शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटू आपटू मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
4
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
5
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
6
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
7
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
8
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
9
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
10
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
11
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
12
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
13
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
14
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
15
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
16
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
17
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
18
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
19
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
20
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

सांगलीतील शेरीनाल्याचे काय होणार?

By admin | Updated: April 20, 2015 00:11 IST

प्रकल्प रखडला : सांडपाणी पुन्हा कृष्णा नदीतच, महापालिकेचे दुर्लक्ष

सांगली : महापालिकेच्या शेरीनाल्याचे पाणी धुळगाव येथील शेतीला देणारी योजना अपयशी ठरली आहे. त्यामुळे शेरीनाल्याचे दूषित पाणी पुन्हा कृष्णा नदीत सोडण्याची वेळ येणार आहे. घनकचरा प्रकल्पात महापालिकेला मोठा दणका बसला होता. आता शेरीनाल्याचेही बालंट पालिकेवर येऊ शकते. त्यासाठी आतापासूनच नियोजनाची गरज आहे. शेरीनाला योजनेवर ४० कोटींपेक्षा अधिक खर्च झाला आहे. केंद्र व राज्य शासनासोबतच महापालिकेच्या वाट्याची रक्कम खर्च होऊनही योजना कार्यान्वित झाली नाही. विधानसभा निवडणुकीनंतर शेरीनाल्याचे पाणी धुळगाव हद्दीत पोहोचले. धुळगाव येथील १८०० एकर शेतीला पाणी मिळणार होते. त्यासाठी पालिकेने गावात शुद्धीकरण यंत्रणा उभारण्यासाठी शेतजमीन घेतल्या. त्यात सहा मोठे आॅक्सिडेशन पॉँड उभारले आहेत. पण त्यालाही भेगा पडल्या आहेत. शेरीनाल्याचे पाणी आॅक्सिडेशन पाँडमध्ये येताच ते इतर जमिनीत शिरले. त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आॅक्सिडेशन पाँडमध्ये पाणीच थांबत नाहीत. या प्रकारानंतर शेरीनाला योजना बंद ठेवण्यात आली आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी आणखी १४ कोटींची मागणी महापालिकेने पर्यावरण विभागाकडे केली आहे. हा प्रस्ताव सादर होऊन तीन वर्षे लोटली तरी अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. या निधीकडे डोळे लावून बसलेल्या पालिकेने अजून आशा सोडलेली नाही. या निधीतून धुळगाव येथे वितरण व्यवस्थेसह उर्वरित कामे होणार आहेत. पण आता योजनाच अडचणीत आल्याने निधी मिळणार का? हा खरा प्रश्न आहे. पंधरा वर्षे घनकचरा प्रश्नांत दुर्लक्ष केल्याचे परिणाम पालिकेला भोगावे लागत आहे. हरित न्यायालयाच्या दणक्यानंतर आता प्रशासन घनकचरा प्रकल्पाबाबत पळापळ करीत आहे. शेरीनाल्याचा प्रश्न तर त्यापेक्षाही भयानक आहे. नाल्यातील दूषित पाणी थेट नदीपात्रात मिसळते. दररोज ६० ते ७० एमएलडी पाणी नदीपात्रात जात आहे. महापालिकेचा पाणीपुरवठा शेरीनाल्याचा उत्तर बाजूने होत असल्याने नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत नाही, असा दावा पालिका करते. हा दावा खरा असला तरी नदीचे प्रदूषण होतेच, याकडे मात्र कानाडोळा केला जातो. (प्रतिनिधी)पुन्हा वाभाडे निघणार?घनकचरा प्रकल्पातून शहाणपण घेऊन शेरीनाला योजनेवरही गांभीर्याने निर्णय घ्यावा लागेल. अन्यथा भविष्यात कोणी न्यायालयात धाव घेतली तर पुन्हा पालिकेचे वाभाडे निघणार, यात शंका नाही. यामुळे यातून बोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.