शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

कष्टानं पिकवलं; हिकमतीनं राखतोय!

By admin | Updated: October 25, 2015 23:52 IST

तारेवरची कसरत : पाखरं आणि वन्यजीवांपासून उभ्या पिकाची राखण करताना बळीराजाची ओढाताण

सागर चव्हाण- पेट्री शहराच्या पश्चिमेकडील यवतेश्वर, कास, बामणोली, तापोळा परिसरात दरवर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने येथील परिसरात खरीप पिके चांगल्या प्रकारे घेतली जातात; परंतु यंदा पावसाने ओढ दिल्याने पिकांच्या वाढीबाबत शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत होते. गत महिन्यात झालेल्या पावसातून चिंता सरते ना सरते तोच कापणीस आलेल्या पिकांची वन्यप्राण्यांकडून नासधूस केली जात आहे. यामुळे पिकांच्या बचावासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.सध्या या परिसरात भात, नाचणी, वरी, हायब्रिड, कारळा, भुईमूग ही पिके कापणीसाठी तयार झाली असून, बहुतांशी ठिकाणी भात कापणीस सुरुवात झाली आहे. दरम्यान, रानडुक्कर, रानगवे, साळिंदर, लांडोरी, रान कोंबड्या, ससे, यांचा प्रामुख्याने रात्रीच्या वेळी तर माकडे, वानरे, पाखरे दिवसभर पिकांची नासधूस करत आहे. या वन्य प्राणी, पक्ष्यांपासून पिके वाचविता यावीत, तसेच त्यांना संरक्षण देऊन होणारे नुकसान टाळावे, यासाठी शेतकरी वर्ग दिवसरात्र पिकांच्या शिवारात नाना प्रकारे क्लृप्त्या आखून राखण करताना दिसत आहेत. कष्टानं पिकवलेल्या पिकाची वन्यप्राण्यांकडून नासधूस होत असल्याने हे नुकसान टाळण्यासाठी बळीराजाची धडपड सुरु आहे.संरक्षणासाठी नानातऱ्हेचे उपायझडपी ठोकडा : रानात मोठी काठी रोवून त्याच्या उंचावरील टोकाला स्टील अथवा पत्र्याचा मोकळा डबा अडकवून त्या खालोखाल सुपासारखी जड वस्तू लटकविली जात आहे. डब्याच्या चोहोबाजूला लाकडी, लोखंडी सळ्या आपटून होणाऱ्या आवाजाने वन्यप्राणी पळून जातात व पिकांचे रक्षण होते.थायमॅट : वासाने वन्य प्राणी येत नाहीत यामुळे थायमॅट पुडीत बांधून ठेवण्यात येते.कंदील : उजेडामुळे प्राणी रानात शिरत नाहीत. त्यामुळे शेतकरी कंदील, बॅटरी रात्रभर रानात सुरू करून ठेवत आहेत.साड्या जुन्या कॅसेटचे रिल, कागदी पट्ट्या, प्लास्टिक कापड, प्लास्टिक बारदाने शिवारात तसेच शिवाराच्या चोहोबाजूला लावण्यात येत आहे. तसेच लाकूड, बांबू, तार यांचे कुंपण चोहोबाजूला लावून वन्य प्राण्यांच्या महत्त्वाच्या वाटा बंद करण्यात येत आहे.शिवारातील पिकांना संरक्षण देण्यासाठी दिवसरात्र राखण करावी लागते आहे. यासाठी रानात ठिकठिकाणी कुपी तयार केल्या आहेत. दुपारच्या कडक उन्हात या कुपीचा आश्रय घेता येतो. शिवारात लावण्यात आलेल्या रंगीत पट्या दिवसा उन्हात चमकतात तसेच त्यांच्या हालचालीमुळे पशु, पाखरापासून पिकांना संरक्षण मिळते.- राजेंद्र उंबरकर, शेतकरी, यवतेश्वर