शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

पाऊस पडण्याआधीच जामानिमा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:32 IST

जिल्ह्याचा पश्चिम भाग म्हणजे पावसाचे आगरच आहे. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून महाबळेश्वरचा नावलौकिक आहे. इथला पाऊस भल्याभल्यांना गारठवून टाकतो. प्रतापगडचा ...

जिल्ह्याचा पश्चिम भाग म्हणजे पावसाचे आगरच आहे. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून महाबळेश्वरचा नावलौकिक आहे. इथला पाऊस भल्याभल्यांना गारठवून टाकतो. प्रतापगडचा परिसर, कास, बामणोली, तापोळा, पांगारे खोरे, पाटण, कोयना त्याला लागून असलेला वारणा धरणापर्यंतच्या या सातारा जिल्ह्याच्या परिसरात पावसाळ्यापूर्वी स्थानिक नागरिकांची एकच भिरकिट सुरु असते. पावसाळ्यापूर्वीच चार महिन्यांचा जामानिमा गोळा करण्याची...!

हा सर्वच परिसर अत्यंत दुर्गम आहे. पावसाळ्याचे चार महिने या परिसरातील गावांचा शहरांशी संपर्क तुटतो. रस्ते खचतात, नद्या, ओढ्यांना पूर येतो, शेतात चिखलराड साठते, मी म्हणणारा पाऊस अंगावर झेलण्यासाठी घरे सज्ज करण्याच्या कामात स्थानिक जनता गुंतलेली असते. उन्हाळा असतो तेव्हाच काही तयारी केली नाही तर मग उपासमार अन् अनेक नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागते.

कोकणाला लागून असलेल्या या परिसरातील नागरिकांचे राहणीमान हे कोकणी पध्दतीचेच आहे. तुकड्या तुकड्यांची शेती, गुरे -ढोरे, मासेमारी हीच या लोकांची संपत्ती आहे. या परिसरात पावसाचा जोर इतका असतो की, घरातून बाहेर पडणेदेखील कठीण होऊन जाते. स्वयंपाक हा मुख्यत्वे चुलीवरच होत असल्याने उन्हाळ्यातच वाळलेली लाकडे गोळा करण्याचे काम चालते. वाळलेली झाडे अथवा झाडांचा फांद्या तोडून त्या उन्हात वाळवल्या जातात. त्या चांगल्या वाळल्या की मग घरातील सर्वजण मिळून हे पूर्ण सुकलेले जळण माळ्यावर रचतात. पाऊस जरी सप्टेंबरनंतरही लांबला तरी या जळणाचा आधार त्यांना असतो.

पावसाळ्यात घरांना झडपा घातल्या जातात. यामुळे भिंती भिजत नाहीत. घरांवरील कौलांची शेकरण केली जाते. घरामध्ये पाऊस येऊ नये, यासाठी ही उपाययोजना असते. यासोबतच पोटासाठी लागणारा पैसाही सुरक्षितपणे साठवून ठेवला जातो. चटणी, तेल, मीठ, तांदूळ, ज्वारी एवढं जरी जवळ असलं तरी मग रानभाज्या, मासे खाऊनच हे लोक दिवस काढतात. जनावरांचीदेखील व्यवस्थित सोय केली जाते. गोठ्यांची दुरुस्ती करुन घेतली जाते. घरात पाणी घुसू नये, यासाठी ताली बांधल्या जातात. हा सर्व जामानिमा गोळा करुन ठेवण्याची परंपरागत पद्धत या भागात आहे.

पश्चिम भागात ही चालतात कामे...

तरव्याच्या भाजण्या, नांगरणीची कामे, भातखाचरांची डागडुजी, नाचणी शेतीची मशागत, ताली धरणे, पाण्यासाठी पाट तयार करणे, नवीन वावरं तयार करणे. काट्याकुट्यांची अडगळ बाजूला करणे, पडक्या नादुरूस्त भिंती दुरूस्त करणे, घरांची झाडलोट, ढापावरील कचरा काढून कपड्यावरून बांधणी, झडपी बांधणे, घर शाकारणे, लाकडं, शेणकुट, गवत भरणे, गवताच्या राख्या राखून कुंपण करणे, ताली बांधणे, नवीन गोठा तयार करणे, झरा सुरक्षित ठेवणे, चारा गंजी रचणे, शेणारा रचणे, अन्नधान्य साठवणूक करणे ही कामे उन्हाळ्यातच केली जातात.

(सागर गुजर)

फोटो नेम : २४ सागर ०१,०२,०३