शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

‘काळ्या पाण्या’च्या शिक्षेतून अखेर मुक्तता

By admin | Updated: October 27, 2015 00:23 IST

मिरजे गावात आनंदोत्सव : २२ वर्षांपासून दूषित पाणी; बाभळीच्या पानांचा रंग उतरत होता पाण्यात; विहिरीची श्रमदानातून स्वच्छता

दशरथ ननावरे -- खंडाळा -‘स्वच्छ आणि शुद्ध पाणी’ हा ग्रामस्थांचा मूलभूत हक्क आहे. पण, हाच हक्क मिरजे, ता. खंडाळा येथील गावकऱ्यांचा तब्बल २२ वर्षे अस्वच्छतेने हिरावून घेतला होता. परंतु याच्या कारणाचा उलगडाच होत नव्हता. खंडाळ्याचे गटविकास अधिकारी विलास साबळे यांच्या हे लक्षात आल्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने कारणावरच्या मुळाशी जाऊन शोध घेतला. अथक प्रयत्नानंतर बाभळीच्या मुळावरच घाव घालून स्वच्छ पाण्याचा मार्ग मोकळा करून गावकऱ्यांचा जिवाचा घोर कायमचा नष्ट केला. गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.मिरजे हे खंडाळा तालुक्याच्या पश्चिमेकडील गाव. तीन हजारांच्या घरात लोकसंख्या गावच्या पूर्वेला असणाऱ्या टेकडीच्या मध्यवर्ती ठिकाणी तलावाच्या खाली गावची पाणीपुरवठ्याची विहीर! भरपूर पाणी; पण पिण्याचे समाधान गावकऱ्यांना कधी मिळालेच नाही. कारणही तसंच होतं, गावात नळपाणीपुरवठ्याद्वारे येणारे पाणी नेहमी काळेच दिसायचे. त्यामुळे हे घडतंय का? यामुळे माणसांच्या जीविताला तर काही धोका पोहोचणार नाही ना? एक ना अनेक प्रश्न गावकऱ्यांना भेडसावत होते. बहुधा पाईपालाईन खराब झाली असावी, असे गृहित धरून संपूर्ण पाईपलाईनच बदलण्यात आली; पण पाण्याचा रंग काही बदलला नाही. अनेक उपायानंतरही पाणी तसेच राहिले. एक ना दोन दिवस तब्बल २० ते २२ वर्षे!गेल्या महिन्यात गावकऱ्यांनी तडख गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. पाण्याचा प्रश्न कसा गंभीर आहे, हे समजावून सांगितले. हा प्रश्न लक्षात घेऊन सलग आठ दिवस टीसीएल सातत्याने टाकण्याचे ठरविले. आठ दिवसांनंतर पाण्याचे नमुने तपासण्यात आले. रासायनिक बायोग्राफिक तपासणीनंतर पाणी पिण्यायोग्य असल्याचे अहवाल मिळाले; मग पाणी काळे का? याचा शोध सुरू केला.गटविकासअधिकारी विलास साबळे यांनी सातारा येथील भूजल सर्वेक्षण विभागाशी संपर्क करून पाण्याचा प्रवाह तपासण्यास सांगितला; परंतु प्रवाह योग्य आहे. मात्र विहिरीच्या भोवती असणाऱ्या बाभळीच्या झाडाचा पाला पाण्यात पडून त्याचा रंग पाण्यात उतरत असल्याचे लक्षात आले. मग विहिरीची आणि भोवतालची संपूर्ण सफाई करून बाभळ काढण्यात आली. विहिरीचे संपूर्ण पाणी उपसून ती साफ केली. त्यानंतर पाणी स्वच्छ आणि निर्मळ, शुद्ध येऊ लागले. २२ वर्षांची गावकऱ्यांची काळ्या पाण्यातून मुक्तता झाली. अधिकारी कर्तव्यदक्ष असतील तर नागरिकांच्या समस्या सुटू शकतात. गावचे सरपंच वंदना कडाळे, उपसरपंच पिलाजी जाधव, सदस्य कुंडलिक जाधव, धनंजय कुंभार, शशिकांत कडाळे, सुनील कडाळे ग्रामस्थांनी यासाठी पाठपुरावा केला. पाणी स्वच्छतेला यश आल्याने ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.मिरजे गावात पाणी अस्वच्छ असल्याने गेली अनेक वर्षे भीतीच होती. वेळोवेळी केलेले उपाय निरर्थक ठरले. भूजल सर्वेक्षणातून प्रश्न मार्गी लागला, त्यामुळे शुद्ध पाणी मिळू लागले आहे.-वंदना कडाळे, सरपंचगेल्या दोन दशकांचा प्रश्न मार्गी लागला आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी मुळाशी जाऊन प्रश्न मिटविला. आम्हाला काळ्या पाण्यातून मुक्तता मळाल्याचा आनंद आहे.- सुनील कडाळे, ग्रामस्थलोकांच्या समस्येचा अभ्यास करून पाणी मूलभूत प्रश्नावर मात करता आली, लोकांनी चांगले सहकार्य केले. त्यामुळे अनेक वर्षांचा प्रश्न मिटला.-विलास साबळे, गटविकासअधिकारी