शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

डोंगरी भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांचे शासनाला साकडे

By admin | Updated: March 2, 2016 00:47 IST

विद्यार्थी गळतीची शक्यता : गुगल मॅपऐवजी प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी

वाई : ‘जिल्ह्यातील वाई, जावळी, महाबळेश्वर, पाटण, सातारा या तालुक्यातील डोंगरी दुर्गम भागात असणाऱ्या शाळांचे अंतर उपग्रहाद्वारे गुगल मॅपवर जवळ दिसत असले तरी प्रत्यक्ष वाहतुकीच्या दृष्टीने ती गावे अत्यंत गैरसोईची आहेत. त्या भागातील शाळा बंद केल्यास गळतीचे प्रमाण वाढून विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे डोंगरी व पुनर्वसित गावातील शाळा २० पटाच्या निकषाखाली बंद करू नयेत,’ अशी आग्रही मागणी सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र मुळीक यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथ.) पुनिता गुरव यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. पाटण, जावळी तालुक्यातील धरणग्रस्त गावांचे पुनर्वसन करताना ती गावे अनेक ठिकाणी वसवली गेली आहेत. त्यामुळे मुळातच त्यांची लोकसंख्या कमी असल्याने त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अशा पुनर्वसित गावातील शाळा पटसंख्येच्या कारणामुळे बंद करणे अन्यायकारक आहे. याची निवेदने जिल्हा संघामार्फत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, शिक्षण सभापती यांना देण्यात येणार असून, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष सर्व पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना भेटून निवेदने देणार असल्याचे मच्छिंद्र मुळीक यांनी सांगितले. यावेळी शिक्षक बँकेचे अध्यक्ष बलवंत पाटील, उपाध्यक्ष मोहन निकम, जिल्हा संघाचे नेते राजेंद्र घोरपडे, सरचिटणीस महेंद्र जानुगडे, सुरेंद्र भिलारे, कार्याध्यक्ष राजेंद्र बोराटे, संपर्कप्रमुख संतोष जगताप, प्रवीण घाडगे, महेंद्र इथापे, बजरंग वाघ, रघुनाथ दळवी, लालासाो भंडलकर, विक्रम डोंगरे, पी. जी. भरगुडे, सागर माने, विजय खरात, तात्या सावंत, वैभव डांगे, चंद्रकांत आखाडे, राजकुमार जाधव, शंकर जांभळे, अनिल शिंदे, दत्तात्रय कोरडे, वैशाली जगताप, गणेश तोडकर, भगवान धायगुडे, बंडोबा शिंदे, राजाराम खाडे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) शासनाच्या योजनेलाच खीळ!शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचावी म्हणून शासनाने वस्तीशाळांसारखे उपक्रमही सुरू केले होते. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या चांगलीच वाढली होती. विद्यार्थ्यांना मध्यान आहार देवून विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याचे यशस्वी प्रयत्न शासनाकडून सुरू असताना दुसरीकडे केवळ गुगल मॅपचा आधार घेवून डोंगरी शाळा बंद करण्याची सुचनेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शासनाच्या योजनेलाच खीळ देण्याचा प्रकार होईल, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.