शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

विघ्नहर्त्यानं केलं विक्रेते, व्यापाऱ्यांचं विघ्न दूर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना संकटामुळे व्यापारी, विक्रेत्यांची आर्थिक घडी विस्कटली. अनेक उद्योग, व्यवसाय डबघाईला आले. अशा संकटकाळात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोना संकटामुळे व्यापारी, विक्रेत्यांची आर्थिक घडी विस्कटली. अनेक उद्योग, व्यवसाय डबघाईला आले. अशा संकटकाळात विघ्नहर्त्याचे आगमन झाले अन् व्यापारी, विक्रेत्यांचं विघ्न दूर झालं. गणेशोत्सवाच्या निमित्ताने तब्बल दीड वर्षानंतर जिल्ह्याची बाजारपेठ गजबजून गेली. अगदी सुईपासून सोन्यापर्यंत झालेल्या खरेदी-विक्रीतून जिल्ह्यात कोट्यवधींची उलाढाल झाली.

सध्या कोरोना संक्रमणाचा काळ सुरू आहे. या कोरोनाचा सर्वाधिक फटका उद्योग, व्यवसाय, व्यापारी व हातावर पोट असलेल्या छोट्या-मोठ्या विक्रेत्यांना बसला. सततच्या संचारबंदीमुुळे अनेक व्यवसाय डबघाईला आले. अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही गंभीर बनला. मात्र, गणरायाचे आगमन झाल्यापासून बाजारपेठेत पूर्वीसारखेच चैतन्य आले आहे. गणपती व गौराईसाठी लागणाऱ्या वस्तूंनी जिल्ह्याची बाजारपेठ गजबजून गेली. या वस्तूंच्या खरेदी-विक्रीतून अनेक छोट्या-मोठ्या व्यापारी व विक्रेत्यांना दिलासा मिळाला. बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले. संकटकाळात विघ्नहर्त्याने विघ्न दूर केल्याने व्यापारी, विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

(चौकट : फोटो १६ जावेद ०१)

मोदक, पेढ्यांचा वाढला गोडवा

उत्सवकाळात कंदी पेढे व मोदकांची जवळपास वीस टन विक्री झाली. इतर फराळाचे साहित्यही यंदा महागले होते. तरीही नागरिकांनी पेठे, मिठाई व तयार फराळाची भरभरून खरेदी केली. मिठाईने विक्रेत्यांमध्ये गोडवा आणण्याचे काम केले.

(चौकट : फोटो : १६ जावेद ०२)

भाजीपाल्याने अनेकांना तारले

गणेशोत्सव सुरू झाल्यापासून सर्वच पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र, पालेभाज्यांची मागणी काही कमी झाली नाही. प्रदीर्घ कालावधीनंतर भाजीविक्रेत्यांचे चेहरे आनंदाने फुलले. अजूनही पालेभाज्यांना मागणी सुरूच आहे.

(चौकट : फोटो : १६ फोटो ०३)

पूजेचे साहित्य, हारांना मागणी

अगरबत्ती, धूप, कापूर, लोबाण, फुले, हार यांसह इतर पूजेच्या साहित्याची जिल्ह्यात मोठी आवक झाली होती. बाजारपेठ खुली झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पूजेच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. या व्यतिरिक्त सजावटीो साहित्यही यंदा अधिक विकले गेले.

(चौकट : फोटो १६ जावेद ०४)

फळांनाही आली लाली...

गणेशोत्सव सुरू झाल्यापासून केली, सफरचंद, संत्री, मोसंबी, डाळिंबी अशा फळांच्या मागणीत वाढ झाली आहे. सर्वच फळांच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. असे असले तरी गेल्या आठ दिवसांत फळांच्या खरेदी-विक्रीतून लाखोंची उलाढाल झाली आहे.

(चौकट : फोटो १६ जावेद ०५)

सुवर्णपेढीला झळाळी

सराफा व्यावसायिकांना देखील लॉकडाऊनचा प्रचंड मोठा फटका बसला. दागिन्यांचे दरही सातत्याने वाढत होते. त्यामुळे सराफा बाजारात मंदीचे सावट पसरले होते. गणेशोत्सवात ही मंदी काही प्रमाणात दूर झाली अन् भाविकांनी गणपती व गौराईसाठी दागिन्यांची खरेदी केली.