शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

ऐतिहासिक ‘औंध’नं पुन्हा एकदा कात टाकली!

By admin | Updated: April 23, 2016 00:41 IST

कोट्यवधींची विकासकामे : राष्ट्रवादीच्या पहिला जिल्हा परिषद अध्यक्षा होण्याचा गायत्रीदेवींना मान

रशिद शेख- औंध --औंध हे संस्थान सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रांतील एक नावाजलेले व आदर्शगाव म्हणून ओळखले जाते. दहा दशकांपासून औंधसारख्या लोकाभिमुख असणाऱ्या संस्थानकालीन गावाची स्वातंत्र्यानंतर मोठी पिछेहाट झाली. देशाला नामवंत लेखक, कलाकार, उद्योगपती, संगीत, सांस्कृतिक वारसा देणारे छोटेसे औंध संस्थान पूर्ण मागे पडले. दळणवळण, व्यापार शैक्षणिक सुविधा यामध्ये मागील ३० वर्षांमध्ये औंधची पूर्ण वाताहात झाली होती; परंतु मागील दहा वर्षांपासून औंध संस्थानच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी गावच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी आणून गावचा चेहरा-मोहराच बदलून टाकला आहे.औंध संस्थानचे तत्कालीन अधिपती श्रीपतराव पंतप्रतिनिधी राजे व बाळराजे पंतप्रतिनिधी यांनी १९९१ ते १९९९ या कालखंडात औंध गावाला वेगवेगळ्या व भरपूर सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून शासनदरबारी प्रयत्न केले; परंतु त्यांच्या आकस्मिक निधनानंतर औंध गावच्या विकासाची संपूर्ण जबाबदारी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्यावर येऊन पडली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून औंध जिल्हा परिषद गटाची त्यांनी पोट निवडणूक लढवून त्यांनी राष्ट्रवादीच्या राज्यातील पहिल्या महिला जिल्हा परिषद सदस्या होण्याचा मिळविला. त्यानंतर त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा बनल्या. जिल्हा व तालुका पातळीवरील जबाबदारी सांभाळताना औंध गावच्या सर्वांगीण विकासाला त्यांनी प्राधान्य दिले.औंधचा कायापालट करण्यात गायत्रीदेवी यांच्याबरोबर सतत त्यांच्याबरोबर राहण्यामागे माजी सभापती सोनाली खैरमोडे, हणमंत शिंदे, राजेंद्र माने, दीपक नलवडे, रमेश जगदाळे, इलियाज पटवेकरी, सचिन शिंदे, आब्बास आतार, चंद्रकांत कुंभार, शंकर खैरमोडे, सरपंच रोहिणी थोरात, उपसरपंच बापूसाहेब कुंभार, श्री बाळराजे प्रतिष्ठान, संस्थांचे पदाधिकारी युवक, ग्रामस्थांचे सहकार्य लाभते.आधुनिकीकरणाला वेग माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी अनेक विकासकामे केली. यामध्ये ग्राम सचिवालयाची सुसज्ज इमारत, ग्रामीण रुग्णालय, विश्रामगृह, अंतर्गत रस्ते, गटारांचे काँक्रिटीकरण, डांबरीकरण, औद्योगिक प्रशिक्षण, संस्थेच्या इमारतीचे काम, स्ट्रीट लाईटस, श्री यमाई देवी मूळपीठ रस्ता, श्री भवानी चित्र संग्रहालय, नवीन इमारत, शैक्षणिक संस्थेच्या सुसज्ज इमारती, औंधचा शैक्षणिक विकास, भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचा सिंहाचा वाटा आहे. महिला सबलीकरण आणि महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत असताना बचत गटाच्या माध्यमातून महिलांची संघटित ताकद त्यांनी निर्माण केली आहे. गावात असणारे महिला स्वयंसहाय्यता बचत गट हे त्याचे द्योतक म्हणावे लागेल. मुलींच्या शिक्षणासाठी आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून देण्यात गायत्रीदेवी अग्रेसर असतात.