शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

कोरोना नंतरही काळजी अत्यावश्यक - डॉ. प्रवीणकुमार जरग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:39 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी लोकांनी सामाजिक पातळीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. कोरोनाची लक्षणे दिसत असताना चाचणीसाठी उशीर ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी लोकांनी सामाजिक पातळीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. कोरोनाची लक्षणे दिसत असताना चाचणीसाठी उशीर केलात, तर मात्र पुढे अडचणी वाढू शकतात. यामुळे तुम्ही तुमचे कुटुंब आणि समाजालाही अडचणीत टाकत आहात. ताप किंवा थंडी वाजणे, स्नायूंमध्ये दुखणे, डोकेदुखी, खोकला किंवा घसा खवखवणे, चव न कळणे किंवा वास न येणे, थकवा येणे अशी कोरोना सदृश लक्षणे आढळल्यास चाचणी करून घेणे नक्कीच फायदेशीर ठरते. वेळीच निदान झाल्यास उपचार करणे आणि बरे होण्याचा वेग नक्कीच वाढतो.

कोरोना झाल्यानंतर औषधोपचार घेऊन आणि १४ दिवस आयसोलेशनमध्ये राहिले की कोरोनामुक्ती झाली असे नसते. पुन्हा आपण पूर्णपणे फिट झालो असा अनेक रुग्णांचा समज असतो. मात्र, रुग्ण पूर्णपणे बरा होण्यासाठी काही अधिकचा अवधी लागतो. कोविड मुक्त झाल्यानंतरही समूहात जाणे टाळणे आणि श्वसनाचे व्यायाम या दिवसांत करणे उपयुक्त ठरते.

कोरोनाची लस घेतल्यानंतरही लगेचच पूर्णपणे प्रतिकारशक्ती तयार होत नाही. म्हणून आपल्याला लस घेतल्यानंतरही कोरोनाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. मास्कचा वापर करणे, हात धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रींमुळे कोरोना संसर्गापासून बचाव करता येणे शक्य आहे, ही वस्तुस्थिती आहे. बऱ्याच रुग्णांना कोविड १९ ची सौम्य लक्षणे असल्याने डॉक्टर होम आयसोलेशनचा सल्ला देतात. पण रुग्णांनी घराबाहेर न जाता व तसेच त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या संपर्कात न येता आयसीएमआरच्या नियमानुसार होम आयसोलेशनचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने वेळोवेळी कोविड चाचणी करणे आवश्यक आहे.

कोविड १९ हा बरा होणारा आजार आहे. महामारीच्या काळात संसर्गाला घाबरून न जाता प्रत्येक व्यक्तीने त्यावर मात करण्यासाठी पुरेशी खबरदारी घेणे गरजेचे आहे. वैद्यकीय शास्त्रानुसार ८० टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येतात तर १० ते १५ टक्के रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज भासते. यापूर्वी देखील देशात अनेक महामारीसारखी संकटे आली होती आणि त्यावर आपण यशस्वीरित्या मात केली असून या कोरोना महामारीवरदेखील आपण नक्कीच मात करू शकतो.

- डॉ. प्रवीणकुमार जरग

जनरल फिजिशियन, सातारा