शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

कालवा उशाला अन्‌ कोरड घशाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:17 IST

आदर्की : फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागाला वरदान ठरलेला धोम-बलकवडी कालवा आदर्कीच्या ओढ्याखालून गेल्याने नैर्सगिक पाण्याचे स्रोत तुटल्याने ओढा कोरडा ...

आदर्की : फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागाला वरदान ठरलेला धोम-बलकवडी कालवा आदर्कीच्या ओढ्याखालून गेल्याने नैर्सगिक पाण्याचे स्रोत तुटल्याने ओढा कोरडा पडला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आल्याने कालवा उशाला अन् कोरड घशाला, अशी अवस्था आदर्कीतील शेतकऱ्यांची झाली आहे.

फलटण तालुक्यातील ८४ गावे दुष्काळाने होरपळत होती. दुष्काळात गावेच्या गावे स्थलांतरित होत होती, म्हणून कृष्णेचे पाणी दुष्काळी भागाला मिळावे म्हणून धोम धरणातून सांगली जिल्ह्याला गेलेल्या धोम कालव्याला शिवथर खिंडीतून समांतर कालवा काढून अंबवडे, देऊर, वाठार गाव, महाकाली दरी, आदर्की असा सर्व्हे झाला होता; पण राजकीय इच्छाशक्तीमुळे मंजुरी मिळाली नाही. त्यानंतर १९९६ मध्ये युती शासनाच्या काळात बलकवडी धरणास मंजुरी मिळाली. धरणाचे काम सुरू असताना कालव्याचे सर्वेक्षण सुरू झाले. त्यावेळी आदर्की खुर्द येथे खंडोबा मंदिर, बिचकुले वस्ती, काळवट, सापमारी तलावाच्या वरच्या बाजूने सर्व्हे झाला. त्यानंतर पाच वर्षांनी सर्व्हे बदलून गावाजवळून सर्व्हे झाला. त्यामुळे कालवा तीस फूट खोल झाला, तर पाझर तलावाच्या खालच्या बाजूने बोगदा पाडून कालवा खुदाई झाली. आदर्की खुर्द मुख्य ओढा व छोटे दोन ओढ्यांच्या खालून कालवा गेल्याने नैसर्गिक पाण्याचे त तुटल्याने कालवा वाहत असला तरी ओढा कोरडाच असतो. त्यामुळे प्रत्येकवर्षी दुष्काळ पडत होता म्हणून लोकवर्गणीतून चारशे फूट चारी खोदून सिमेंट पाईप टाकून ओढ्याला कालव्यातून पाणी सोडण्याची व्यवस्था केली; पण कालव्यातील पाईप बसवताना कालव्याच्या तळाला बसवली नाही, त्यामुळे ओढ्यातील पाणी पाईपमधून येत नाही, त्यामुळे ओढा कोरडा पडतो. सहा बंधारे व अनेक विहिरींची पाणी पातळी खालावल्यामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत.

(चौकट)

सिमेंट बंधाऱ्यातील पाणी कालव्यात...

आदर्की-हिंगणगाव ओढा नैसर्गिक पाण्याने नऊ महिने वाहत असे. धोम-बलकवडी कालवा झाल्यापासून दोन-तीन महिनेच वाहतो. नैसर्गिक पाण्याचे स्रोत तुटले आहेत, तर कृषी खात्याने कालव्याच्या शंभर फूट वरच्या बाजूला सिमेंट बंधारा बांधल्याने बंधाऱ्यातील पाणी कालव्यात येते. दुसरा सिमेंट बंधारा कालव्याच्या दोनशे फुटांवर खालच्या बाजूला बांधल्याने पुराच्या पाण्याने बंधरा भरला की कालव्यात पाणी उतरते.

(कोट..)

धोम-बलकवडी उजव्या कालव्यामुळे जिरायती क्षेत्र बागायती झाले; पण आदर्की खुर्द-हिंगणगाव ओढा कोरडा पडत असल्याने रब्बी व उन्हाळी हंगाम धोक्यात येतो. पाणी ओढ्यात येण्यासाठी पाईप बसवल्या आहेत. पण ओढ्याचे पाणी पाईपमधून येत नाही. त्याची पाहणी करून ओढ्याचे नैसर्गिक पाणी ओढ्याला सोडून ओढा प्रवाहित करावा.

- विश्वासराव निंबाळकर, ज्येष्ठ नागरिक, आदर्की खुर्द

०१आदर्की ओढा

फोटो -

धोम-बलकवडी कालवा आदर्कीच्या ओढ्याखालून गेल्याने नैसर्गिक पाण्याचे स्रोत तुटल्याने आदर्की-हिंगणगाव ओढा कोरडा पडला आहे.