शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची डरकाळी घुमणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:19 IST

वारणावती : डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा व तेथील वाघांचा अधिवास, खाद्य, वातावरण याचा अभ्यास ...

वारणावती : डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा व तेथील वाघांचा अधिवास, खाद्य, वातावरण याचा अभ्यास गेल्या चार वर्षांपासून केला जात आहे. हा अहवाल आता अंतिम टप्प्यात असून, अहवाल सादर झाल्यानंतर वाघांच्या पुनर्वसनाला हिरवा कंदील मिळेल, अशी अपेक्षा आहे.

देशातील अन्य व्याघ्र प्रकल्पांतील वाघांच्या संवर्धनासाठी दिल्ली येथे चार वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय चर्चासत्र झाले होते. भारतासह १४ देशांतील प्रतिनिधी या चर्चासत्रात सहभागी होते. सध्या काही प्रकल्प क्षेत्रात वाघांची संख्या अत्यल्प असून, काही ठिकाणी जास्त आहे. क्षमतेपेक्षा जास्त संख्या असणाऱ्या प्रकल्प क्षेत्रातील वाघ कमी संख्या असणाऱ्या प्रकल्प क्षेत्रात आणून सोडण्यासह वाघांची संख्या व तिच्या संवर्धनासाठी आवश्यक बाबी यावर या बैठकीत विचारविनिमय झाला होता. त्यानुसार वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.

त्या अनुषंगाने डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेकडून गेल्या तीन वर्षांपासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्राचा अभ्यास सुरू आहे. गेल्या दहा वर्षांत प्रकल्प क्षेत्रात वाघांचे अस्तित्वच (२०१८ चा अपवाद वगळता) आढळून आले नाही. त्यामुळे प्रकल्पातील वाघ गेले कुठे? असा सवाल उपस्थित होत होता. शासनाने व्याघ्र प्रकल्प घोषित केला; पण वाघाविनाच व्याघ्र प्रकल्प. अशी अवस्था झाली होती. पण आता भारतीय वन्यजीव संस्थेकडून अंतिम अहवाल सादर झाल्यानंतर वाघांच्या पुनर्वसनामुळे सह्याद्रीत वाघ बघायला मिळतील, अशी अपेक्षा आहे.

चौकट

सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या हद्दीत चांदोली, कोयना, दाजीपूर अभयारण्यातील ६९०.६३ चौरस किलोमीटर क्षेत्राचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साकारला आहे. वाघांचे प्रमुख खाद्य असणाऱ्या सांबराची या परिसरात संख्या कमी आहे. त्यामुळे सांबर तसेच चितळ सागरेश्वर व कात्रज या ठिकाणाहून आणून प्रकल्प क्षेत्रात सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी १४ हेक्टरचे संरक्षित क्षेत्र तयार करण्याचे काम सुरू आहे.

काेट

वाघांच्या पुनर्वसनासंदर्भात भारतीय वन्यजीव संस्थेकडून वाघांचा अधिवास आणि खाद्य यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्या सूचनांची आम्ही अंमलबजावणी करत आहोत.

- उत्तम सावंत,

उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प