शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
3
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
4
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
5
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
6
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
7
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
8
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
9
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
10
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
11
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
12
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
13
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
14
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
15
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
16
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
17
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
18
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
19
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
20
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...

कोल्हे दाम्पत्याच्या कार्याला सलाम !

By admin | Updated: December 4, 2014 23:46 IST

सव्वा लाखाची उत्स्फूर्त मदत : परिस्थितीशी दोन हात केल्यामुळेच मिळते यश

सातारा : आयुष्यात कधीही हार मानू नये. परिस्थितीशी दोन हात करून अडचणींकडे ‘चॅलेंज’ म्हणून बघितले की यश नक्कीच तुमच्या पदरात पडते, असे प्रतिपादन आदिवासींसाठी काम करणारे व समाजसेवक डॉ. रवींद्र कोल्हे यांनी येथे केले. दरम्यान, कोल्हे दाम्पत्याच्या समाजपरिवर्तनाच्या कहाणीला सातारकरांनी सलाम करीत सुमारे सव्वा लाखाची उत्स्फूर्त मदतही केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि जनता सहकारी बँकच्या वतीने शाहूकला मंदिर येथे आयोजित डॉ. कोल्हे दाम्पत्याच्या मुलाखतवजा कार्यक्रमात ते बोलत होते. अ‍ॅड. मुकुंद सारडा, जनता बँकेचे अध्यक्ष आनंदराव कणसे, उपाध्यक्ष अतुल जाधव, किशोर बेडकिहाळ, टी.आर. गारळे, नगराध्यक्ष सचिन सारस, विनोद कुलकर्णी, डॉ. सचिन जाधव उपस्थित होते. डॉ. रवींद्र कोल्हे म्हणाले, आदिवासी समाजाने आम्हाला शेती करण्याचे चॅलेंज दिले. आम्ही ते स्वीकारले आणि अकोला येथील कृषी विद्यापीठातून माहिती घेत पडीक जमिनीतून साडेबावीस क्विंंटल सोयाबीनचे उत्पादन घेतले. त्यानंतर त्यांचा आमच्यावर विश्वास बसला. आता तेही शेतीमध्ये प्रयोग करत आहेत. हे उत्पादन २५ वर्षांपूर्वी आम्ही घेतले. त्यानंतर आता महाराष्ट्रात इतरत्र सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. त्या परिसरातील लोकांमध्ये काम करण्याची इच्छाशक्ती आहे. जमीन, पाणी, मनुष्यबळ आहे. परंतु वीज नाही जर शासनाने वीजपुरवठा केला तर हा परिसर समृध्द होऊ शकतो. शासनाकडून वीज मिळवणे हे आमच्यासमोरील आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ. स्मिता कोल्हे यांनी परिसरातील प्रश्न कसे सोडवले त्याबाबत सांगितले. त्यानंतर कुपोषणाचा विषय समोर आला. शासन दरबारी अर्ज, विनंत्या केल्या परंतु जास्त उपयोग झाला नाही. त्यावर मी संशोधन केले. बीबीसीने ते उजेडात आणल्यानंतर कुपोषण जगभरात पोहचले. याठिकाणी कुपोषण, बालमृत्यू याचं प्रमाणही खूप होते. इतर ठिकाणी १००० मुलांमधील ८ किंंवा ९ मुलं दगावत असतील तर तेच प्रमाण या भागात २०० होते. पण आता हे प्रमाण ६० वर आलेलं आहे. ही काही आनंदाची बाब नाही, हे प्रमाण दहा पर्यंत कसे येईल यासाठी प्रयत्न आहेत.स्वत:च्या मुलांच्या जन्माचा प्रसंग त्यांनी सांगितला तेव्हा सातारकर हेलावून गेले. तुमच्या कार्याची शासनाने दखल घेतली का या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या, शासनापेक्षा सामाजिक संस्था आणि समाजाने दखल घेतली हे आमच्यासाठी महत्वाचे आहे. कोणत्याही पुरस्कारासाठी अर्ज करावा लागतो परंतु आम्ही अर्ज करणार नसल्याचे ठरवले आहे. हा प्रकल्प लोक आधारित चालावा अशी इच्छा असल्याचे त्यांनी सांगताच टाळयाचा कडकडाट झाला. शाहुपुरी शाखेचे कार्यवाह नंदकुमार सावंत यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)