शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

बैठकांसह कार्यक्रमांना बोलावले जात नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:15 IST

दरम्यान, पाणी टंचाई जाणवणाऱ्या गावांचे प्रस्ताव सादर होणे गरजेचे आहे. मात्र, जलजीवन मिशन अंतर्गत असे प्रस्ताव गावातून येतच नसतील ...

दरम्यान, पाणी टंचाई जाणवणाऱ्या गावांचे प्रस्ताव सादर होणे गरजेचे आहे. मात्र, जलजीवन मिशन अंतर्गत असे प्रस्ताव गावातून येतच नसतील तर संबंधित गावांचे ग्रामसेवक काय करतायत? असा प्रश्न उपस्थित करून ग्रामसेवकांच्या कारभारावर उपसभापती रमेश देशमुख यांनी ताशेरे ओढले.

येथील पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी सभागृहात पार पडली. सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांच्यासह सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सभेच्या सुरूवातीला पाणी पुरवठा विभागाकडून आढावा देण्यात आला. आकाईचीवाडी, भुरभुशी, वानरवाडी, जिंती, ओंड, वहागाव, खुबी, हेळगाव, वाघेश्वर, कांबीरवाडी, चिखली, खराडे, नवीन कवठे, बानुगडेवाडी, गोटे, वनवासमाची-खोडशी, धोंडेवाडी, वनवासमाची-सदाशिवगड, धोंडेवाडी-डिचोली पुनर्वसन, नांदलापूर, कालेटेक, सुर्ली, कामथी, संजयनगर, तासवडे, बामणवाडी, पवारवाडी-नांदगाव, गोसावेवाडी, खोडजाईवाडी, घोलपवाडी, गायकवाडवाडी, बानुगडेवाडी, अंतवडी, कालेटेक, किवळ, वडोली भिकेश्वर, रिसवड, कोरीवळे व डफळवाडी या गावांमध्ये भविष्यात पाणी टंचाई भासू शकते. त्याचा आराखडा जिल्हा परिषदेला सादर करण्यात आल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

उपसभापती रमेश देशमुख यांनी गावातून जलजीवन मिशन अंतर्गत प्रस्तावच येत नसतील तर ग्रामसेवक काय करताहेत? अशी विचारणा केली. गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी पाणी पुरवठा विभागाने ग्रामसेवकांना माहिती देऊन प्रस्ताव तयार करुन घेतले पाहिजेत, अशा सूचना केल्या.

पंचायत समिती संदर्भातील अनेक बैठकांना आणि पंचायत समितीच्या विविध विभागांच्या कार्यक्रमांना सदस्यांना बोलवलेच जात नाही, असा आरोप सभापती प्रणव ताटे, सदस्या फरिदा इनामदार, अर्चना गायकवाड, सदस्य रमेश चव्हाण, अ‍ॅड. शरद पोळ यांनी उपस्थित केला. सभापती ताटे यांनी संबंधित बैठकांना सदस्यांना का सांगितले जात नाही अशी विचारणा करुन त्या बैठकांना किती ग्रामसेवक उपस्थित असतात? ग्रामसेवकच नसतील तर कसे आराखडे करणार असे सुनावले. सदस्या फकीर यांनीही बैठकांना, कार्यक्रमांना बोलवले जात नाही हे तीन वर्षे आम्ही सांगत आहोत, तरीही सुधारणा होत नाही, मग त्याचा उपयोग काय ? असे उद्विग्नपणे सांगितले. सदस्य चव्हाण यांनीही सुधारणा होणार नसेल तर तसे सांगा असे म्हणाले. त्यावर सभापती ताटे यांनी माफी मागून उपयोग नाही, यापुढे सुधारणा दिसली पाहिजे, असे खडसावले.

- चौकट

कऱ्हाड, मलकापुरात भरणार शेतकरी बाजार

तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला यांनी कृषी विभागाच्या नवीन योजनांची माहिती देऊन संत सावता माळी शेतकरी बाजार कऱ्हाड शहर आणि मलकापूरमध्ये भरवण्यात येणार असल्याचे सांगितले. सभेत बांधकाम, शिक्षण, लघू पाटबंधारे, ग्रामपंचायतसह अन्य विभागांचा आढावा झाला. उपसभापती देशमुख यांनी आभार मानले.

- चौकट

शेतकऱ्यांचे १३२ कोटी वीज बिल थकीत

वीज कंपनीच्या आढाव्यावेळी ३५६ शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शन देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची वीज थकबाकी १३२ कोटी आहे. त्यांना वीज बिल भरण्यामध्ये सूट देण्यात आली. त्यासाठी गावोगावी बैठका घेण्यात येत असल्याचेही सांगितले. स्ट्रीट लाईटसाठी जिल्हा नियोजनमधून पैसे मिळावे, अशी मागणी सदस्य देवराज पाटील यांनी केली.