शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

शेतकरी कंगाल...दलाल मात्र होताहेत मालामाल !

By admin | Updated: December 4, 2014 23:47 IST

व्यवसायात गौडबंगाल : दूध खरेदी दरात कपात; विक्री दर मात्र वाढलेलेच

कमलाकर खराडे - पिंपोडे बुद्रूक -दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याला दूध व्यवसायाचे गणितच सुटेनासे झाले आहे. हा व्यवसाय करणारा शेतकरी दिवसेंदिवस कंगाल होत चालला आहे. तर दुसरीकडे मात्र, दलाल मालामाल होताना दिसत आहेत. दूध खरेदीदरामध्ये प्रचंड घट झाल्यानंतरही त्याची विक्री किमंत मात्र तीच आहे. महिनोनमहिने दूधसाठा शिल्लक राहू शकत नाही. यावरुन या व्यवसायातील गौडबंगाल दिसून येते.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरचे दर निम्म्याहून अधिक कमी झालेले आहेत. पावडरचा साठा संस्थांकडे पडून राहत आहे. निर्यातीवर वाढीव अनुदान मिळाले पाहिजे. अतिरिक्त दूध संकलन होत आहे, हे व असंख्य प्रश्न दूध संस्थापुढे उभे असल्याचे भासवून दुधाच्या खरेदी दरामध्ये तब्बल चार रुपये प्रतिलिटर घट करण्यात आली. मात्र, पिशवीबंद दुधाचे विक्री दर मात्र जैसे थे आहेत. त्याचबरोबर या व्यवसायातील दलालांचे कमिशनही कमी झाल्याचे ऐकिवात नाही. याउलट आपला माल जास्त ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी वाढीव कमिशनचे गाजर दाखवून किरकोळ विक्रेत्यांना मालामाल होण्याची आयती संधीच दूध संस्थांनी उपलब्ध करुन दिलेली आहे.सर्व यंत्रणा केवळ दूध उत्पादक शेतकऱ्याला भरडण्याचा प्रयत्न करीत आहेत. खरेदी दरामध्ये कपात करताना कोणत्याही संस्थेने आपल्या संकलन केंद्राचे कमिशन कमी केलेले नाही. संकलन केंद्रांना अतिरिक्त खर्चासाठी ही प्रतिलिटर प्रमाणे पैसे दिले जातात, आणि तोट्याचे गणित दिसू लागले की शेतकऱ्याच्या दुधावर डल्ला मारला जातो. हे कितपत योग्य आहे. बाजारात मिळणाऱ्या पिशवी बंद गाईच्या दुधाची किंमत प्रतिलिटर ४२ रुपये आहे. वितरकाला सुमारे चार रुपये कमिशन मिळते. सध्या गाईचे दूध २० रुपये प्रमाणे खरेदी होते. मग दूध संस्थेकडे दूध पोहोच करण्यापासून ते पिशवीत बंद करून ग्राहकांना देण्यापर्यंत तब्बल २० रुपये प्रतिलिटर वाढीव किंमत किरकोळ ग्राहकाला मोजावी लागते. दर कमी झाल्यावर विक्रीही कमी होताना दिसत नाही. फक्त दूध पावडर आणि अतिरिक्त दूध संकलन या गोष्टी पुढे करून उत्पादकाला वेठीस धरण्यात येत आहे. धवलक्रांतीला चूना...काही वर्षांंपूर्वी राज्यशासनाने हरितक्रांतीची घोषणा केली होती. राज्यातील सर्व शेती सिंचनाखाली आणून हरित क्रांतीचे ते स्वप्न होते. ते स्वप्न अजूनतरी स्वप्न्च राहिलेले आहे. कारण अजूनतरी हरितक्रांती प्रत्यक्षात आलेली नाही. याच धर्तीवर राज्य दूध उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण करण्याबरोबरच अग्रेसर करण्यासाठीही धवलक्रांतीची घोषणा करण्यात आली होती. मात्र, दूध संस्था आणि दूध भेसळ करणाऱ्यांमुळे प्रामाणिकपणे दूध उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला आणि त्याच्या प्रयत्नांना चूना लावण्याचे पातक दूध संस्था करीत आहेत. त्यामुळे धवलक्रांतीची केवळ घोषणाच राहू शकते. कारण या स्थितीत प्रामणिक शेतकरी तग धरू शकत नाही.दुध संकलन केंद्रापासून त्यावर प्रक्रिया होऊन ग्राहकापर्यंत पोहोच करण्यासाठी एक लिटर दुधासाठी किमान आठ ते दहा रुपये खर्च येतो. त्याचबरोबर घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांचे कमिशन या सगळ्यांचा विचार करता सध्या तरी यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही.- डॉ. राजेंद्र महाडिक, संकलन प्रमुखदूध व्यवसायाचे अर्थकारण खूप अवघड झाले आहे. पशुधन जगवणे माणूस जगविण्यापेक्षा जड होत आहे. शासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढणे अपेक्षित आहे. दूध संस्था फक्त शेतकऱ्याचाच नकळतपणे खिसा कापत आहेत. हे योग्य नाही.- बाळासाहेब गार्डी, दुग्धउत्पादक शेतकरी, पिंपोडे बुद्रुक