शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

तेराजणांना मिळाला लाल दिवा; अनेकांनी राखले आपले गड कायम

By admin | Updated: September 16, 2014 23:27 IST

सातारा जिल्ह्यात झाले साठ आमदार ‘लोकनियुक्त’

मोहन मस्कर-पाटील - सातारा -१९५२ ते २00९ या काळात महाराष्ट्रात तेरा विधानसभा निवडणुका झाल्या. यामध्ये महाराष्ट्र राज्य स्वतंत्र होण्यापूर्वीचा काही काळ आहे. या ५७ वर्षांच्या कालावधीत सातारा जिल्ह्यात आजअखेर साठजणांना आमदार तर तेराजणांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यापैकी काहीजण सात, पाच, चार, तीन, दोनवेळा आमदार म्हणून कार्यरत राहिले आहेत. १९५२, १९५७ मध्ये जिल्ह्यात अकरा आमदार होते. त्यावेळी सातारा पूर्व, सातारा ग्रामीण, फलटण-माण, माण ग्रामीण, जावळी, खटाव, वाई-खंडाळा, पाटण कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर असे मतदारसंघ होते. १९६२ मध्ये एक मतदारसंघ कमी झाल्याने दहा मतदारसंघ झाले. २00४ पर्यंत हेच कायम होते. २00९ च्या निवडणूका मतदारसंघ पुनर्रचनेनुसार झाल्या आणि फक्त आठच मतदारसंघ राहिले.केवळ सातारा नव्हे तर राज्याच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण, किसन वीर, लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी आपला दबदबा कायम ठेवला.मात्र, यशवंतराव चव्हाणच सर्वात प्रभावी राहिले. १९५२ पासून हयात असेपर्यंत यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई मंत्री होते. त्यापाठोपाठ मालोजीराजे नाईक-निंबाळकर, यशवंतराव मोहिते, प्रतापराव भोसले, अभयसिंहराजे भोसले, विलासराव पाटील-उंडाळकर, मदनराव पिसाळ, श्याम अष्टेकर, भाऊसाहेब गुदगे, विक्रमसिंह पाटणकर, रामराजे नाईक-निंबाळकर आणि आता शशिकांत शिंदे यांना मंत्री होता आले.यशवंतराव मोहिते, चिमणराव कदम, दादासाहेब जगताप, केशवराव पाटील, मदनराव पिसाळ, भाऊसाहेब गुदगे, विष्णू सोनावणे, रामराजे नाईक-निंबाळकर, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील तीन तर कॉ. व्ही. एन. पाटील, प्रभावती सोनावणे, कृष्णचंद्र भोईटे, पी. डी. पाटील हे दोनवेळा आमदार झाले.