शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
3
काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
4
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
5
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
6
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
7
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
8
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
9
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
10
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
11
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
12
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
13
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
14
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
15
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
16
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
17
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
18
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
19
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
20
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

फूलकळीसाठी शेतीला जाळीचं पांघरूण

By admin | Updated: August 10, 2015 21:17 IST

शेतकऱ्यांची क्लृप्ती : पाखरांना अटकाव करण्यासाठी होतोय जाळीचा वापर

बागायती क्षेत्रामध्ये उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले असल्याने त्याच्या सोबतीला पूरक व्यवसाय म्हणून माळव्याची पिके घेतली गेली आहेत. उसाला नियमित पाणी दिले जात असल्याने माळव्याच्या पिकांनाही त्याबरोबरच पाणी दिले जाते. मात्र, सध्या माळव्यांच्या पिकांवरील फूलकळ्या पक्षी खात असून, त्याच्या पासून बचाव करण्यासाठी शेतकरी नेट जाळींचा वापर करत आहेत. खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांमध्ये कडधान्यांची पिके घेण्याचे प्रमाण जास्त असते. खरीप हंगामात घेवडा, हायब्रीड, सोयाबीन, चवळी, उडीद, मका आदी पिके घेतली जातात, तर रब्बी हंगामात शाळू पीक घेतले जाते. जिरायत क्षेत्र मोठे असल्याने पक्ष्यांना हवे ते खाद्य मिळते. त्यामुळे पक्ष्यांचा या क्षेत्रात जास्त वावर असतो. शेतकऱ्यांनी सध्या आपल्या शेतशिवारात उसाबरोबर माळव्यांचीही पिके घेतली आहेत. या माळव्यांच्या पिकांवर फूलकळी आल्या असून, त्या पक्ष्यांकडून खाल्ल्या जात आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. नदी, ओढे व विहिरींवर जलचरांचे प्रमाण अत्यल्प असल्याने पक्ष्यांनी वेलवर्गीय माळव्याकडे मोर्चा वळविला आहे. पक्षी काकडी, दोडका, कारली या पिकांवरील फुले खात आहेत. सुमारे सात-आठ फुट उंचीवर जाळी बांधण्यात आली असून, चारी बाजूंनी दोर बांधल्यामुळे वाऱ्याचा त्याला धोका होत नाही. जाळींना लहान छिद्रे असल्यामुळे पक्ष्यांना आत जाता येत नाही. सध्या कोपर्डे हवेली परिसरात काकडी, दोडका, कारली आदी वेलवर्गीय पिकांचे संरक्षण होते.अलीकडच्या दोन वर्षांच्या काळामध्ये वेलवर्गीय पिकांना येणाऱ्या फूलकळ्या पक्षी खात असल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. त्यामुळे मी काकडी पिकाचे रक्षण करण्यासाठी नेट जाळीचा वापर करत आहे. - संतोष चव्हाण, शेतकरी, कोपर्डे हवेली नेट जाळीचे फायदे पक्ष्यांच्या बरोबर मोकाट कुत्री गारव्यासाठी वेलवर्गीय पिकांमध्ये येऊन शेतजमीन उकरून त्याठिकाणी झोपतात. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. इतर रानटी प्राण्यांपासून संरक्षण होण्यासाठी या जाळीची मदत होते. जाळीला नेट असल्यामुळे उत्पादनाचे नुकसान होण्याचे प्रमाण थांबते. जाळीची किंमत अशी एका एकराला १५ हजार रुपये किमतीची जाळी. सरासरी ही जाळी तीन वर्षं टिकते. माळव्याचे पीक काढल्यानंतर ही जाळी गुंडाळून ठेवावे लागते. जाळीचे प्रकार अन् वापर छोटी जाळी ही काकडीसाठी तर मोठी जाळी जनावरांपासून संरक्षण व्हावे म्हणून वापरली जाते. तंगूस दोऱ्यापासून तयार केली जाते. तसेच उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून शोभेची जाळी काही शेतकरी शेतशिवाराभोवती लावतात.