शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
3
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
4
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
5
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
6
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
7
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
9
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
10
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
11
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
12
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
13
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
14
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
15
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
16
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
17
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
18
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
19
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
20
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी

‘काळ्या पाण्या’च्या शिक्षेतून अखेर मुक्तता

By admin | Updated: October 27, 2015 00:23 IST

मिरजे गावात आनंदोत्सव : २२ वर्षांपासून दूषित पाणी; बाभळीच्या पानांचा रंग उतरत होता पाण्यात; विहिरीची श्रमदानातून स्वच्छता

दशरथ ननावरे -- खंडाळा -‘स्वच्छ आणि शुद्ध पाणी’ हा ग्रामस्थांचा मूलभूत हक्क आहे. पण, हाच हक्क मिरजे, ता. खंडाळा येथील गावकऱ्यांचा तब्बल २२ वर्षे अस्वच्छतेने हिरावून घेतला होता. परंतु याच्या कारणाचा उलगडाच होत नव्हता. खंडाळ्याचे गटविकास अधिकारी विलास साबळे यांच्या हे लक्षात आल्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने कारणावरच्या मुळाशी जाऊन शोध घेतला. अथक प्रयत्नानंतर बाभळीच्या मुळावरच घाव घालून स्वच्छ पाण्याचा मार्ग मोकळा करून गावकऱ्यांचा जिवाचा घोर कायमचा नष्ट केला. गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.मिरजे हे खंडाळा तालुक्याच्या पश्चिमेकडील गाव. तीन हजारांच्या घरात लोकसंख्या गावच्या पूर्वेला असणाऱ्या टेकडीच्या मध्यवर्ती ठिकाणी तलावाच्या खाली गावची पाणीपुरवठ्याची विहीर! भरपूर पाणी; पण पिण्याचे समाधान गावकऱ्यांना कधी मिळालेच नाही. कारणही तसंच होतं, गावात नळपाणीपुरवठ्याद्वारे येणारे पाणी नेहमी काळेच दिसायचे. त्यामुळे हे घडतंय का? यामुळे माणसांच्या जीविताला तर काही धोका पोहोचणार नाही ना? एक ना अनेक प्रश्न गावकऱ्यांना भेडसावत होते. बहुधा पाईपालाईन खराब झाली असावी, असे गृहित धरून संपूर्ण पाईपलाईनच बदलण्यात आली; पण पाण्याचा रंग काही बदलला नाही. अनेक उपायानंतरही पाणी तसेच राहिले. एक ना दोन दिवस तब्बल २० ते २२ वर्षे!गेल्या महिन्यात गावकऱ्यांनी तडख गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. पाण्याचा प्रश्न कसा गंभीर आहे, हे समजावून सांगितले. हा प्रश्न लक्षात घेऊन सलग आठ दिवस टीसीएल सातत्याने टाकण्याचे ठरविले. आठ दिवसांनंतर पाण्याचे नमुने तपासण्यात आले. रासायनिक बायोग्राफिक तपासणीनंतर पाणी पिण्यायोग्य असल्याचे अहवाल मिळाले; मग पाणी काळे का? याचा शोध सुरू केला.गटविकासअधिकारी विलास साबळे यांनी सातारा येथील भूजल सर्वेक्षण विभागाशी संपर्क करून पाण्याचा प्रवाह तपासण्यास सांगितला; परंतु प्रवाह योग्य आहे. मात्र विहिरीच्या भोवती असणाऱ्या बाभळीच्या झाडाचा पाला पाण्यात पडून त्याचा रंग पाण्यात उतरत असल्याचे लक्षात आले. मग विहिरीची आणि भोवतालची संपूर्ण सफाई करून बाभळ काढण्यात आली. विहिरीचे संपूर्ण पाणी उपसून ती साफ केली. त्यानंतर पाणी स्वच्छ आणि निर्मळ, शुद्ध येऊ लागले. २२ वर्षांची गावकऱ्यांची काळ्या पाण्यातून मुक्तता झाली. अधिकारी कर्तव्यदक्ष असतील तर नागरिकांच्या समस्या सुटू शकतात. गावचे सरपंच वंदना कडाळे, उपसरपंच पिलाजी जाधव, सदस्य कुंडलिक जाधव, धनंजय कुंभार, शशिकांत कडाळे, सुनील कडाळे ग्रामस्थांनी यासाठी पाठपुरावा केला. पाणी स्वच्छतेला यश आल्याने ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.मिरजे गावात पाणी अस्वच्छ असल्याने गेली अनेक वर्षे भीतीच होती. वेळोवेळी केलेले उपाय निरर्थक ठरले. भूजल सर्वेक्षणातून प्रश्न मार्गी लागला, त्यामुळे शुद्ध पाणी मिळू लागले आहे.-वंदना कडाळे, सरपंचगेल्या दोन दशकांचा प्रश्न मार्गी लागला आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी मुळाशी जाऊन प्रश्न मिटविला. आम्हाला काळ्या पाण्यातून मुक्तता मळाल्याचा आनंद आहे.- सुनील कडाळे, ग्रामस्थलोकांच्या समस्येचा अभ्यास करून पाणी मूलभूत प्रश्नावर मात करता आली, लोकांनी चांगले सहकार्य केले. त्यामुळे अनेक वर्षांचा प्रश्न मिटला.-विलास साबळे, गटविकासअधिकारी