शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

लाचखोरी शिक्षेतही सातारा राज्यात अव्वल!

By admin | Updated: August 27, 2014 23:34 IST

भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाईट दिवस : दहा जणांपैकी सात जणांना शिक्षा सुनावली

दत्ता यादव - सातारा -गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, लाचखोरांना शिक्षा होण्यासही सातारा जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर ठरला आहे. गेल्या वर्षी दहा लाचखोरांचे खटले न्यायालयात निकाली निघाले असून, त्यापैकी सात जणांना न्यायालयाने शिक्षा सुनावली.महानगरपालिका क्षेत्रात विभागीय कार्यालयांची संख्या जास्त असते. त्यामुळे त्या ठिकाणी साहजिकच लाचखोरीचे प्रमाणही लक्षणीय असते; परंतु सातारा जिल्ह्यात केवळ आठ तालुके आहेत. त्यामुळे लाचखोरीचे प्रमाणही मर्यादित असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तक्रारदारांचा सध्या ओघ वाढला असून, नागरिक सतर्क झाले आहेत. लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले तरी अनेकजण निर्दोष का सुटतात? असा अनेकांना प्रश्न पडत असतो. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने माहिती घेतली असता अनेक वेगवेगळे कंगोरे समोर आले.लाचखोराची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर बहुदा पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असते; मात्र सातारा लाचलुचपत विभाग याला अपवाद आहे. गेल्या वर्षी दहा जण ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकले होते. त्यापैकी सात जणांना न्यायालयाने शिक्षा सुनावली, तर केवळ तीनजण निर्दोष सुटले. बऱ्याचदा व्यवस्थित तपास केला नाही, म्हणून लाचखोराला शिक्षा झाली नाही, असा आरोप केला जातो. परंतु यातील वस्तुस्थिती वेगळीच आहे. लाच प्ररकरणामध्ये फिर्यादी हा तपासाचा केंद्रबिंदू असतो. काही वेळेला फिर्यादी न्यायालयात आरोपीचा वकील सांगेल तसे जबाब देत असतो. त्यामुळे हा खटला कमकुवत होण्यास वेळ लागत नाही. तपासी अधिकारी, प्रत्यक्षदर्शी दोन पंच यांचाही त्यामध्ये जबाब नोंदविला जातो. फिर्यादीच जर फितूर झाला, तर खटल्याचा निकाल काय लागणार, हे तपासी अधिकाऱ्यांना अगोदरच समजत असते; परंतु त्यांना काही करता येत नाही. आता राहिला प्रश्न न्यायालयाचा. अशा खटल्यामध्ये फितूर झाला म्हणून न्यायालय संबंधिताला शिक्षाही देऊ शकते. याचे एक उदाहरण देता येईल.दोन वर्षांपूर्वी दहिवडी न्यायालयामध्ये असाच एक खटला सुरू होता. यामध्ये फिर्यादी फितूर झाला होता. त्यामुळे न्यायालयाने त्या फिर्यादीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. संबंधित फिर्यादीने उच्य न्यायालयात अपील करून या निकालाला आवाहन दिले होते. परंतु दुर्मिळातील दुर्मिळ ही घटना म्हणावी लागेल. फिर्यादीवर असा कायद्याचा वचक असेल तर लाचखोरांना शंभर टक्के शिक्षा होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लाचखोरीमध्ये सर्वच विभागलाचलुचपत विभागाने सातारा जिल्ह्यात कारवाई करताना कोणताच विभाग सोडला नाही. सरकारी वकील, वीजवितरण कंपनी, पोलीस, आरोग्य विभाग, महसूल विभाग, रेल्वे विभाग, पाणीपुरवठा विभाग या विभागांचा त्यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे, सरकारी वकिलांवर कारवाईच्या सातारा जिल्ह्यात दोन घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रात एकाही वकिलावर त्याही सरकारी वकिलावर कारवाई झालेली नाही. यंदा केवळ आठ महिन्यांत १६ जणांना लाच घेताना पकडण्यात आले आहे. हे खटलेही अद्याप न्यायालयात प्रलंबित आहेत.सलग दोन वर्षे पोलीस अग्रेसर तीन वर्षांपूर्वी महसूल विभाग लाचखोरीमध्ये अग्रेसर होता. परंतु महसूल विभागाला पोलिसांनी मागे टाकले. गेल्या सलग दोन वर्षांपासून लाचखोरीमध्ये पोलीसच पुढे आहेत. पोलीस दलात वाढलेली लाचखोरी खरोखरच चिंताजनक आहे.(प्रतिनिधी)