शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सातारकर पितायत क्षारमुुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:55 IST

सातारा : आपण पित असलेले पाणी कितपत शुद्ध आहे? असा प्रश्न पडणाऱ्या सातारकरांना एक दिलासादायी बातमी आहे. शहराला पाणीपुरवठा ...

सातारा : आपण पित असलेले पाणी कितपत शुद्ध आहे? असा प्रश्न पडणाऱ्या सातारकरांना एक दिलासादायी बातमी आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास व शहापूर योजनेचे पाणी शुद्ध व पिण्यायोग्य असून, त्यामध्ये क्षारांचे प्रमाणही कमी आहे. पालिकेकडून केल्या जाणाऱ्या पाणी तपासणी अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे.

सातारा शहराला कास व शहापूर योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. कास ही शहराची सर्वांत जुनी पाणी योजना आहे. ही योजना ब्रिटिशकालीन असल्याने पूर्वी खापरी नळातून पाणी सातारा शहरात येत होते. कालांतराने खापरी नळांची जागा बंदिस्त पाईपलाईनने घेतली. शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार पाहता पालिकेकडून शहापूर योजना सन २००४ साकारण्यात आली. उरमोडी नदीचे पाणी पंंपिंग करून ते जकातवाडी येथील जलशुद्धिकरण केंद्रात आणले जाते.

सध्या कास योजनेतून शहराला दररोज ५.५० लाख तर शहापूर योजनेच्या माध्यमातून ७.५० लाख लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. शहापूरचे पाणी जकातवाडी तर कासचे पॉवरहाऊस येथील जलशुद्धिकरण केंद्रात शुद्ध केले जाते. त्यानंतर साठवण टाक्यांतून नागरिकांना वितरीत केले जाते. पाणी शुद्ध करण्यासाठी ब्लिचिंग पावडर व तुरटीचा उपयोग केला जातो शिवाय या पाण्याची प्रयोगशाळेत दैनंदिन तपासणीही केली जाते.

(पॉइंटर)

- १,२०,१९५ शहराची लोकसंख्या

- ११० लिटर प्रतिमाणसी दिले जाते पाणी

- ११ टाक्या पाणी वितरण करण्यासाठी

- २ जलशुद्धिकरण केंद्रे

(चौकट)

अशी हाेते तपासणी

- पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाण्याची दैनंदिन तपासणी केली जाते. कर्मचारी आठवड्यातून एकदा पेठेत जावून नळाचे पाणी संकलित करतात.

- हे पाणी शासकीय प्रयोगशाळेत तपासण्यासाठी दिले जाते.

- या ठिकाणी पाण्याच्या निरनिराळ्या तपासण्या करून, पाण्याच्या नमुन्यात रोगजंतू आहेत का, ते पिण्याजोगे शुद्ध आहे किंवा नाही याची तपासणी केली जाते.

(चौकट)

वीस प्रभागांतून घेतले

जातात पाण्याचे नमुने

सातारा पालिकेकडून शहरातील वीस प्रभागांमधून पाण्याचे संकलन केले जाते. यासाठी पाणीपुरवठा विभागाने एक पथक नेमले आहे. जलशुद्धिकरण केंद्रातून पाणी साठवण टाक्यांमध्ये भरले जाते. त्यानंतर त्या नागरिकांना पुरवठा केला जातो. प्रत्येक पेठेतील पाणी आठवड्यातून एकदा घरातून संकलित केले जाते. हे पाणी एका काचेच्या बाटलीत भरून पुढे त्याची शुद्धता व इतर चाचणीसाठी सरकारी प्रयोगशाळेत पाठविले जाते.

(कोट)

सातारा शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी पालिका प्रशासनाचे नेहमीच प्रयत्न असतात. पाण्याची दैनंदिन तपासणी करून त्याचा अहवाल मागविला जातो. केवळ पावसाळ्यात काही दिवस दूषित पाणीपुरवठा होतो, मात्र पालिकेकडून याबाबतही खबरदारी घेतली जाते.

- यशोधन नारकर, पाणीपुरवठा सभापती