शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नंतरही काळजी अत्यावश्यक - डॉ. प्रवीणकुमार जरग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:39 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी लोकांनी सामाजिक पातळीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. कोरोनाची लक्षणे दिसत असताना चाचणीसाठी उशीर ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी लोकांनी सामाजिक पातळीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. कोरोनाची लक्षणे दिसत असताना चाचणीसाठी उशीर केलात, तर मात्र पुढे अडचणी वाढू शकतात. यामुळे तुम्ही तुमचे कुटुंब आणि समाजालाही अडचणीत टाकत आहात. ताप किंवा थंडी वाजणे, स्नायूंमध्ये दुखणे, डोकेदुखी, खोकला किंवा घसा खवखवणे, चव न कळणे किंवा वास न येणे, थकवा येणे अशी कोरोना सदृश लक्षणे आढळल्यास चाचणी करून घेणे नक्कीच फायदेशीर ठरते. वेळीच निदान झाल्यास उपचार करणे आणि बरे होण्याचा वेग नक्कीच वाढतो.

कोरोना झाल्यानंतर औषधोपचार घेऊन आणि १४ दिवस आयसोलेशनमध्ये राहिले की कोरोनामुक्ती झाली असे नसते. पुन्हा आपण पूर्णपणे फिट झालो असा अनेक रुग्णांचा समज असतो. मात्र, रुग्ण पूर्णपणे बरा होण्यासाठी काही अधिकचा अवधी लागतो. कोविड मुक्त झाल्यानंतरही समूहात जाणे टाळणे आणि श्वसनाचे व्यायाम या दिवसांत करणे उपयुक्त ठरते.

कोरोनाची लस घेतल्यानंतरही लगेचच पूर्णपणे प्रतिकारशक्ती तयार होत नाही. म्हणून आपल्याला लस घेतल्यानंतरही कोरोनाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. मास्कचा वापर करणे, हात धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रींमुळे कोरोना संसर्गापासून बचाव करता येणे शक्य आहे, ही वस्तुस्थिती आहे. बऱ्याच रुग्णांना कोविड १९ ची सौम्य लक्षणे असल्याने डॉक्टर होम आयसोलेशनचा सल्ला देतात. पण रुग्णांनी घराबाहेर न जाता व तसेच त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या संपर्कात न येता आयसीएमआरच्या नियमानुसार होम आयसोलेशनचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने वेळोवेळी कोविड चाचणी करणे आवश्यक आहे.

कोविड १९ हा बरा होणारा आजार आहे. महामारीच्या काळात संसर्गाला घाबरून न जाता प्रत्येक व्यक्तीने त्यावर मात करण्यासाठी पुरेशी खबरदारी घेणे गरजेचे आहे. वैद्यकीय शास्त्रानुसार ८० टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येतात तर १० ते १५ टक्के रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज भासते. यापूर्वी देखील देशात अनेक महामारीसारखी संकटे आली होती आणि त्यावर आपण यशस्वीरित्या मात केली असून या कोरोना महामारीवरदेखील आपण नक्कीच मात करू शकतो.

- डॉ. प्रवीणकुमार जरग

जनरल फिजिशियन, सातारा