शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

निसर्गरम्य सागरेश्वरमध्ये रंगलं ‘आपलं साहित्य संमेलन’

By admin | Updated: September 11, 2014 00:12 IST

कविसंमेलनाला दाद

देवराष्ट्रे : वार रविवार... सागरेश्वर अभयारण्यातील निसर्गरम्य ठिकाण... आभाळातून पळणारे ढग अन् मध्येच डोकावणारा सूर्यनारायण, पक्ष्यांचा किलबिलाट अन् मधूनच येणारा मोरांचा केंकारणारा आवाज... अशा विलोभनीय वातावरणात ‘आपलं साहित्य संमेलन’ दिलखुलास रंगलं. दिवसभरात पावसाची सर आलीच नाही. मात्र विविध विषयाला स्पर्श करणाऱ्या काव्यधारांनी उपस्थित श्रोते न्हाऊन निघाले.निमित्त होतं सागरेश्वर अभयारण्याचे जनक, साहित्यिक, वृक्षमित्र धों. म. मोहिते यांच्या स्मृतिदिनाचं. कडेगाव-खानापूर तालुका साहित्य परिषद व वृक्षमित्र धों. म. मोहिते चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने प्रतिवर्षी स्मृतिदिनानिमित्त ‘आपलं साहित्य संमेलन’ आयोजित केले जाते. यंदाचे संमेलनाचे पाचवे वर्ष. या संमेलनात ना सभामंडप ना ध्वनिक्षेपकाची सोय, ना निमंत्रण पत्रिका ना जेवणाची सोय. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक साहित्यिक घरातूनच जेवणाची शिदोरी बरोबर घेऊन येतो, हे या संमेलनाचं आगळंवेगळं वैशिष्ट्य. साहित्यिक रघुराज मेटकरी यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन पार पडले. यावेळी समाधान पोरे यांना वृक्षमित्र धों. म. मोहिते ‘पर्यावरण पत्रकार’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मेटकरी यांच्याहस्ते व अ‍ॅड. सुभाष पाटील, प्रा. विश्वनाथ गायकवाड, बी. टी. महिंद, रानकवी सु. धों. मोहिते यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण झाले. मेटकरी म्हणाले, ग्रामीण साहित्य समाजापर्यंत पोहोचले पाहिजे. नवोदित लेखकांना पाठबळ मिळणे आवश्यक आहे. संमेलनात राजा रावळ, रवी राजमाने, स्वाती पवार, प्रा. विजय जंगम, भानुदास आंबी, एकनाथ गायकवाड, अरविंद पत्की, अनुराधा पत्की, किरण भिंगारदेवे, किरण शिंदे, जयवंत आवटी, बाळ बाबर, प्रदीप सुतार, बाळासाहेब मोहिते, अनिल पवार सहभागी झाले होते. (वार्ताहर)कविसंमेलनाला दादवनभोजनानंतर दुसऱ्या सत्रात कविसंमेलन चांगलेच रंगले. हौसाताई जाधव यांनी सागरेश्वर अभयारण्य उभारणीतील कामाचे चित्र गीतातून उभे केले. राहुल वीर यांनी ‘आयुष्याचा नवा रंग’ काव्यातून सादर केला. अंधकवी चंद्रकांत देशमुख यांनी शेजारील राष्ट्राच्या कारवायांवर प्रकाशझोत टाकला, तर सौ. संजीवनी कुलकर्णी यांनी ‘सावधान माणसा’ असा कवितेतून इशारा दिला. एम. बी. जमादार यांनी गझल सादर केली.