शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

पाऊलवाटेने सात किलोमीटर पायपीट

By admin | Updated: May 14, 2015 00:29 IST

कोळेकरवाडी, वनवासवाडी गावांची व्यथा : अनेक वर्षांपासून रस्त्याचा प्रश्न प्रलंबित

चाफळ : रस्त्यासाठी संघर्ष करीत आमच्या दोन पिढ्या संपल्या. तरीही डोळ्यावर पट्टी बांधून बसलेल्या शासनाला आजही जाग येत नाही. ‘गाव तेथे रस्ता,’ या घोषणेचा डांगोरा पिटणाऱ्या शासनाने आमच्यावरच का अन्याय केला आहे. स्वातंत्र्यानंतरही आमच्यावर पारतंत्र्याचं जिणं जगण्याची वेळ आली असून, आमच्या गावाला रस्ता मिळणार का? असा सवाल कोळेकरवाडी व वनवासवाडी ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.पाटण तालुक्याच्या दुर्गम व डोंगरदऱ्यांनी व्यापलेल्या चाफळपासून सात किलोमीटर अंतरावर उंच डोंगराच्या माथ्यावर ही गावे एकमेकापासून केवळ पाचशे मीटर अंतरावर वसली आहेत. याठिकाणी रस्ताच नसल्याने या गावांना मूलभूत सुविधा म्हणजे काय? हे आजही माहीत नाही. कोळेकरवाडी व वनवासवाडी या गावांना ये-जा करण्यासाठी ग्रामस्थांनी डोंगरातून पाऊलवाट तयार केली आहे. येथील ग्रामस्थ, महिला आजही डोंगराच्या पायवाटेने पायपीट करीत शिंगणवाडीत येतात. तेथून खासगी वाहनाने अथवा पुन्हा पायपीट करीत चाफळच्या बाजाराला जावे लागते. ही अवस्था वर्षोनुवर्षे तशीच असून, या नरक यातनेतून त्यांना आजही कोेणीही सोडवलेले नाही. डोंगर पायथ्याची गावे निर्मलगावे झाली असली तरी डोंगरावरील या छोट्याशा गावात योजना न पोहोचल्याने गावात अस्वच्छतेचे अक्षरश: साम्राज्य पसरलेले पाहावयास मिळत आहे. कोळेकरवाडी व वनवासवाडी गावांना ये-जा करण्यासाठी शिंगणवाडी-बोर्गेवाडीमार्गे रस्ता काढल्यास केवळ दोन किलोमीटर अंतरात हा रस्ता तयार होऊन चार गावे एकमेकांना जोडली जातील. मात्र, याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही, असे ग्रामस्थांचे म्हणने आहे. (वार्ताहर)नवीन रस्ता केल्यास दळणवळणाचा प्रश्न निकालीमाजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी दाढोली-पाटण, जळवखिंड फोडून मणदुरेमार्गे पाटण यासारखे अनेक महत्त्वकांक्षी रस्ते तयार केले आहेत. मात्र गेल्या २७ वर्षांपासून त्यांची पाठराखण करणाऱ्या या गावांना रस्त्यापासून वंचित का ठेवले? असा सवाल उपस्थित केला जात आहे. डेरवण ते बहिरेवाडी या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण केल्यास आणि वनवासवाडी-कोळेकरवाडी ते बहिरेवाडी नवीन रस्ता तयार केल्यास या तिन्ही गावांचा दळणवळणाचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.