शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

माजी विद्यार्थी रंगले आठवणीत

By admin | Updated: January 2, 2015 23:59 IST

उंडाळेत स्नेहमेळावा : उंडाळकर विद्यालयात जमले जुने सवंगडी

उंडाळे : येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्रेहमेळावा उत्साहात पार पडला़ शैक्षणिक जीवनामधून व्यवहारिक, प्रापंचिक जीवनात स्थिरावलेल्या विद्यार्थ्यांच्या शालेय आठवणी पुन्हा जागा होऊन माजी विद्यार्थीही शालेय जीवनातील आठवणीत हरवून गेले़ येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयातील २००८-२००९ च्या माजी विद्यार्थ्यांनी नुकताच स्रेहमेळावा आयोजित केला होता़ त्यानिमित्ताने शिक्षण संपवून बाह्य जगतात विविध ठिकाणी कार्यरत असणारे आपले जुने सवंगडी भेटतील, जुन्या आठवणी जागृत होतील, शिक्षकांची भेट होईल, त्यांच्याप्रती आदर व्यक्त करणे. ज्या शाळेने स्वत:च्या पायावर उभे केले तिच्या ऋणातून मुक्त होणे, या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते़ त्यामधील अनेकजण शिक्षण संपवून विविध व्यावसायिक, नोकरीमध्ये कार्यरत आहेत़ त्या प्रत्येकाने आपल्याबरोबरील जुन्या मित्रांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला़ तर अनेकांना आपले जुने मित्र फार वर्षांनी भेटले़ त्यावेळी मित्रांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसांडून वाहत होता़ यावेळी त्यांच्या मनात निर्माण झालेल्या भावनांचा कल्लोळ त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता़ अनेकांना त्याचे जुने शिक्षक भेटले़ त्यांच्या हातचा मार खाऊन शिक्षणात यशस्वी झालेल्या या विद्यार्थ्यांनी मोठ्या मनोभावे आपल्या शिक्षकांचे आशीर्वाद घेतले़ शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी उपस्थित शिक्षकांना शाल, श्रीफळ व शिल्ड भेट देऊन त्यांचा सन्मान केला़ प्राचार्य एम़ बी़ पाटील अध्यक्षस्थानी होते़ यावेळी एस़ एस़ पवार, बी़ पी़ मिरजकर, आनंदराव जानुगडे, शंकर आंबवडे यांची भाषणे झाली़ मेळावा यशस्वी करण्यासाठी अक्षय पाटील, सुमित शिंदे, विकास पाटील, प्रज्ञा पाटील, प्रीती कांबळे आदींनी परिश्रम घेतले़ प्रीती कांबळे यांनी प्रास्ताविक केले़ प्रज्ञा पाटील यांनी सूत्रसंचालन केले़ अक्षय पाटील यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)