शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

खाद्यतेल स्थिर; कांद्याचा भाव १०० रुपयांनी उतरला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:42 IST

सातारा : मागील काही दिवसांपासून खाद्यतेलाचे दर स्थिर असून कांद्याचा भाव क्विंटलमागे १०० रुपयांनी उतरला आहे. तर इतर भाज्या ...

सातारा : मागील काही दिवसांपासून खाद्यतेलाचे दर स्थिर असून कांद्याचा भाव क्विंटलमागे १०० रुपयांनी उतरला आहे. तर इतर भाज्या स्वस्त असतानाच वाटाण्याला क्विंटलला ६ हजारापर्यंत दर मिळत आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यांतून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. रविवारी बाजार समितीत ४३१ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. तर कांद्याची १३५ क्विंटलची आवक राहिली. कांद्याला क्विंटलला १०० पासून १९००पर्यंत दर मिळाला. तर वांग्याचा दर कमी झाल्याचे दिसून आले. वांग्याला १० किलोला १०० ते १५० रुपये दर मिळाला. टोमॅटोला ६० ते ७० रुपये आणि फ्लॉवरला १० किलोला १५० ते २०० रुपये भाव आला. आल्याला क्विंटलला २ हजारांपर्यंत तर लसणाला ६ हजारांपर्यंत दर मिळाल्याचे मिळाला. गेल्या काही महिन्यांपासून आले आणि लसणाचा दर स्थिर असल्याचे दिसून आले. तर वाटाण्याचा भाव वाढत आहे. रविवारी क्विंटलला ५ ते ६ हजारापर्यंत दर मिळाला.

खाद्यतेल बाजारभाव...

सध्या तरी खाद्यतेलाचा दर स्थिर आहे. पण, काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने तेलावरील आयात शुल्क कमी केले आहे. त्यामुळे दर उतरण्याची शक्यता आहे. साताऱ्यात सूर्यफूल व शेंगदाणा तेल डबा २४०० ते २४५० रुपयांना मिळत आहे. तर सोयाबीनचा २४०० व पामतेलचा २१०० रुपयांना मिळत आहे. पाऊचचा दरही स्थिर आहे.

डाळिंबाची आवक...

बाजार समितीत सध्या डाळिंब, सफरचंद, सीताफळ आणि संत्र्याची आवक होत आहे. रविवारी सफरचंदाची ४० तर डाळिंबाची १० क्विंटलची आवक झाली.

शेवगा दरात सुधारणा...

बाजार समितीत अनेक भाज्यांचे दर कमी झालेत. कोबी आणि बटाट्याला भाव कमी आहे. कोबीला १० किलोला ६० ते ८०, बटाट्याला १२० ते १४० रुपये भाव आला. भेंडीला १०० ते १५०, शेवगा शेंग ४०० ते ५००, गवारला १०० ते १२० रुपये दर आला. गवारचा दर कमी तर शेवग्याचा वाढला आहे.

प्रतिक्रिया...

खाद्यतेलाचा दर स्थिर आहे. पण, केंद्र शासनाने खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत खाद्यतेलाचा दर थोडा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

मागील काही काही दिवसांत भाज्यांचा भाव कमी-जास्त होत आहे. तरीही कोणतीही भाजी ही ४० रुपयांच्या खाली नाही. काही भाज्यांना तर किलोला ८० रुपये मोजावे लागतात. मेथी, शेपू पेंडी १० रुपयांपुढे मिळत आहे.

- कविता काळे, ग्राहक

बाजार समितीत शेतमाल नेल्यास दर कमी मिळतो. त्यातच आता कांद्याचा दरही कमी झाल्याने खर्च निघणेही अवघड झालेले आहे. वांगी, कोबी आणि फ्लॉवरला दर कमीच मिळतोय. सध्या वाटाण्याला तेवढा चांगला दर मिळत आहे.

- रामराव पवार, शेतकरी

..........................................................................................................................................................................................