शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

पत टिकविण्याचे आव्हान : खांदेवाले

By admin | Updated: December 1, 2014 00:22 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंडित नेहरूंनी दिलेल्या याबाबतच्या इशाऱ्याचा विसर पडला आहे.

सातारा : ‘भारतीय अर्थव्यवस्था अमेरिकन साम्राज्यवादाच्या विळख्यात अडकली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंडित नेहरूंनी दिलेल्या याबाबतच्या इशाऱ्याचा विसर पडला आहे. त्यामुळे जगामध्ये पत टिकवणे व संयमित पर्यायी संस्कृती निर्माण करण्याचे मोठे आव्हान देशापुढे आहे,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केले.संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या ‘बदलता भारत’ या विषय सूत्राच्या थोरांच्या स्मृती व्याख्यानमालेत ‘भारताच्या आर्थिक धोरणाची दिशा व परिणाम’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अण्णासाहेब होवाळे होते. प्रारंभी महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून डॉ. खांदेवाले यांनी अभिवादन केले. यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे उपस्थित होते.डॉ. खांदेवाले म्हणाले, ‘देशात भाजपचे शासन सत्तेवर आले असले तरी आर्थिक धोरण हे पूर्वीचेच सुरू राहिले आहे. लोकशाही समाजवादाला आपण तिलांजली दिली आहे. देशात झपाट्याने आर्थिक विकास होताना दिसत असला तरीही वरवरचा विशिष्ट लोकांचाच विकास होत आहे. गत वर्षात अती श्रीमंतांची मालमत्ता ३४ टक्क्यांनी वाढली आहे. अशाने नवा भारत निर्माण होणार नाही. चांगला समाज निर्माण करण्यासाठी सर्वांचेच आॅडिट करण्याची गरज आहे.’कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सुदर्शन इंगळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)