शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

ग्रामपंचायत संगणक परिचारकांची ससेहोलपट

By admin | Updated: September 18, 2014 23:24 IST

कर्मचाऱ्यांतून संताप : कागदावर आठ हजार मात्र हातात मिळतात चार हजार

परळी : ‘जादा काम... कमी दाम आणि तेही वेळेवर नाही,’ अशी अवस्था राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचारकांची झाली आहे. त्यांचा कागदावर पगार ८,४०० रुपये आणि हातात मिळतात अवघे चार हजार, अशी ससेहोलपट सुरू आहे.राज्याचा चौफेर विकास व्हावा, या दृष्टीने राज्य शासनाने संगणक प्रणालीचा वापर ग्रामपातळीवर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २०११ पासून राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतीचे व्यवहार संगणक प्रणालीने जोडण्यात आले. या संगणक प्रणालीसाठी ज्या ग्रामपंचायतीने संगणक बसवले त्या ग्रामपंचायतींसाठी संगणक परिचारिक नियुक्त करण्यात आले. यांना मात्र आजअखेर एकदाही वेळेवर वेतन मिळाले नाही.संगणक परिचारिकांना ८४०० रुपये वेतन देण्यात यावे, असे त्यांच्या नियुक्तीपत्रात असून प्रत्यक्षात मात्र त्यांच्या हातात ४ हजार रुपये तेही तीन-चार महिन्यांनी दिले जातात. कामाचा विचार करता हा पगार तुटपुजांच आहे. ठेकेदारांकडून फारच सुंदर खुलासा केला जातो. या ८४०० रुपये पैकी ४ हजार ४०० रुपये हे स्टेशनरी दुरुस्तीसाठी व इतर खर्च तर ४ हजार वेतन असे असते, असा खुलासा देण्यात आला. प्रत्यक्षात खर्चाचा तपशील पाहता तीन महिन्यांनी संगणक कामकाजासाठी कागद दिला जातो. त्यांची किमत फक्त १५० रुपये होते. दुरुस्तीसाठी खर्च किती केला जातो, हे जागेवर काम करणारा कर्मचारीच सांगू शकेल. (वार्ताहर)४ हजार ४०० रुपये कशासाठी?कागदावर परिचारकांचा पगार ८,४०० आहे तर हातात ४ हजार मिळतात. मग चार हजार ४०० रुपये कशासाठी आणि कोण गायब करते, कोणाच्या खिशात त्याचा मलिदा जातो, का वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून याची टप्प्या-टप्यात वाटणी होते, असा संतप्त सवाल होत आहे. तर ठेकेदारांचे आणि वरिष्ठांचे काय साटेलोटे आहे की काय? अश्ी चर्चा ग्रामस्थांमधून आहे. तीन महिन्यात एकदा १५० रुपये खर्च येणाऱ्या कागदासाठी ठेकेदारांकडून चक्क महिना ६०० रुपये बिल लावले जात आहे, याची चौकशी करावी, अशीही मागणी होत आहे.आम्हाला महिन्याच्या महिन्याला पगार मिळत नाहीत. वारंवार ग्रामसेवकांना यांची कल्पना द्यावी लागते. त्यावेळी कुठेतरी पगार मिळतो; परंतु रितसर पगार ८४०० आहे तर हातात फक्त ४००० रुपये मिळतात, यातील सर्वच पैसे म्हणजे ४४०० रुपये ठेकेदारांच्या घशात जातात, अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर कर्मचाऱ्याने दिली.