शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यात फोलपणा; शेतकऱ्यांचा काय गुन्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना असली तरी त्यातून म्हणावा असा लाभ मिळत नाही. यामध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना असली तरी त्यातून म्हणावा असा लाभ मिळत नाही. यामध्ये विमा कंपन्याच मालामाल होत असल्याच्या तक्रारी आहेत. गेल्यावर्षी खरिपात शेतकऱ्यांनी विम्यासाठी ४८ लाख रुपये भरले. पण, १६७ शेतकऱ्यांनाच पाच लाख मिळाले. आता वर्षानंतरही भरपाई कितीजणांना मिळणार, याचा अंतिम आकडाच समोर नाही. त्यामुळे पीक विम्याच्या फोलपणात शेतकऱ्यांचा काय गुन्हा, अशी विचारणा होऊ लागलीय.

शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी एक विमा कंपनी कार्यरत आहे. सुरुवातीला अनेक शेतकऱ्यांना नुकसान झाल्यानंतर पैसे मिळाले. पण, त्यानंतर भरपाई मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली. कारण, भरपाई देण्यासाठी अनेक निकष तयार करण्यात आले. यातून भरपाई कमी मिळू लागली. त्यातच आता विमा योजना ऐच्छिक करण्यात आली आहे. भरपाई कमी आणि योजना ऐच्छिक यामुळे विमाधारक शेतकऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे.

सातारा जिल्ह्याचा विचार करता गेल्यावर्षी खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील ३८,६७२ शेतकऱ्यांनी विमा घेतला होता. भात, सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग, कांदा, नाचणी आदी पिकांसाठी हे विमा कवच होते. जिल्ह्यातील ८,२०० हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले. त्यासाठी शेतकऱ्यांनी ४८ लाख ७७ हजार ५१२ रुपये भरले. २३ कोटी ९० लाख रुपये विमा संरक्षित रक्कम झाली. त्यातच गेल्यावर्षी खरीप हंगामातच अतिवृष्टी झाली. यामध्ये फळबागा, सोयाबीन, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, वर्षानंतरही कितीजणांना लाभ मिळणार, हे निश्चित नाही.

गेल्यावर्षीच्या खरीप हंगामावेळी झालेल्या अतिवृष्टीतील नुकसान झालेल्या अवघ्या १६७ शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळाली आहे. ५ लाख ६ हजार ९१२ रुपये मदत या शेतकऱ्यांना मिळाली. आज वर्ष होऊन गेल्यानंतरही आणखी किती शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम मिळणार, हेही स्पष्ट नाही. त्यातच राज्य आणि केंद्र शासनांनी आपला हिस्साही दिला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पीक विमा योजनेतील हा फोलपणा शेतकऱ्यांना योजनेपासून दूर नेण्यास भाग पाडत आहे. तसेच शेतकऱ्यांचाही विमा कंपन्यांबाबत नाराजीचा सूर आहे.

........................................

शेतकऱ्यांना असा भरावा लागतो विमा हप्ता (हेक्टरी) ...

पीक शेतकरी हप्ता रक्कम विमा संरक्षित रक्कम

भात ६६० ३३०००

ज्वारी ३२० १६०००

बाजरी २८० १४०००

नाचणी ३२० १६०००

भुईमूग ६३० ३१५००

सोयाबीन ५२० २६०००

मूग ४०० २००००

उडीद ४०० २००००

कांदा १८०० ३६०००

......................................................

शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना असली तरी योग्य यंत्रणा कार्यान्वित नाही. नुकसान होत आहे, त्याप्रमाणात भरपाई मिळत नाही. यामुळे नैराश्य वाढल्याने शेतकरी पीक विमा काढण्याबाबत टाळाटाळ करत आहेत. एकप्रकारे शासनाबरोबरच खासगी विमा कंपन्यांचीही दरोडेखोरी सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. याबाबत उपाययोजना केल्या नाहीत तर शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.

- राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

.......................

नुकसानभरपाई कोणाला मिळते...

अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, चक्रीवादळ, कीड, रोगराई, पावसातील खंड, वीज कोसळणे, नैसर्गिक आग यामुळे पिकांचे नुकसान झाले तर भरपाई मिळते. त्यासाठी विमा कंपनी व राज्य शासनाचे संबंधित अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर पंचनामे केले जातात. त्यावर नुकसानाचे प्रमाण व भरपाई रक्कम ठरवली जाते.

..............................................................................

हप्ता रक्कम अशी आहे...

विमा हप्त्यापैकी खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगाम दीड आणि फळबागांसाठी ५ टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरायची आहे. उर्वरित रक्कम राज्य आणि केंद्र शासन भरते.