शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
4
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
5
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
6
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
7
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
8
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
9
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
10
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
11
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
12
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
13
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
15
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
16
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
17
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
18
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
19
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
20
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव

सातारकर पितायत क्षारमुुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:55 IST

सातारा : आपण पित असलेले पाणी कितपत शुद्ध आहे? असा प्रश्न पडणाऱ्या सातारकरांना एक दिलासादायी बातमी आहे. शहराला पाणीपुरवठा ...

सातारा : आपण पित असलेले पाणी कितपत शुद्ध आहे? असा प्रश्न पडणाऱ्या सातारकरांना एक दिलासादायी बातमी आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास व शहापूर योजनेचे पाणी शुद्ध व पिण्यायोग्य असून, त्यामध्ये क्षारांचे प्रमाणही कमी आहे. पालिकेकडून केल्या जाणाऱ्या पाणी तपासणी अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे.

सातारा शहराला कास व शहापूर योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. कास ही शहराची सर्वांत जुनी पाणी योजना आहे. ही योजना ब्रिटिशकालीन असल्याने पूर्वी खापरी नळातून पाणी सातारा शहरात येत होते. कालांतराने खापरी नळांची जागा बंदिस्त पाईपलाईनने घेतली. शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार पाहता पालिकेकडून शहापूर योजना सन २००४ साकारण्यात आली. उरमोडी नदीचे पाणी पंंपिंग करून ते जकातवाडी येथील जलशुद्धिकरण केंद्रात आणले जाते.

सध्या कास योजनेतून शहराला दररोज ५.५० लाख तर शहापूर योजनेच्या माध्यमातून ७.५० लाख लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. शहापूरचे पाणी जकातवाडी तर कासचे पॉवरहाऊस येथील जलशुद्धिकरण केंद्रात शुद्ध केले जाते. त्यानंतर साठवण टाक्यांतून नागरिकांना वितरीत केले जाते. पाणी शुद्ध करण्यासाठी ब्लिचिंग पावडर व तुरटीचा उपयोग केला जातो शिवाय या पाण्याची प्रयोगशाळेत दैनंदिन तपासणीही केली जाते.

(पॉइंटर)

- १,२०,१९५ शहराची लोकसंख्या

- ११० लिटर प्रतिमाणसी दिले जाते पाणी

- ११ टाक्या पाणी वितरण करण्यासाठी

- २ जलशुद्धिकरण केंद्रे

(चौकट)

अशी हाेते तपासणी

- पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाण्याची दैनंदिन तपासणी केली जाते. कर्मचारी आठवड्यातून एकदा पेठेत जावून नळाचे पाणी संकलित करतात.

- हे पाणी शासकीय प्रयोगशाळेत तपासण्यासाठी दिले जाते.

- या ठिकाणी पाण्याच्या निरनिराळ्या तपासण्या करून, पाण्याच्या नमुन्यात रोगजंतू आहेत का, ते पिण्याजोगे शुद्ध आहे किंवा नाही याची तपासणी केली जाते.

(चौकट)

वीस प्रभागांतून घेतले

जातात पाण्याचे नमुने

सातारा पालिकेकडून शहरातील वीस प्रभागांमधून पाण्याचे संकलन केले जाते. यासाठी पाणीपुरवठा विभागाने एक पथक नेमले आहे. जलशुद्धिकरण केंद्रातून पाणी साठवण टाक्यांमध्ये भरले जाते. त्यानंतर त्या नागरिकांना पुरवठा केला जातो. प्रत्येक पेठेतील पाणी आठवड्यातून एकदा घरातून संकलित केले जाते. हे पाणी एका काचेच्या बाटलीत भरून पुढे त्याची शुद्धता व इतर चाचणीसाठी सरकारी प्रयोगशाळेत पाठविले जाते.

(कोट)

सातारा शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी पालिका प्रशासनाचे नेहमीच प्रयत्न असतात. पाण्याची दैनंदिन तपासणी करून त्याचा अहवाल मागविला जातो. केवळ पावसाळ्यात काही दिवस दूषित पाणीपुरवठा होतो, मात्र पालिकेकडून याबाबतही खबरदारी घेतली जाते.

- यशोधन नारकर, पाणीपुरवठा सभापती