शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

ताग्याचे उत्पादन घेण्याकडे बळीराजाचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:41 IST

मसूर : रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने जमिनीचा पोत टिकवण्यासाठी व पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी हेळगाव भागातील अनेक शेतकऱ्यांनी शेतात ...

मसूर : रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने जमिनीचा पोत टिकवण्यासाठी व पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी हेळगाव भागातील अनेक शेतकऱ्यांनी शेतात हिरवळीची खताची पिके घेतली आहेत. ती पिके शेतीला उपयुक्त ठरू लागली आहेत. त्यामुळे ताग, ढेंचा आदी हिरवळीची पिके घेण्याकडे कल वाढला आहे.

जमिनीला सेंद्रिय खताची गरज भागवण्यासाठी हिरवळीची खते हा उत्तम पर्याय असल्याने याची लागवड अनेक शेतांत दिसून येत आहे.

जमिनीची मशागत करण्यासाठी घरोघरी असणाऱ्या बैलाच्या जोड्यांची जागा यंत्राने घेतली. पशुपालन कमी झाल्याने व दुग्ध व्यवसाय अडचणीत आला. घरोघरी जनावरांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे जमिनीला शेणखत मिळणे दुरापास्त झाले आहे. रासायनिक खतांचा भरमसाट वापर वाढल्याने जमिनीची सुपीकता कमी होऊन जमीन नापीक होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शेतकरी हिरवळीच्या खताकडे वळू लागले आहेत.

कऱ्हाड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा ताग, ढेंचा आदी हिरवळीची पिके घेतली आहेत. सेंद्रिय किंवा कंपोस्ट खताची उपलब्धता कमी झाली आहे. शेतात वारंवार पिके घेतल्याने सेंद्रिय कर्बाची व नत्राची कमतरता दिसून येते. अशा परिस्थितीत हिरवळीची पिके उपयुक्त ठरू लागली आहेत. त्यामध्ये कऱ्हाड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी ताग व ढेंचा या हिरवळीच्या पिकांना प्राधान्य दिले आहे. ताग हिरवळीचे उत्तम पीक असून सर्व प्रकारच्या जमिनीत हे चांगल्या पद्धतीने उगवते. पेरणीनंतर पाच ते सहा आठवड्यांनी हे पीक फुलोऱ्यात येते. त्या वेळी शेताच्या केलेल्या नांगरटीच्या साह्याने हे पीक जमिनीत गाडून टाकले जाते. ही प्रक्रिया रिकाम्या शेतात साधारणपणे मार्च ते मे दरम्यान पूर्ण केली जाते. जूनमध्ये पेरणी करताना किंवा उसाची लागण करताना इतर खतांची गरज कमी प्रमाणात भासते. जमिनीत गाडलेले हे हिरवळीचे खत पिकासाठी उपयुक्त ठरत आहे.

कोट

भरमसाट रासायनिक खतांचा डोस कमी होण्यासाठी व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी त्या जमिनीत ताग व ढेंचा या पिकांची लागवड करून जमिनीला कर्ब व नत्राचा पुरवठा होण्यासाठी हिरवळीची खते उपयुक्त ठरत आहेत. याकडे जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी वळावे.

– शिवाजीराव सूर्यवंशी,

प्रगतशील शेतकरी, हेळगाव

फोटो :

कऱ्हाड तालुक्यातील हेळगाव येथे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीत घेतलेले ताग पीक फुलोऱ्यात आले आहे. (छाया : जगन्नाथ कुंभार)