शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

शेतकरी कंगाल...दलाल मात्र होताहेत मालामाल !

By admin | Updated: December 4, 2014 23:47 IST

व्यवसायात गौडबंगाल : दूध खरेदी दरात कपात; विक्री दर मात्र वाढलेलेच

कमलाकर खराडे - पिंपोडे बुद्रूक -दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याला दूध व्यवसायाचे गणितच सुटेनासे झाले आहे. हा व्यवसाय करणारा शेतकरी दिवसेंदिवस कंगाल होत चालला आहे. तर दुसरीकडे मात्र, दलाल मालामाल होताना दिसत आहेत. दूध खरेदीदरामध्ये प्रचंड घट झाल्यानंतरही त्याची विक्री किमंत मात्र तीच आहे. महिनोनमहिने दूधसाठा शिल्लक राहू शकत नाही. यावरुन या व्यवसायातील गौडबंगाल दिसून येते.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरचे दर निम्म्याहून अधिक कमी झालेले आहेत. पावडरचा साठा संस्थांकडे पडून राहत आहे. निर्यातीवर वाढीव अनुदान मिळाले पाहिजे. अतिरिक्त दूध संकलन होत आहे, हे व असंख्य प्रश्न दूध संस्थापुढे उभे असल्याचे भासवून दुधाच्या खरेदी दरामध्ये तब्बल चार रुपये प्रतिलिटर घट करण्यात आली. मात्र, पिशवीबंद दुधाचे विक्री दर मात्र जैसे थे आहेत. त्याचबरोबर या व्यवसायातील दलालांचे कमिशनही कमी झाल्याचे ऐकिवात नाही. याउलट आपला माल जास्त ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी वाढीव कमिशनचे गाजर दाखवून किरकोळ विक्रेत्यांना मालामाल होण्याची आयती संधीच दूध संस्थांनी उपलब्ध करुन दिलेली आहे.सर्व यंत्रणा केवळ दूध उत्पादक शेतकऱ्याला भरडण्याचा प्रयत्न करीत आहेत. खरेदी दरामध्ये कपात करताना कोणत्याही संस्थेने आपल्या संकलन केंद्राचे कमिशन कमी केलेले नाही. संकलन केंद्रांना अतिरिक्त खर्चासाठी ही प्रतिलिटर प्रमाणे पैसे दिले जातात, आणि तोट्याचे गणित दिसू लागले की शेतकऱ्याच्या दुधावर डल्ला मारला जातो. हे कितपत योग्य आहे. बाजारात मिळणाऱ्या पिशवी बंद गाईच्या दुधाची किंमत प्रतिलिटर ४२ रुपये आहे. वितरकाला सुमारे चार रुपये कमिशन मिळते. सध्या गाईचे दूध २० रुपये प्रमाणे खरेदी होते. मग दूध संस्थेकडे दूध पोहोच करण्यापासून ते पिशवीत बंद करून ग्राहकांना देण्यापर्यंत तब्बल २० रुपये प्रतिलिटर वाढीव किंमत किरकोळ ग्राहकाला मोजावी लागते. दर कमी झाल्यावर विक्रीही कमी होताना दिसत नाही. फक्त दूध पावडर आणि अतिरिक्त दूध संकलन या गोष्टी पुढे करून उत्पादकाला वेठीस धरण्यात येत आहे. धवलक्रांतीला चूना...काही वर्षांंपूर्वी राज्यशासनाने हरितक्रांतीची घोषणा केली होती. राज्यातील सर्व शेती सिंचनाखाली आणून हरित क्रांतीचे ते स्वप्न होते. ते स्वप्न अजूनतरी स्वप्न्च राहिलेले आहे. कारण अजूनतरी हरितक्रांती प्रत्यक्षात आलेली नाही. याच धर्तीवर राज्य दूध उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण करण्याबरोबरच अग्रेसर करण्यासाठीही धवलक्रांतीची घोषणा करण्यात आली होती. मात्र, दूध संस्था आणि दूध भेसळ करणाऱ्यांमुळे प्रामाणिकपणे दूध उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला आणि त्याच्या प्रयत्नांना चूना लावण्याचे पातक दूध संस्था करीत आहेत. त्यामुळे धवलक्रांतीची केवळ घोषणाच राहू शकते. कारण या स्थितीत प्रामणिक शेतकरी तग धरू शकत नाही.दुध संकलन केंद्रापासून त्यावर प्रक्रिया होऊन ग्राहकापर्यंत पोहोच करण्यासाठी एक लिटर दुधासाठी किमान आठ ते दहा रुपये खर्च येतो. त्याचबरोबर घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांचे कमिशन या सगळ्यांचा विचार करता सध्या तरी यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही.- डॉ. राजेंद्र महाडिक, संकलन प्रमुखदूध व्यवसायाचे अर्थकारण खूप अवघड झाले आहे. पशुधन जगवणे माणूस जगविण्यापेक्षा जड होत आहे. शासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढणे अपेक्षित आहे. दूध संस्था फक्त शेतकऱ्याचाच नकळतपणे खिसा कापत आहेत. हे योग्य नाही.- बाळासाहेब गार्डी, दुग्धउत्पादक शेतकरी, पिंपोडे बुद्रुक