शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

शंभरीनंतरही कृष्णा पूल हट्टाखट्टा !

By admin | Updated: February 2, 2015 00:07 IST

‘संगम माहुली’चा शतकवीर : दररोज हजारो वाहनांची वाहतूक करण्यासाठी स्थितप्रज्ञासारखा उभा

जगदीश कोष्टी - सातारा -सातारा-कोरेगाव मार्गावरील माहुली येथे कृष्णानदीवर असलेला ब्रिटिशकालीन पूल जून महिन्यात शंभर वर्षे पूर्ण करत आहेत. या पुलाने शंभरी पूर्ण करूनही हा पूल दररोज हजारो वाहनांची वाहतूक करण्यासाठी स्थितप्रज्ञासारखा उभा आहे. इंग्रजांनी देश सोडून ६६ वर्षे झाली; पण त्यांच्या असंख्य खाणाखुणा आजही आहेत. त्यातील काही आठवणी चांगल्या आहेत, तर काही वाईट आहेत. त्यातील एक चांगली आठवण म्हणजे सातारा-सोलापूर मार्गावर माहुली येथील कृष्णापूल. मुंबई प्रांताचे लॉर्ड विल्सन यांच्या हस्ते २७ जून १९१५ मध्ये कृष्णा पुलाचे लोकार्पण झाले. त्यामुळे या पुलाला ‘द विल्सन ब्रिज’ हे नाव देण्यात आले. या पुलाच्या कामाला १९११ मध्ये मान्यता मिळाली मिळाली होती. चार वर्षे काम चाललेल्या या पुलाला शंभर वर्षांपूर्वी सुमारे ४ लाख ७५ हजार रुपये खर्च झाला होता. ‘द विल्सन ब्रिज’ हा पूल कृष्णा नदीवर असल्याने काळांतराने हा पूल ‘कृष्णा पूल’ म्हणून ओळखला जाऊ लागला. या पुलाचे बांधकाम पूर्ण दगडात असून, याला सात गाळे आहेत. पुलाची लांबी १४० मीटर आहे. कृष्णा नदी कितीही दुथडी भरून वाहत असली तरी हा पूल कधीही पाण्याखाली गेला नाही.रस्ते चांगले झाले, त्याचप्रमाणे हजारो वाहने या पुलावरून धावू लागली. त्यामुळे या पुलावर अनेकदा लहान-मोठे अपघातही झाले आहेत. त्यामुळे या होणारे नुकसान सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे वेळोवेळी भरून काढले जाते. खड्डे भरून घेणे, डागडुजी करणे, कठडे दुरुस्त करण्याचे काम वेळोवेळी केले जाते. यामुळे या पुलाला कसलाही धोका नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एकविसाव्या शतकात अभियांत्रिकी क्षेत्रात नवनवीन क्रांती घडत असतानाही तयार केलेले बांधकाम काही वर्षेच टिकतात. त्यानंतर त्याची पडझड सुरू होत असल्याचे दिसून येते. मात्र, ब्रिटिशांनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी उभारलेल्या पुलाच्या आयुष्यासाठी लाखो रुपये ओतले. त्यामुळे कामाचा दर्जा सांगण्यासाठी कोणत्याही फूटपट्टीची गरज भासत नाही.सातारा शहराजवळील कृष्णा नदीवरील हा पूलच दिमाखात सातारकरांच्या सेवेत आजही उभा असल्याचे दिसत आहे. वेळोवेळी मलमपट्टी अन् रंगरंगोटीया पुलावरून दररोज हजारो लहान-मोठी वाहने धावत असतात. त्यामुळे पुलाची झीज होत असतेच. तसेच लहान-मोठ्या अपघातांमुळे कठडे तुटतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे दरवर्षी डागडुजी तसेच रंगरंगोटी केली जाते.माहुली येथील कृष्णा पुलाची गेल्या दीड वर्षापूर्वीच पाहणी व सर्व्हे करण्यात आला होता. या पाहणीत असे आढळून आले आहे की, पूल शंभर वर्षांचा होत असला तरी या पुलाला कसलाही धोका नाही. मजबूत बांधकाम असल्याने आणखी किमान दहा वर्षे तरी पूल सुरक्षित राहील.- एस. एन. राजघोष,कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागसातारा-सोलापूर मार्गावरील माहुली येथील ब्रिटीशकालीन कृष्णापूल शंभर वर्षांनंतरही दणकट आहे.