शहरं
Join us  
Trending Stories
1
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
2
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
3
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
4
Pune Rape: तोंडावर स्प्रे फवारून तरुणीवर बलात्कार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्यानं पुणे हादरलं
5
Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं?
6
Bank of Baroda मध्ये जमा करा २,००,००० रुपये; मिळेल, ₹४७,०१५ चं फिक्स व्याज आणि हमीही, जाणून घ्या
7
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
8
आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं
9
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
10
कार खरेदीवर ४ लाखांपर्यंत डिस्काउंट; कंपन्या करत आहेत ‘स्टॉक’ क्लीअर
11
सिबिल स्कोअर खराब होता, स्टेट बँकेनं नोकरीच दिली नाही; कोर्टानंही म्हटलं, "पैशांच्या बाबतीत..."
12
भारताची पाकिस्तानवर आणखी एक कारवाई; सेलिब्रिटींबाबत घेतला 'असा' निर्णय!
13
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज
14
"अभिनेत्यांना सकाळी डाएट फुड अन् रात्री ड्रग्स हवे", पहलाज निहलानींचा खुलासा; अक्षयबद्दल म्हणाले...
15
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
16
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
17
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
18
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
19
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
20
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली

तेराजणांना मिळाला लाल दिवा; अनेकांनी राखले आपले गड कायम

By admin | Updated: September 16, 2014 23:27 IST

सातारा जिल्ह्यात झाले साठ आमदार ‘लोकनियुक्त’

मोहन मस्कर-पाटील - सातारा -१९५२ ते २00९ या काळात महाराष्ट्रात तेरा विधानसभा निवडणुका झाल्या. यामध्ये महाराष्ट्र राज्य स्वतंत्र होण्यापूर्वीचा काही काळ आहे. या ५७ वर्षांच्या कालावधीत सातारा जिल्ह्यात आजअखेर साठजणांना आमदार तर तेराजणांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यापैकी काहीजण सात, पाच, चार, तीन, दोनवेळा आमदार म्हणून कार्यरत राहिले आहेत. १९५२, १९५७ मध्ये जिल्ह्यात अकरा आमदार होते. त्यावेळी सातारा पूर्व, सातारा ग्रामीण, फलटण-माण, माण ग्रामीण, जावळी, खटाव, वाई-खंडाळा, पाटण कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर असे मतदारसंघ होते. १९६२ मध्ये एक मतदारसंघ कमी झाल्याने दहा मतदारसंघ झाले. २00४ पर्यंत हेच कायम होते. २00९ च्या निवडणूका मतदारसंघ पुनर्रचनेनुसार झाल्या आणि फक्त आठच मतदारसंघ राहिले.केवळ सातारा नव्हे तर राज्याच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण, किसन वीर, लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी आपला दबदबा कायम ठेवला.मात्र, यशवंतराव चव्हाणच सर्वात प्रभावी राहिले. १९५२ पासून हयात असेपर्यंत यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई मंत्री होते. त्यापाठोपाठ मालोजीराजे नाईक-निंबाळकर, यशवंतराव मोहिते, प्रतापराव भोसले, अभयसिंहराजे भोसले, विलासराव पाटील-उंडाळकर, मदनराव पिसाळ, श्याम अष्टेकर, भाऊसाहेब गुदगे, विक्रमसिंह पाटणकर, रामराजे नाईक-निंबाळकर आणि आता शशिकांत शिंदे यांना मंत्री होता आले.यशवंतराव मोहिते, चिमणराव कदम, दादासाहेब जगताप, केशवराव पाटील, मदनराव पिसाळ, भाऊसाहेब गुदगे, विष्णू सोनावणे, रामराजे नाईक-निंबाळकर, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील तीन तर कॉ. व्ही. एन. पाटील, प्रभावती सोनावणे, कृष्णचंद्र भोईटे, पी. डी. पाटील हे दोनवेळा आमदार झाले.