शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची डरकाळी घुमणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:19 IST

वारणावती : डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा व तेथील वाघांचा अधिवास, खाद्य, वातावरण याचा अभ्यास ...

वारणावती : डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा व तेथील वाघांचा अधिवास, खाद्य, वातावरण याचा अभ्यास गेल्या चार वर्षांपासून केला जात आहे. हा अहवाल आता अंतिम टप्प्यात असून, अहवाल सादर झाल्यानंतर वाघांच्या पुनर्वसनाला हिरवा कंदील मिळेल, अशी अपेक्षा आहे.

देशातील अन्य व्याघ्र प्रकल्पांतील वाघांच्या संवर्धनासाठी दिल्ली येथे चार वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय चर्चासत्र झाले होते. भारतासह १४ देशांतील प्रतिनिधी या चर्चासत्रात सहभागी होते. सध्या काही प्रकल्प क्षेत्रात वाघांची संख्या अत्यल्प असून, काही ठिकाणी जास्त आहे. क्षमतेपेक्षा जास्त संख्या असणाऱ्या प्रकल्प क्षेत्रातील वाघ कमी संख्या असणाऱ्या प्रकल्प क्षेत्रात आणून सोडण्यासह वाघांची संख्या व तिच्या संवर्धनासाठी आवश्यक बाबी यावर या बैठकीत विचारविनिमय झाला होता. त्यानुसार वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.

त्या अनुषंगाने डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेकडून गेल्या तीन वर्षांपासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्राचा अभ्यास सुरू आहे. गेल्या दहा वर्षांत प्रकल्प क्षेत्रात वाघांचे अस्तित्वच (२०१८ चा अपवाद वगळता) आढळून आले नाही. त्यामुळे प्रकल्पातील वाघ गेले कुठे? असा सवाल उपस्थित होत होता. शासनाने व्याघ्र प्रकल्प घोषित केला; पण वाघाविनाच व्याघ्र प्रकल्प. अशी अवस्था झाली होती. पण आता भारतीय वन्यजीव संस्थेकडून अंतिम अहवाल सादर झाल्यानंतर वाघांच्या पुनर्वसनामुळे सह्याद्रीत वाघ बघायला मिळतील, अशी अपेक्षा आहे.

चौकट

सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या हद्दीत चांदोली, कोयना, दाजीपूर अभयारण्यातील ६९०.६३ चौरस किलोमीटर क्षेत्राचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साकारला आहे. वाघांचे प्रमुख खाद्य असणाऱ्या सांबराची या परिसरात संख्या कमी आहे. त्यामुळे सांबर तसेच चितळ सागरेश्वर व कात्रज या ठिकाणाहून आणून प्रकल्प क्षेत्रात सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी १४ हेक्टरचे संरक्षित क्षेत्र तयार करण्याचे काम सुरू आहे.

काेट

वाघांच्या पुनर्वसनासंदर्भात भारतीय वन्यजीव संस्थेकडून वाघांचा अधिवास आणि खाद्य यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्या सूचनांची आम्ही अंमलबजावणी करत आहोत.

- उत्तम सावंत,

उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प