शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

शंभरीनंतरही कृष्णा पूल हट्टाखट्टा !

By admin | Updated: February 2, 2015 00:07 IST

‘संगम माहुली’चा शतकवीर : दररोज हजारो वाहनांची वाहतूक करण्यासाठी स्थितप्रज्ञासारखा उभा

जगदीश कोष्टी - सातारा -सातारा-कोरेगाव मार्गावरील माहुली येथे कृष्णानदीवर असलेला ब्रिटिशकालीन पूल जून महिन्यात शंभर वर्षे पूर्ण करत आहेत. या पुलाने शंभरी पूर्ण करूनही हा पूल दररोज हजारो वाहनांची वाहतूक करण्यासाठी स्थितप्रज्ञासारखा उभा आहे. इंग्रजांनी देश सोडून ६६ वर्षे झाली; पण त्यांच्या असंख्य खाणाखुणा आजही आहेत. त्यातील काही आठवणी चांगल्या आहेत, तर काही वाईट आहेत. त्यातील एक चांगली आठवण म्हणजे सातारा-सोलापूर मार्गावर माहुली येथील कृष्णापूल. मुंबई प्रांताचे लॉर्ड विल्सन यांच्या हस्ते २७ जून १९१५ मध्ये कृष्णा पुलाचे लोकार्पण झाले. त्यामुळे या पुलाला ‘द विल्सन ब्रिज’ हे नाव देण्यात आले. या पुलाच्या कामाला १९११ मध्ये मान्यता मिळाली मिळाली होती. चार वर्षे काम चाललेल्या या पुलाला शंभर वर्षांपूर्वी सुमारे ४ लाख ७५ हजार रुपये खर्च झाला होता. ‘द विल्सन ब्रिज’ हा पूल कृष्णा नदीवर असल्याने काळांतराने हा पूल ‘कृष्णा पूल’ म्हणून ओळखला जाऊ लागला. या पुलाचे बांधकाम पूर्ण दगडात असून, याला सात गाळे आहेत. पुलाची लांबी १४० मीटर आहे. कृष्णा नदी कितीही दुथडी भरून वाहत असली तरी हा पूल कधीही पाण्याखाली गेला नाही.रस्ते चांगले झाले, त्याचप्रमाणे हजारो वाहने या पुलावरून धावू लागली. त्यामुळे या पुलावर अनेकदा लहान-मोठे अपघातही झाले आहेत. त्यामुळे या होणारे नुकसान सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे वेळोवेळी भरून काढले जाते. खड्डे भरून घेणे, डागडुजी करणे, कठडे दुरुस्त करण्याचे काम वेळोवेळी केले जाते. यामुळे या पुलाला कसलाही धोका नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एकविसाव्या शतकात अभियांत्रिकी क्षेत्रात नवनवीन क्रांती घडत असतानाही तयार केलेले बांधकाम काही वर्षेच टिकतात. त्यानंतर त्याची पडझड सुरू होत असल्याचे दिसून येते. मात्र, ब्रिटिशांनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी उभारलेल्या पुलाच्या आयुष्यासाठी लाखो रुपये ओतले. त्यामुळे कामाचा दर्जा सांगण्यासाठी कोणत्याही फूटपट्टीची गरज भासत नाही.सातारा शहराजवळील कृष्णा नदीवरील हा पूलच दिमाखात सातारकरांच्या सेवेत आजही उभा असल्याचे दिसत आहे. वेळोवेळी मलमपट्टी अन् रंगरंगोटीया पुलावरून दररोज हजारो लहान-मोठी वाहने धावत असतात. त्यामुळे पुलाची झीज होत असतेच. तसेच लहान-मोठ्या अपघातांमुळे कठडे तुटतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे दरवर्षी डागडुजी तसेच रंगरंगोटी केली जाते.माहुली येथील कृष्णा पुलाची गेल्या दीड वर्षापूर्वीच पाहणी व सर्व्हे करण्यात आला होता. या पाहणीत असे आढळून आले आहे की, पूल शंभर वर्षांचा होत असला तरी या पुलाला कसलाही धोका नाही. मजबूत बांधकाम असल्याने आणखी किमान दहा वर्षे तरी पूल सुरक्षित राहील.- एस. एन. राजघोष,कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागसातारा-सोलापूर मार्गावरील माहुली येथील ब्रिटीशकालीन कृष्णापूल शंभर वर्षांनंतरही दणकट आहे.