शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

शंभरीनंतरही कृष्णा पूल हट्टाखट्टा !

By admin | Updated: February 2, 2015 00:07 IST

‘संगम माहुली’चा शतकवीर : दररोज हजारो वाहनांची वाहतूक करण्यासाठी स्थितप्रज्ञासारखा उभा

जगदीश कोष्टी - सातारा -सातारा-कोरेगाव मार्गावरील माहुली येथे कृष्णानदीवर असलेला ब्रिटिशकालीन पूल जून महिन्यात शंभर वर्षे पूर्ण करत आहेत. या पुलाने शंभरी पूर्ण करूनही हा पूल दररोज हजारो वाहनांची वाहतूक करण्यासाठी स्थितप्रज्ञासारखा उभा आहे. इंग्रजांनी देश सोडून ६६ वर्षे झाली; पण त्यांच्या असंख्य खाणाखुणा आजही आहेत. त्यातील काही आठवणी चांगल्या आहेत, तर काही वाईट आहेत. त्यातील एक चांगली आठवण म्हणजे सातारा-सोलापूर मार्गावर माहुली येथील कृष्णापूल. मुंबई प्रांताचे लॉर्ड विल्सन यांच्या हस्ते २७ जून १९१५ मध्ये कृष्णा पुलाचे लोकार्पण झाले. त्यामुळे या पुलाला ‘द विल्सन ब्रिज’ हे नाव देण्यात आले. या पुलाच्या कामाला १९११ मध्ये मान्यता मिळाली मिळाली होती. चार वर्षे काम चाललेल्या या पुलाला शंभर वर्षांपूर्वी सुमारे ४ लाख ७५ हजार रुपये खर्च झाला होता. ‘द विल्सन ब्रिज’ हा पूल कृष्णा नदीवर असल्याने काळांतराने हा पूल ‘कृष्णा पूल’ म्हणून ओळखला जाऊ लागला. या पुलाचे बांधकाम पूर्ण दगडात असून, याला सात गाळे आहेत. पुलाची लांबी १४० मीटर आहे. कृष्णा नदी कितीही दुथडी भरून वाहत असली तरी हा पूल कधीही पाण्याखाली गेला नाही.रस्ते चांगले झाले, त्याचप्रमाणे हजारो वाहने या पुलावरून धावू लागली. त्यामुळे या पुलावर अनेकदा लहान-मोठे अपघातही झाले आहेत. त्यामुळे या होणारे नुकसान सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे वेळोवेळी भरून काढले जाते. खड्डे भरून घेणे, डागडुजी करणे, कठडे दुरुस्त करण्याचे काम वेळोवेळी केले जाते. यामुळे या पुलाला कसलाही धोका नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एकविसाव्या शतकात अभियांत्रिकी क्षेत्रात नवनवीन क्रांती घडत असतानाही तयार केलेले बांधकाम काही वर्षेच टिकतात. त्यानंतर त्याची पडझड सुरू होत असल्याचे दिसून येते. मात्र, ब्रिटिशांनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी उभारलेल्या पुलाच्या आयुष्यासाठी लाखो रुपये ओतले. त्यामुळे कामाचा दर्जा सांगण्यासाठी कोणत्याही फूटपट्टीची गरज भासत नाही.सातारा शहराजवळील कृष्णा नदीवरील हा पूलच दिमाखात सातारकरांच्या सेवेत आजही उभा असल्याचे दिसत आहे. वेळोवेळी मलमपट्टी अन् रंगरंगोटीया पुलावरून दररोज हजारो लहान-मोठी वाहने धावत असतात. त्यामुळे पुलाची झीज होत असतेच. तसेच लहान-मोठ्या अपघातांमुळे कठडे तुटतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे दरवर्षी डागडुजी तसेच रंगरंगोटी केली जाते.माहुली येथील कृष्णा पुलाची गेल्या दीड वर्षापूर्वीच पाहणी व सर्व्हे करण्यात आला होता. या पाहणीत असे आढळून आले आहे की, पूल शंभर वर्षांचा होत असला तरी या पुलाला कसलाही धोका नाही. मजबूत बांधकाम असल्याने आणखी किमान दहा वर्षे तरी पूल सुरक्षित राहील.- एस. एन. राजघोष,कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागसातारा-सोलापूर मार्गावरील माहुली येथील ब्रिटीशकालीन कृष्णापूल शंभर वर्षांनंतरही दणकट आहे.