शहरं
Join us  
Trending Stories
1
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
2
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
3
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
4
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
5
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
6
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
7
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
8
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
9
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
10
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
11
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
12
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
13
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!
14
बाजारात पुन्हा 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी 'धडाम', बाजाराच्या घसरणीमागे 'ही' आहेत ४ मोठी कारणे
15
Astro Tips: रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याबरोबरच ठेवा 'या' तीन गोष्टी; लक्ष्मी होईल कृपावंत!
16
Vastu Shastra: वास्तुसाठी फर्निचर निवडताना 'या' चुका टाळा, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष!
17
आठवडाभराने करणार होता प्रपोज, पण..., इस्राइली दूतावासातील कर्मचाऱ्यांची प्रेमकहाणी राहिली अधुरी 
18
IPL 2025: पाकिस्तानला रडवणाऱ्या तगड्या बॅट्समनची RCB मध्ये 'एन्ट्री'; किती मिळाले पैसे?
19
इतरांनी मृत समजले, पण तिने वाचवले; अपघातग्रस्त तरुणासाठी देवदूत बनून आली नर्स
20
"माझी आई फुकट आणायची"; परदेशात ४ हजारांना विकली जाणारी बॅग पाहताच नेटकरी सुसाट

कष्टानं पिकवलं; हिकमतीनं राखतोय!

By admin | Updated: October 25, 2015 23:52 IST

तारेवरची कसरत : पाखरं आणि वन्यजीवांपासून उभ्या पिकाची राखण करताना बळीराजाची ओढाताण

सागर चव्हाण- पेट्री शहराच्या पश्चिमेकडील यवतेश्वर, कास, बामणोली, तापोळा परिसरात दरवर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने येथील परिसरात खरीप पिके चांगल्या प्रकारे घेतली जातात; परंतु यंदा पावसाने ओढ दिल्याने पिकांच्या वाढीबाबत शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत होते. गत महिन्यात झालेल्या पावसातून चिंता सरते ना सरते तोच कापणीस आलेल्या पिकांची वन्यप्राण्यांकडून नासधूस केली जात आहे. यामुळे पिकांच्या बचावासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.सध्या या परिसरात भात, नाचणी, वरी, हायब्रिड, कारळा, भुईमूग ही पिके कापणीसाठी तयार झाली असून, बहुतांशी ठिकाणी भात कापणीस सुरुवात झाली आहे. दरम्यान, रानडुक्कर, रानगवे, साळिंदर, लांडोरी, रान कोंबड्या, ससे, यांचा प्रामुख्याने रात्रीच्या वेळी तर माकडे, वानरे, पाखरे दिवसभर पिकांची नासधूस करत आहे. या वन्य प्राणी, पक्ष्यांपासून पिके वाचविता यावीत, तसेच त्यांना संरक्षण देऊन होणारे नुकसान टाळावे, यासाठी शेतकरी वर्ग दिवसरात्र पिकांच्या शिवारात नाना प्रकारे क्लृप्त्या आखून राखण करताना दिसत आहेत. कष्टानं पिकवलेल्या पिकाची वन्यप्राण्यांकडून नासधूस होत असल्याने हे नुकसान टाळण्यासाठी बळीराजाची धडपड सुरु आहे.संरक्षणासाठी नानातऱ्हेचे उपायझडपी ठोकडा : रानात मोठी काठी रोवून त्याच्या उंचावरील टोकाला स्टील अथवा पत्र्याचा मोकळा डबा अडकवून त्या खालोखाल सुपासारखी जड वस्तू लटकविली जात आहे. डब्याच्या चोहोबाजूला लाकडी, लोखंडी सळ्या आपटून होणाऱ्या आवाजाने वन्यप्राणी पळून जातात व पिकांचे रक्षण होते.थायमॅट : वासाने वन्य प्राणी येत नाहीत यामुळे थायमॅट पुडीत बांधून ठेवण्यात येते.कंदील : उजेडामुळे प्राणी रानात शिरत नाहीत. त्यामुळे शेतकरी कंदील, बॅटरी रात्रभर रानात सुरू करून ठेवत आहेत.साड्या जुन्या कॅसेटचे रिल, कागदी पट्ट्या, प्लास्टिक कापड, प्लास्टिक बारदाने शिवारात तसेच शिवाराच्या चोहोबाजूला लावण्यात येत आहे. तसेच लाकूड, बांबू, तार यांचे कुंपण चोहोबाजूला लावून वन्य प्राण्यांच्या महत्त्वाच्या वाटा बंद करण्यात येत आहे.शिवारातील पिकांना संरक्षण देण्यासाठी दिवसरात्र राखण करावी लागते आहे. यासाठी रानात ठिकठिकाणी कुपी तयार केल्या आहेत. दुपारच्या कडक उन्हात या कुपीचा आश्रय घेता येतो. शिवारात लावण्यात आलेल्या रंगीत पट्या दिवसा उन्हात चमकतात तसेच त्यांच्या हालचालीमुळे पशु, पाखरापासून पिकांना संरक्षण मिळते.- राजेंद्र उंबरकर, शेतकरी, यवतेश्वर