. त्यातच राज्य आणि केंद्र शासनांनी आपला हिस्साही दिला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पीक विमा योजनेतील हा फोलपणा शेतकऱ्यांना योजनेपासून दूर नेण्यास भाग पाडत आहे. तसेच शेतकऱ्यांचाही विमा कंपन्यांबाबत नाराजीचा सूर आहे.

........................................

शेतकऱ्यांना असा भरावा लागतो विमा हप्ता (हेक्टरी) ...

पीक शेतकरी हप्ता रक्कम विमा संरक्षित रक्कम

भात ६६० ३३०००

ज्वारी ३२० १६०००

बाजरी २८० १४०००

नाचणी ३२० १६०००

भुईमूग ६३० ३१५००

सोयाबीन ५२० २६०००

मूग ४०० २००००

उडीद ४०० २००००

कांदा १८०० ३६०००

......................................................

शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना असली तरी योग्य यंत्रणा कार्यान्वित नाही. नुकसान होत आहे, त्याप्रमाणात भरपाई मिळत नाही. यामुळे नैराश्य वाढल्याने शेतकरी पीक विमा काढण्याबाबत टाळाटाळ करत आहेत. एकप्रकारे शासनाबरोबरच खासगी विमा कंपन्यांचीही दरोडेखोरी सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. याबाबत उपाययोजना केल्या नाहीत तर शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.

- राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

.......................

नुकसानभरपाई कोणाला मिळते...

अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, चक्रीवादळ, कीड, रोगराई, पावसातील खंड, वीज कोसळणे, नैसर्गिक आग यामुळे पिकांचे नुकसान झाले तर भरपाई मिळते. त्यासाठी विमा कंपनी व राज्य शासनाचे संबंधित अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर पंचनामे केले जातात. त्यावर नुकसानाचे प्रमाण व भरपाई रक्कम ठरवली जाते.

..............................................................................

हप्ता रक्कम अशी आहे...

विमा हप्त्यापैकी खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगाम दीड आणि फळबागांसाठी ५ टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरायची आहे. उर्वरित रक्कम राज्य आणि केंद्र शासन भरते.