शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
4
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
8
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
9
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
10
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
11
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
12
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
13
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
14
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
15
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
16
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
17
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
18
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
19
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
20
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?

सातारकर पितायत क्षारमुुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:55 IST

सातारा : आपण पित असलेले पाणी कितपत शुद्ध आहे? असा प्रश्न पडणाऱ्या सातारकरांना एक दिलासादायी बातमी आहे. शहराला पाणीपुरवठा ...

सातारा : आपण पित असलेले पाणी कितपत शुद्ध आहे? असा प्रश्न पडणाऱ्या सातारकरांना एक दिलासादायी बातमी आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास व शहापूर योजनेचे पाणी शुद्ध व पिण्यायोग्य असून, त्यामध्ये क्षारांचे प्रमाणही कमी आहे. पालिकेकडून केल्या जाणाऱ्या पाणी तपासणी अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे.

सातारा शहराला कास व शहापूर योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. कास ही शहराची सर्वांत जुनी पाणी योजना आहे. ही योजना ब्रिटिशकालीन असल्याने पूर्वी खापरी नळातून पाणी सातारा शहरात येत होते. कालांतराने खापरी नळांची जागा बंदिस्त पाईपलाईनने घेतली. शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार पाहता पालिकेकडून शहापूर योजना सन २००४ साकारण्यात आली. उरमोडी नदीचे पाणी पंंपिंग करून ते जकातवाडी येथील जलशुद्धिकरण केंद्रात आणले जाते.

सध्या कास योजनेतून शहराला दररोज ५.५० लाख तर शहापूर योजनेच्या माध्यमातून ७.५० लाख लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. शहापूरचे पाणी जकातवाडी तर कासचे पॉवरहाऊस येथील जलशुद्धिकरण केंद्रात शुद्ध केले जाते. त्यानंतर साठवण टाक्यांतून नागरिकांना वितरीत केले जाते. पाणी शुद्ध करण्यासाठी ब्लिचिंग पावडर व तुरटीचा उपयोग केला जातो शिवाय या पाण्याची प्रयोगशाळेत दैनंदिन तपासणीही केली जाते.

(पॉइंटर)

- १,२०,१९५ शहराची लोकसंख्या

- ११० लिटर प्रतिमाणसी दिले जाते पाणी

- ११ टाक्या पाणी वितरण करण्यासाठी

- २ जलशुद्धिकरण केंद्रे

(चौकट)

अशी हाेते तपासणी

- पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाण्याची दैनंदिन तपासणी केली जाते. कर्मचारी आठवड्यातून एकदा पेठेत जावून नळाचे पाणी संकलित करतात.

- हे पाणी शासकीय प्रयोगशाळेत तपासण्यासाठी दिले जाते.

- या ठिकाणी पाण्याच्या निरनिराळ्या तपासण्या करून, पाण्याच्या नमुन्यात रोगजंतू आहेत का, ते पिण्याजोगे शुद्ध आहे किंवा नाही याची तपासणी केली जाते.

(चौकट)

वीस प्रभागांतून घेतले

जातात पाण्याचे नमुने

सातारा पालिकेकडून शहरातील वीस प्रभागांमधून पाण्याचे संकलन केले जाते. यासाठी पाणीपुरवठा विभागाने एक पथक नेमले आहे. जलशुद्धिकरण केंद्रातून पाणी साठवण टाक्यांमध्ये भरले जाते. त्यानंतर त्या नागरिकांना पुरवठा केला जातो. प्रत्येक पेठेतील पाणी आठवड्यातून एकदा घरातून संकलित केले जाते. हे पाणी एका काचेच्या बाटलीत भरून पुढे त्याची शुद्धता व इतर चाचणीसाठी सरकारी प्रयोगशाळेत पाठविले जाते.

(कोट)

सातारा शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी पालिका प्रशासनाचे नेहमीच प्रयत्न असतात. पाण्याची दैनंदिन तपासणी करून त्याचा अहवाल मागविला जातो. केवळ पावसाळ्यात काही दिवस दूषित पाणीपुरवठा होतो, मात्र पालिकेकडून याबाबतही खबरदारी घेतली जाते.

- यशोधन नारकर, पाणीपुरवठा सभापती