शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
3
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
4
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
5
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
6
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
7
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
8
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
9
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
10
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
11
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
12
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
14
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
15
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
16
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
17
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
18
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
19
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
20
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी

ताग्याचे उत्पादन घेण्याकडे बळीराजाचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:41 IST

मसूर : रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने जमिनीचा पोत टिकवण्यासाठी व पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी हेळगाव भागातील अनेक शेतकऱ्यांनी शेतात ...

मसूर : रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने जमिनीचा पोत टिकवण्यासाठी व पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी हेळगाव भागातील अनेक शेतकऱ्यांनी शेतात हिरवळीची खताची पिके घेतली आहेत. ती पिके शेतीला उपयुक्त ठरू लागली आहेत. त्यामुळे ताग, ढेंचा आदी हिरवळीची पिके घेण्याकडे कल वाढला आहे.

जमिनीला सेंद्रिय खताची गरज भागवण्यासाठी हिरवळीची खते हा उत्तम पर्याय असल्याने याची लागवड अनेक शेतांत दिसून येत आहे.

जमिनीची मशागत करण्यासाठी घरोघरी असणाऱ्या बैलाच्या जोड्यांची जागा यंत्राने घेतली. पशुपालन कमी झाल्याने व दुग्ध व्यवसाय अडचणीत आला. घरोघरी जनावरांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे जमिनीला शेणखत मिळणे दुरापास्त झाले आहे. रासायनिक खतांचा भरमसाट वापर वाढल्याने जमिनीची सुपीकता कमी होऊन जमीन नापीक होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शेतकरी हिरवळीच्या खताकडे वळू लागले आहेत.

कऱ्हाड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा ताग, ढेंचा आदी हिरवळीची पिके घेतली आहेत. सेंद्रिय किंवा कंपोस्ट खताची उपलब्धता कमी झाली आहे. शेतात वारंवार पिके घेतल्याने सेंद्रिय कर्बाची व नत्राची कमतरता दिसून येते. अशा परिस्थितीत हिरवळीची पिके उपयुक्त ठरू लागली आहेत. त्यामध्ये कऱ्हाड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी ताग व ढेंचा या हिरवळीच्या पिकांना प्राधान्य दिले आहे. ताग हिरवळीचे उत्तम पीक असून सर्व प्रकारच्या जमिनीत हे चांगल्या पद्धतीने उगवते. पेरणीनंतर पाच ते सहा आठवड्यांनी हे पीक फुलोऱ्यात येते. त्या वेळी शेताच्या केलेल्या नांगरटीच्या साह्याने हे पीक जमिनीत गाडून टाकले जाते. ही प्रक्रिया रिकाम्या शेतात साधारणपणे मार्च ते मे दरम्यान पूर्ण केली जाते. जूनमध्ये पेरणी करताना किंवा उसाची लागण करताना इतर खतांची गरज कमी प्रमाणात भासते. जमिनीत गाडलेले हे हिरवळीचे खत पिकासाठी उपयुक्त ठरत आहे.

कोट

भरमसाट रासायनिक खतांचा डोस कमी होण्यासाठी व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी त्या जमिनीत ताग व ढेंचा या पिकांची लागवड करून जमिनीला कर्ब व नत्राचा पुरवठा होण्यासाठी हिरवळीची खते उपयुक्त ठरत आहेत. याकडे जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी वळावे.

– शिवाजीराव सूर्यवंशी,

प्रगतशील शेतकरी, हेळगाव

फोटो :

कऱ्हाड तालुक्यातील हेळगाव येथे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीत घेतलेले ताग पीक फुलोऱ्यात आले आहे. (छाया : जगन्नाथ कुंभार)