शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

‘उरमोडी’वर आओ-जाओ घर तुम्हारा!

By admin | Updated: August 7, 2014 00:14 IST

सुरक्षारक्षकच गायब : सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; वस्तूंची तोडफोड

परळी : माण-खटावसाठी वरदायी ठरलेल्या उरमोडी धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या धरणावर ‘आओ जाओ घर तुम्हारा’ स्थिती पाहावयास मिळत असून, सुरक्षारक्षकच गायब आहे. रेकॉर्ड रूमची दुरवस्था, विद्युत दिवे गायब अशा असंख्य समस्यांनी उरमोडी धरणाला ग्रासले आहे.५२ टीएमसी पाणीसाठा करण्याच्या राज्यपालांच्या कार्यक्रमांतर्गत सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यात उरमोडी नदीवर ९.९६ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेले धरण १४१७ कोटी रुपये खर्चून २०१० मध्ये बांधून पूर्ण करण्यात आले. ५०.१० मीटर उंच व १८६० मीटर लांबीच्या या धरणातील पाणीसाठ्यामुळे सातारा तालुक्यातील ८३०० हेक्टर तर दुष्काळी माण-खटाव तालुक्यांतील प्रत्येकी ९७२५ हेक्टर असे एकूण २७७५० हेक्टर क्षेत्र उलिताखाली आणण्याचे नियोजन करण्यात आले होते आणि ते पूर्णही झाले आहे. परंतु अशा या उरमोडी धरणाच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच असून, सुरक्षेचाच मुख्य प्रश्न ऐरणीवर आला आहे.सध्या उरमोडी धरण क्षेत्रात संततधार पाऊस पडत असल्याने धरण सुमारे ९५ टक्के भरले असून, त्याचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. सर्व परिसर हिरवाईने बहरला असून, या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. परंतु सुमारे १४१७ कोटी रुपये खर्चून केलेला प्रकल्प सुरक्षेविना धोक्याचा ठरू लागला आहे. २०१० साली उरमोडी जलाशयावर दोन्ही बाजूंना गेट उभारून त्या ठिकाणी सुरक्षारक्षक बसविण्यासाठी त्यांना खोल्या बनविल्या होत्या. परंतु त्या खोल्या नसून कचऱ्याचे डबे बनले आहेत. त्या सर्व खोल्यांच्या काचा फोडल्या आहेत. लोखंड गायब केले आहे. फिरायला येणारे पर्यटक त्या खोल्यांमध्ये कचरा टाकत आहेत. येथील रेकॉर्ड रूममध्ये २४ तास व्यक्ती असावी लागते. परंतु आजपर्यंत ही रेकॉर्ड रूम उघडलीही नाही. या खोलीला गेल्या दोन वर्षांपासून टाळे लावले आहे. रेकॉर्डऐवजी या खोलीत फक्त उंदराने कुरतडलेल्या वायर दिसत आहेत. नियंत्रण कक्षालाही टाळे लावले आहे. उरमोडीच्या दोन्ही बाजूंच्या कमानीवर ‘येथे फोटो काढण्यास मनाई आहे,’ असे फलक लिहिले आहेत. परंतु बहुतेक सर्वच पर्यटक केवळ धरणाचेच नव्हे, तर पाण्यात उतरून ‘फोटोसेशन’ करीत आहेत. सुरक्षारक्षक नसल्याने धरणावर कोणीही, कधीही येऊ शकते. गेट सदैव खुलेच असते. स्थानिक ग्रामस्थही सायंकाळी फिरायला धरणाच्या भिंतीवर येतात. सुरक्षारक्षक नसल्याने धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न रामभरोसे आहे. (वार्ताहर)लाखो रुपये पाण्यातउरमोडी धरणासाठी परिसरातील सुमारे साठ गावांचे पुनर्वसन करण्यात आले. उरमोडी धरणात २०१० पासून पाणीसाठा होण्यास सुरुवात झाली. याच वेळी लाखो रुपये खर्च करून उरमोडी धरण विभागामार्फत उरमोडीच्या संपूर्ण भिंतीवर विजेचे दिवे लावण्यात आले. गॅलरीमध्येही दिवे लावण्यात आले. सुमारे शंभर दिवे यावेळी बसविण्यात आले. परंतु ‘नव्याचे नऊ दिवस’ या उक्तीप्रमाणे हे दिवे काही दिवसच चालू राहिले. येणाऱ्या पर्यटकांनी सुमारे ८० दिवे फोडून टाकले, तर अनेक दिव्यांच्या वायर गायब केल्या आहेत. ओल्या पार्ट्या रंगल्याउरमोडी धरणावर सुरक्षा रक्षकांसाठी खोल्या केल्या आहेत. त्या ठिकाणची अवस्था दयनीय झाली असून, त्या ठिकाणी स्थानिक युवक आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांच्या ओल्या पार्ट्या रंगत आहेत. सायंकाळच्या वेळी प्रेमी युगुले आक्षेपार्ह वर्तनासाठी या खोल्यांचा बिनदिक्कत वापर करीत आहेत.