शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

डेंग्यूसह चिकुनगुनियाची स्थिती नियंत्रणात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:41 IST

कऱ्हाड : पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंग्यू, चिकुनगुनिया यासारखे रोग पसरू नयेत, यासाठी पालिकेने ‘फाईट द बाईट’ अभियान राबवले ...

कऱ्हाड : पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंग्यू, चिकुनगुनिया यासारखे रोग पसरू नयेत, यासाठी पालिकेने ‘फाईट द बाईट’ अभियान राबवले आहे. या अभियानांतर्गत शहरातील ४५ रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांचा दररोज आढावा घेण्यात येत असून, शहरात ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे पाच व चिकुनगुनियाचा एक रुग्ण आढळून आला आहे. शहरात या दोन्ही रोगांची स्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी विनाकारण भीती बाळगू नये, असे आवाहन पालिकेचे आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी केले आहे.

स्वच्छ सर्वेक्षणबरोबरच डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘फाईट द बाईट’ अभियान आरोग्य विभाग सातत्याने राबवत आहे. मे महिन्यापासून पालिकेने पुन्हा हे अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. मे, जून, जुलै या कालावधीत डासांचा प्रादुर्भाव वाढतो. पावसाचे पाणी घराच्या परिसरातील कंटेनर, रिकामी भांडी यामध्ये साचून डासांची उत्पत्ती होत असते. त्यामुळे या आजाराचे रुग्ण वाढतात, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे पालिकेने या अभियानांतर्गत डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आरोग्य विभाग व ग्रीन टीम यांच्या सहकार्याने प्रयत्न केले आहेत. याबरोबरच शहरात घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत असून, ग्रीनी व पालिकेचे आरोग्य कर्मचारी भेट देऊन पाणी साचणाऱ्या ठिकाणांचा शोध घेऊन तेथील डासांची उत्पत्ती थांबवत आहेत. नागरिकांना सूचना करत आहेत. फ्रिजच्या पाठीमागील कंटेनरमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. याबाबत नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे. याशिवाय रुग्णसंख्येवर लक्ष ठेवण्यासाठी शहरातील नामांकित अशा ४५ रुग्णालयांना ग्रीन टीमतर्फे रोज फोन करून तेथे या आजाराचे रुग्ण दाखल आहेत का, याची माहिती घेण्यात येते. १९ ऑगस्टअखेर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे पाच रुग्ण दाखल असून, चिकुनगुनियाचा केवळ एक रुग्ण दाखल आहे. तर जुलै महिन्यात पाच रुग्ण दाखल झाले होते.

- चौकट

‘त्या’ रुग्णांचा संबंध नाही!

शहर व परिसरात सुमारे तीनशे रुग्णालये असून, या रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी तालुक्यातून व शेजारच्या जिल्ह्यातून तसेच अन्य तालुक्यांतून रुग्ण दाखल होत असतात. त्यांचा कऱ्हाडची संबंध नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

- चौकट

रुग्ण आढळल्यास माहिती कळवावी

आशा सेविकांमार्फत शहरात सर्वेक्षण करण्यात येऊन ज्या परिसरात रुग्ण सापडतील, त्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेतली जात आहे. ही माहिती आरोग्य विभागाला कळविल्यानंतर परिसरात औषध फवारणी करण्यात येत आहे. रुग्ण आढळल्यास आरोग्य विभागाला तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी केले आहे.