शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

डोंगरी भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांचे शासनाला साकडे

By admin | Updated: March 2, 2016 00:47 IST

विद्यार्थी गळतीची शक्यता : गुगल मॅपऐवजी प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी

वाई : ‘जिल्ह्यातील वाई, जावळी, महाबळेश्वर, पाटण, सातारा या तालुक्यातील डोंगरी दुर्गम भागात असणाऱ्या शाळांचे अंतर उपग्रहाद्वारे गुगल मॅपवर जवळ दिसत असले तरी प्रत्यक्ष वाहतुकीच्या दृष्टीने ती गावे अत्यंत गैरसोईची आहेत. त्या भागातील शाळा बंद केल्यास गळतीचे प्रमाण वाढून विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे डोंगरी व पुनर्वसित गावातील शाळा २० पटाच्या निकषाखाली बंद करू नयेत,’ अशी आग्रही मागणी सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र मुळीक यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथ.) पुनिता गुरव यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. पाटण, जावळी तालुक्यातील धरणग्रस्त गावांचे पुनर्वसन करताना ती गावे अनेक ठिकाणी वसवली गेली आहेत. त्यामुळे मुळातच त्यांची लोकसंख्या कमी असल्याने त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अशा पुनर्वसित गावातील शाळा पटसंख्येच्या कारणामुळे बंद करणे अन्यायकारक आहे. याची निवेदने जिल्हा संघामार्फत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, शिक्षण सभापती यांना देण्यात येणार असून, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष सर्व पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना भेटून निवेदने देणार असल्याचे मच्छिंद्र मुळीक यांनी सांगितले. यावेळी शिक्षक बँकेचे अध्यक्ष बलवंत पाटील, उपाध्यक्ष मोहन निकम, जिल्हा संघाचे नेते राजेंद्र घोरपडे, सरचिटणीस महेंद्र जानुगडे, सुरेंद्र भिलारे, कार्याध्यक्ष राजेंद्र बोराटे, संपर्कप्रमुख संतोष जगताप, प्रवीण घाडगे, महेंद्र इथापे, बजरंग वाघ, रघुनाथ दळवी, लालासाो भंडलकर, विक्रम डोंगरे, पी. जी. भरगुडे, सागर माने, विजय खरात, तात्या सावंत, वैभव डांगे, चंद्रकांत आखाडे, राजकुमार जाधव, शंकर जांभळे, अनिल शिंदे, दत्तात्रय कोरडे, वैशाली जगताप, गणेश तोडकर, भगवान धायगुडे, बंडोबा शिंदे, राजाराम खाडे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) शासनाच्या योजनेलाच खीळ!शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचावी म्हणून शासनाने वस्तीशाळांसारखे उपक्रमही सुरू केले होते. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या चांगलीच वाढली होती. विद्यार्थ्यांना मध्यान आहार देवून विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याचे यशस्वी प्रयत्न शासनाकडून सुरू असताना दुसरीकडे केवळ गुगल मॅपचा आधार घेवून डोंगरी शाळा बंद करण्याची सुचनेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शासनाच्या योजनेलाच खीळ देण्याचा प्रकार होईल, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.