शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
5
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
6
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
7
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
8
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
9
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
10
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
11
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
12
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
13
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
14
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
15
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
16
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
17
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
18
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!

कष्टानं पिकवलं; हिकमतीनं राखतोय!

By admin | Updated: October 25, 2015 23:52 IST

तारेवरची कसरत : पाखरं आणि वन्यजीवांपासून उभ्या पिकाची राखण करताना बळीराजाची ओढाताण

सागर चव्हाण- पेट्री शहराच्या पश्चिमेकडील यवतेश्वर, कास, बामणोली, तापोळा परिसरात दरवर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने येथील परिसरात खरीप पिके चांगल्या प्रकारे घेतली जातात; परंतु यंदा पावसाने ओढ दिल्याने पिकांच्या वाढीबाबत शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत होते. गत महिन्यात झालेल्या पावसातून चिंता सरते ना सरते तोच कापणीस आलेल्या पिकांची वन्यप्राण्यांकडून नासधूस केली जात आहे. यामुळे पिकांच्या बचावासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.सध्या या परिसरात भात, नाचणी, वरी, हायब्रिड, कारळा, भुईमूग ही पिके कापणीसाठी तयार झाली असून, बहुतांशी ठिकाणी भात कापणीस सुरुवात झाली आहे. दरम्यान, रानडुक्कर, रानगवे, साळिंदर, लांडोरी, रान कोंबड्या, ससे, यांचा प्रामुख्याने रात्रीच्या वेळी तर माकडे, वानरे, पाखरे दिवसभर पिकांची नासधूस करत आहे. या वन्य प्राणी, पक्ष्यांपासून पिके वाचविता यावीत, तसेच त्यांना संरक्षण देऊन होणारे नुकसान टाळावे, यासाठी शेतकरी वर्ग दिवसरात्र पिकांच्या शिवारात नाना प्रकारे क्लृप्त्या आखून राखण करताना दिसत आहेत. कष्टानं पिकवलेल्या पिकाची वन्यप्राण्यांकडून नासधूस होत असल्याने हे नुकसान टाळण्यासाठी बळीराजाची धडपड सुरु आहे.संरक्षणासाठी नानातऱ्हेचे उपायझडपी ठोकडा : रानात मोठी काठी रोवून त्याच्या उंचावरील टोकाला स्टील अथवा पत्र्याचा मोकळा डबा अडकवून त्या खालोखाल सुपासारखी जड वस्तू लटकविली जात आहे. डब्याच्या चोहोबाजूला लाकडी, लोखंडी सळ्या आपटून होणाऱ्या आवाजाने वन्यप्राणी पळून जातात व पिकांचे रक्षण होते.थायमॅट : वासाने वन्य प्राणी येत नाहीत यामुळे थायमॅट पुडीत बांधून ठेवण्यात येते.कंदील : उजेडामुळे प्राणी रानात शिरत नाहीत. त्यामुळे शेतकरी कंदील, बॅटरी रात्रभर रानात सुरू करून ठेवत आहेत.साड्या जुन्या कॅसेटचे रिल, कागदी पट्ट्या, प्लास्टिक कापड, प्लास्टिक बारदाने शिवारात तसेच शिवाराच्या चोहोबाजूला लावण्यात येत आहे. तसेच लाकूड, बांबू, तार यांचे कुंपण चोहोबाजूला लावून वन्य प्राण्यांच्या महत्त्वाच्या वाटा बंद करण्यात येत आहे.शिवारातील पिकांना संरक्षण देण्यासाठी दिवसरात्र राखण करावी लागते आहे. यासाठी रानात ठिकठिकाणी कुपी तयार केल्या आहेत. दुपारच्या कडक उन्हात या कुपीचा आश्रय घेता येतो. शिवारात लावण्यात आलेल्या रंगीत पट्या दिवसा उन्हात चमकतात तसेच त्यांच्या हालचालीमुळे पशु, पाखरापासून पिकांना संरक्षण मिळते.- राजेंद्र उंबरकर, शेतकरी, यवतेश्वर