वाई : महावितरणाच्या अजब कारभारामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी व वीजग्राहकांना मोठ्या रकमेची वीजबिले आली असून, या वाढीव रकमेच्या बिलामुळे व ती पुन्हा कमी करण्याच्या प्रकारामुळे शेतकरी व ग्राहक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या कालवा पाणी उपशाच्या मोटारी पावसाळ्यापूर्वीपासून बंद आहेत. त्याचा वापर केला गेला नाही, त्या मोटारींची काही शेतकऱ्यांना दुप्पट रकमेची बिले आली आहेत. तर ग्राहकांचे मीटरचे रिडिंग न घेताही काही वाढीव रकमेची बिले आली आहेत.ही बिले कमी करण्यासाठी पुन्हा गावातील विद्युत कर्मचाऱ्यांना शोधावे लागते. त्यांच्याकडून रिडिंग घेऊन ते वाई येथील मुख्य कार्यालयात जाऊन कमी करून ते बँक किंवा वीजग्राहक सुविधा केंद्रात भरावे लागते. यामुळे शेतकरी व वीजग्राहक हेलपाटे मारून हैराण होत आहेत. सध्या शेतातील कामे सुरु आहेत, ही कामे सोडून शेतकऱ्यांना हे जादाचे काम लागले आहे. त्यावर मनस्तापही सोसावा लागत आहे. शेतकऱ्यांना हा नवा व्याप आहे.महावितरणच्या या अजब कारभारामुळे शेतकरी व ग्राहक तीव्र नाराजी व संताप व्यक्त करत आहेत. (प्रतिनिधी)
बंद मोटारी तरी भरमसाठ बिले !
By admin | Updated: September 17, 2014 22:24 IST