शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

गावाच्या प्रवेशद्वारातच बाटली उभी !

By admin | Updated: January 2, 2015 23:59 IST

कार्वेत ‘एन्ट्री’लाच दारू दुकान : ग्रामसभेत ठराव करूनही ‘उत्पादन शुल्क’ ढिम्म; कारवाई न झाल्यास आंदालनाचा इशारा

कार्वे : गावाच्या सुरुवातीला बहुतांश ठिकाणी कमान असते. प्रवेशद्वार अथवा मंदिरेही असतात; पण कार्वेत चक्क बाटली उभी असल्याचे दिसते. या बाटलीमुळे तळीरामही गावाच्या प्रवेशद्वारातच झिंगत पडल्याचे पाहावयास मिळते. या सर्वाचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागतोय. एवढच नव्हे तर गावाच्या लौकिकालाही त्यामुळे गालबोट लागतंय.कऱ्हाड तालुक्यात ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक वारसा लाभलेले गाव म्हणून कार्वे गावाचा लौकिक आहे. या गावाने शासनाच्या अनेक योजना, उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभागही नोंदविला आहे. निर्मलग्राम तसेच तंटामुक्त अभियानात गावाने पुरस्कार प्राप्त केला आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून गावाच्या लौकिकाला गालबोट लावण्याचा प्रकार होतोय. गावच्या प्रवेशद्वारावर शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा व महालक्ष्मीेचे मंदिर आहे. या मंदिरात देवदर्शनासाठी दररोज शेकडो ग्रामस्थ व महिला येत असतात. मात्र, या मंदिरापासून काही अंतरावरच बिअरबार व देशी दारूचे दुकान आहे. कार्वे गावाच्या आसपास पाच-सहा मोठी गावे असून, या गावांचा कार्वे गावाशी दररोजचा संपर्क आहे. मात्र, गावाच्या प्रवेशद्वारातच तळीरामांचा अड्डा असल्याने बाहेरगावाहून येणाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. गजबजलेल्या ठिकाणी तळीराम विनाकारण बडबड करीत अथवा हातवारे करीत उभे असलेले पाहावयास मिळतात. त्यांच्या या कृत्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनी तसेच महिलांना शरमेने मान खाली घालावी लागते. काहीवेळा हे तळीराम पुतळा व मंदिराच्या आवारात पडलेले असतात़ त्यामुळे मंदिराचे पावित्र्यही धोक्यात येत आहे. याबाबत गावच्या ग्रामसभेत वेळोवेळी ठराव करण्यात आला आहे. संबंधित बार व दारूचे दुकान गावापासून दूर नेण्यात यावे, असा ठराव ग्रामसभेने घेतला आहे. ठरावाच्या प्रत प्रशासनालाही देण्यात आल्या आहेत. मात्र, त्याबाबत अद्याप कसलीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जातोय.गाव तेथे पाणवठा, गाव तेथे शाळा, गाव तेथे मंदिर व गाव तेथे वाचनालय सर्वच ठिकाणी पाहायला मिळते; पण गावच्या प्रवेशद्वारातच दारूचे दुकान फक्त कार्वे गावात दिसते. वारंवार विनंती करूनही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थ प्रशासनावर कमालीचे नाराज आहेत. संबंधित बिअर बार व दारू दुकान इतरत्र हलविण्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मारुती बापू जाधव यांनी दिला आहे. (वार्ताहर)कार्वे येथे प्रवेशद्वारात व मंदिरापासून फक्त पाच ते दहा फूट अंतरावर असलेला बिअरबार व दारूचे दुकान या परिसरातून हलावावे़ उत्पादन शुल्क विभागाने वेळोवेळी या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे़ याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार असून, त्यातूनही मार्ग न निघाल्यास आंदोलन करणार आहे. -संतोष पाटील, राज्याध्यक्ष, संभाजी ब्रिगेडनशेत मुद्द्यावरून गुद्द्यावरदारू दुकानात दररोज सायंकाळी मोठ्या प्रमाणात तळीरामांची गर्दी होते. आसपासच्या गावातील मद्यपीही येथे न चुकता दररोज हजेरी लावतात. दारूचे घोट घशात उतरले की मद्यपींना जोर चढतो. अगोदर हळू आवाजात बोलणाऱ्या या मद्यपींचा बाटली संपताच आवाज चढतो. मुद्द्यावरून ते गुद्द्यावर येतात. कधी-कधी या तळीरामांची भांडणे सोडविण्यासाठी ग्रामस्थांना मध्यस्थी करावी लागते.