शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

पळसांच्या पानाअभावी पत्रावळी पडद्याआड!

By admin | Updated: April 8, 2015 23:53 IST

पारंपरिक व्यवसाय धोक्यात : प्लॅस्टिक अन् फायबरचा जमाना

परळी : ‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरींचं’ म्हणत लग्न किंवा इतर समारंभात पळसांच्या पानांच्या पत्रावळीवर उठणाऱ्या पंक्ती आता कमी होऊ लागल्या आहेत. साहजिकच या पत्रावळींची जागा प्लास्टिक, थर्माकोलच्या पत्रावळींनी घेतल्याने पानांपासून पत्रावळी बनवणाऱ्या पारंपरिक व्यवसाय धोक्यात आला आहे.पूर्वी परळी खोऱ्यासह खेडोपाड्यात शहरात सर्वत्र विवाह, सप्ताह व इतर सार्वजनिक कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात पळसांच्या पानापासून बनविलेल्या पत्रावळ्या वापरल्या जायच्या. मात्र, सध्याच्या युगात या पत्रावळी कोणत्याही कार्यक्रमात दिसत नाहीत. या पत्रावळींची जागा प्लास्टिक, थर्माकोलच्या पत्रावळींनी घेतली आहे. पूर्वी परिसरातील डोंगरामध्ये, गावांमध्ये पळसांची पाने विपूल प्रमाणात आढळून येत असत. या व्यवसायात जास्त प्रमाणात महिलांचाच सहभाग असून, यातील काही महिला व व्यवसायावरच कुटुंबाचे उदरनिर्वाह सांभाळत आहेत.ग्रामीण भागातील यात्रांचा हंगाम, सुटीत आलेल्या पाहुण्यांना ताटात जेवण न देता पत्रावळीत आवडीने वाढले जायचे; मात्र अलीकडच्या काळात पत्रावळींचे महत्त्व कमी झाले असून, प्लास्टिक व थर्माकोलला महत्त्व आलेले दिसत आहे. (वार्ताहर)पळसांच्या पानाची पत्रावळी बनविण्यास खूप वेळ लागतो; परंतु प्लॅस्टिकच्या, थर्माकोलची पत्रावळी बनविण्यास वेळ लागत नसून चक्क एका तासात एक हजार पत्रावळ्या तयार होतात; परंतु सध्याच्या पत्रावळ्या स्वस्त असल्याने प्लास्टिक, थर्माकोलच्या पत्रावळ्यांची मागणी वाढली असून चुकून कुठे तरी पळसांच्या पानाची पत्रावळी पाहावयास मिळत आहे.-संपत पवार, व्यावसायिक, वाघमवाडीआयुर्वेदिक पत्रावळी पंक्तीतून हद्दपारपुरातन काळापासून मंगल कार्यालयातील जेवण समारंभासाठी पळसांच्या पानापासून बनविलेल्या पत्रावळी व द्रोणांचा वापर केला जात असे. पळसांच्या पानात आयुर्वेदिक गुणधर्म असल्याने अन्नपचन होण्यास मदत होते. पळसांच्या पत्रावळी शिवण्यासाठी लिंबाच्या काडीचा वापर केला जातो. लिंबाच्या झाडालाही आयुर्वेदात महत्त्व आहे. शिवाय पळसांच्या पानाला कीडही लागत नाही. या पत्रावळी सहज उपलब्ध होतात. मात्र, स्वस्त आयुर्वेदिक महत्त्व असलेल्या या पत्रावळीच पंक्तीतून हद्दपार होत असल्याचे चित्र आहे.