शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
4
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
5
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
6
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
7
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
8
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
9
...तरच महिलांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, महाराष्ट्र सरकारने नियम बदलले
10
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
11
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
12
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
13
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
14
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
15
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
16
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
17
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
19
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
20
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली

पाऊस पडण्याआधीच जामानिमा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:32 IST

जिल्ह्याचा पश्चिम भाग म्हणजे पावसाचे आगरच आहे. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून महाबळेश्वरचा नावलौकिक आहे. इथला पाऊस भल्याभल्यांना गारठवून टाकतो. प्रतापगडचा ...

जिल्ह्याचा पश्चिम भाग म्हणजे पावसाचे आगरच आहे. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून महाबळेश्वरचा नावलौकिक आहे. इथला पाऊस भल्याभल्यांना गारठवून टाकतो. प्रतापगडचा परिसर, कास, बामणोली, तापोळा, पांगारे खोरे, पाटण, कोयना त्याला लागून असलेला वारणा धरणापर्यंतच्या या सातारा जिल्ह्याच्या परिसरात पावसाळ्यापूर्वी स्थानिक नागरिकांची एकच भिरकिट सुरु असते. पावसाळ्यापूर्वीच चार महिन्यांचा जामानिमा गोळा करण्याची...!

हा सर्वच परिसर अत्यंत दुर्गम आहे. पावसाळ्याचे चार महिने या परिसरातील गावांचा शहरांशी संपर्क तुटतो. रस्ते खचतात, नद्या, ओढ्यांना पूर येतो, शेतात चिखलराड साठते, मी म्हणणारा पाऊस अंगावर झेलण्यासाठी घरे सज्ज करण्याच्या कामात स्थानिक जनता गुंतलेली असते. उन्हाळा असतो तेव्हाच काही तयारी केली नाही तर मग उपासमार अन् अनेक नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागते.

कोकणाला लागून असलेल्या या परिसरातील नागरिकांचे राहणीमान हे कोकणी पध्दतीचेच आहे. तुकड्या तुकड्यांची शेती, गुरे -ढोरे, मासेमारी हीच या लोकांची संपत्ती आहे. या परिसरात पावसाचा जोर इतका असतो की, घरातून बाहेर पडणेदेखील कठीण होऊन जाते. स्वयंपाक हा मुख्यत्वे चुलीवरच होत असल्याने उन्हाळ्यातच वाळलेली लाकडे गोळा करण्याचे काम चालते. वाळलेली झाडे अथवा झाडांचा फांद्या तोडून त्या उन्हात वाळवल्या जातात. त्या चांगल्या वाळल्या की मग घरातील सर्वजण मिळून हे पूर्ण सुकलेले जळण माळ्यावर रचतात. पाऊस जरी सप्टेंबरनंतरही लांबला तरी या जळणाचा आधार त्यांना असतो.

पावसाळ्यात घरांना झडपा घातल्या जातात. यामुळे भिंती भिजत नाहीत. घरांवरील कौलांची शेकरण केली जाते. घरामध्ये पाऊस येऊ नये, यासाठी ही उपाययोजना असते. यासोबतच पोटासाठी लागणारा पैसाही सुरक्षितपणे साठवून ठेवला जातो. चटणी, तेल, मीठ, तांदूळ, ज्वारी एवढं जरी जवळ असलं तरी मग रानभाज्या, मासे खाऊनच हे लोक दिवस काढतात. जनावरांचीदेखील व्यवस्थित सोय केली जाते. गोठ्यांची दुरुस्ती करुन घेतली जाते. घरात पाणी घुसू नये, यासाठी ताली बांधल्या जातात. हा सर्व जामानिमा गोळा करुन ठेवण्याची परंपरागत पद्धत या भागात आहे.

पश्चिम भागात ही चालतात कामे...

तरव्याच्या भाजण्या, नांगरणीची कामे, भातखाचरांची डागडुजी, नाचणी शेतीची मशागत, ताली धरणे, पाण्यासाठी पाट तयार करणे, नवीन वावरं तयार करणे. काट्याकुट्यांची अडगळ बाजूला करणे, पडक्या नादुरूस्त भिंती दुरूस्त करणे, घरांची झाडलोट, ढापावरील कचरा काढून कपड्यावरून बांधणी, झडपी बांधणे, घर शाकारणे, लाकडं, शेणकुट, गवत भरणे, गवताच्या राख्या राखून कुंपण करणे, ताली बांधणे, नवीन गोठा तयार करणे, झरा सुरक्षित ठेवणे, चारा गंजी रचणे, शेणारा रचणे, अन्नधान्य साठवणूक करणे ही कामे उन्हाळ्यातच केली जातात.

(सागर गुजर)

फोटो नेम : २४ सागर ०१,०२,०३