शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक ‘औंध’नं पुन्हा एकदा कात टाकली!

By admin | Updated: April 23, 2016 00:41 IST

कोट्यवधींची विकासकामे : राष्ट्रवादीच्या पहिला जिल्हा परिषद अध्यक्षा होण्याचा गायत्रीदेवींना मान

रशिद शेख- औंध --औंध हे संस्थान सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रांतील एक नावाजलेले व आदर्शगाव म्हणून ओळखले जाते. दहा दशकांपासून औंधसारख्या लोकाभिमुख असणाऱ्या संस्थानकालीन गावाची स्वातंत्र्यानंतर मोठी पिछेहाट झाली. देशाला नामवंत लेखक, कलाकार, उद्योगपती, संगीत, सांस्कृतिक वारसा देणारे छोटेसे औंध संस्थान पूर्ण मागे पडले. दळणवळण, व्यापार शैक्षणिक सुविधा यामध्ये मागील ३० वर्षांमध्ये औंधची पूर्ण वाताहात झाली होती; परंतु मागील दहा वर्षांपासून औंध संस्थानच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी गावच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी आणून गावचा चेहरा-मोहराच बदलून टाकला आहे.औंध संस्थानचे तत्कालीन अधिपती श्रीपतराव पंतप्रतिनिधी राजे व बाळराजे पंतप्रतिनिधी यांनी १९९१ ते १९९९ या कालखंडात औंध गावाला वेगवेगळ्या व भरपूर सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून शासनदरबारी प्रयत्न केले; परंतु त्यांच्या आकस्मिक निधनानंतर औंध गावच्या विकासाची संपूर्ण जबाबदारी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्यावर येऊन पडली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून औंध जिल्हा परिषद गटाची त्यांनी पोट निवडणूक लढवून त्यांनी राष्ट्रवादीच्या राज्यातील पहिल्या महिला जिल्हा परिषद सदस्या होण्याचा मिळविला. त्यानंतर त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा बनल्या. जिल्हा व तालुका पातळीवरील जबाबदारी सांभाळताना औंध गावच्या सर्वांगीण विकासाला त्यांनी प्राधान्य दिले.औंधचा कायापालट करण्यात गायत्रीदेवी यांच्याबरोबर सतत त्यांच्याबरोबर राहण्यामागे माजी सभापती सोनाली खैरमोडे, हणमंत शिंदे, राजेंद्र माने, दीपक नलवडे, रमेश जगदाळे, इलियाज पटवेकरी, सचिन शिंदे, आब्बास आतार, चंद्रकांत कुंभार, शंकर खैरमोडे, सरपंच रोहिणी थोरात, उपसरपंच बापूसाहेब कुंभार, श्री बाळराजे प्रतिष्ठान, संस्थांचे पदाधिकारी युवक, ग्रामस्थांचे सहकार्य लाभते.आधुनिकीकरणाला वेग माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी अनेक विकासकामे केली. यामध्ये ग्राम सचिवालयाची सुसज्ज इमारत, ग्रामीण रुग्णालय, विश्रामगृह, अंतर्गत रस्ते, गटारांचे काँक्रिटीकरण, डांबरीकरण, औद्योगिक प्रशिक्षण, संस्थेच्या इमारतीचे काम, स्ट्रीट लाईटस, श्री यमाई देवी मूळपीठ रस्ता, श्री भवानी चित्र संग्रहालय, नवीन इमारत, शैक्षणिक संस्थेच्या सुसज्ज इमारती, औंधचा शैक्षणिक विकास, भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचा सिंहाचा वाटा आहे. महिला सबलीकरण आणि महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत असताना बचत गटाच्या माध्यमातून महिलांची संघटित ताकद त्यांनी निर्माण केली आहे. गावात असणारे महिला स्वयंसहाय्यता बचत गट हे त्याचे द्योतक म्हणावे लागेल. मुलींच्या शिक्षणासाठी आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून देण्यात गायत्रीदेवी अग्रेसर असतात.