शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

सांगलीतील शेरीनाल्याचे काय होणार?

By admin | Updated: April 20, 2015 00:11 IST

प्रकल्प रखडला : सांडपाणी पुन्हा कृष्णा नदीतच, महापालिकेचे दुर्लक्ष

सांगली : महापालिकेच्या शेरीनाल्याचे पाणी धुळगाव येथील शेतीला देणारी योजना अपयशी ठरली आहे. त्यामुळे शेरीनाल्याचे दूषित पाणी पुन्हा कृष्णा नदीत सोडण्याची वेळ येणार आहे. घनकचरा प्रकल्पात महापालिकेला मोठा दणका बसला होता. आता शेरीनाल्याचेही बालंट पालिकेवर येऊ शकते. त्यासाठी आतापासूनच नियोजनाची गरज आहे. शेरीनाला योजनेवर ४० कोटींपेक्षा अधिक खर्च झाला आहे. केंद्र व राज्य शासनासोबतच महापालिकेच्या वाट्याची रक्कम खर्च होऊनही योजना कार्यान्वित झाली नाही. विधानसभा निवडणुकीनंतर शेरीनाल्याचे पाणी धुळगाव हद्दीत पोहोचले. धुळगाव येथील १८०० एकर शेतीला पाणी मिळणार होते. त्यासाठी पालिकेने गावात शुद्धीकरण यंत्रणा उभारण्यासाठी शेतजमीन घेतल्या. त्यात सहा मोठे आॅक्सिडेशन पॉँड उभारले आहेत. पण त्यालाही भेगा पडल्या आहेत. शेरीनाल्याचे पाणी आॅक्सिडेशन पाँडमध्ये येताच ते इतर जमिनीत शिरले. त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आॅक्सिडेशन पाँडमध्ये पाणीच थांबत नाहीत. या प्रकारानंतर शेरीनाला योजना बंद ठेवण्यात आली आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी आणखी १४ कोटींची मागणी महापालिकेने पर्यावरण विभागाकडे केली आहे. हा प्रस्ताव सादर होऊन तीन वर्षे लोटली तरी अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. या निधीकडे डोळे लावून बसलेल्या पालिकेने अजून आशा सोडलेली नाही. या निधीतून धुळगाव येथे वितरण व्यवस्थेसह उर्वरित कामे होणार आहेत. पण आता योजनाच अडचणीत आल्याने निधी मिळणार का? हा खरा प्रश्न आहे. पंधरा वर्षे घनकचरा प्रश्नांत दुर्लक्ष केल्याचे परिणाम पालिकेला भोगावे लागत आहे. हरित न्यायालयाच्या दणक्यानंतर आता प्रशासन घनकचरा प्रकल्पाबाबत पळापळ करीत आहे. शेरीनाल्याचा प्रश्न तर त्यापेक्षाही भयानक आहे. नाल्यातील दूषित पाणी थेट नदीपात्रात मिसळते. दररोज ६० ते ७० एमएलडी पाणी नदीपात्रात जात आहे. महापालिकेचा पाणीपुरवठा शेरीनाल्याचा उत्तर बाजूने होत असल्याने नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत नाही, असा दावा पालिका करते. हा दावा खरा असला तरी नदीचे प्रदूषण होतेच, याकडे मात्र कानाडोळा केला जातो. (प्रतिनिधी)पुन्हा वाभाडे निघणार?घनकचरा प्रकल्पातून शहाणपण घेऊन शेरीनाला योजनेवरही गांभीर्याने निर्णय घ्यावा लागेल. अन्यथा भविष्यात कोणी न्यायालयात धाव घेतली तर पुन्हा पालिकेचे वाभाडे निघणार, यात शंका नाही. यामुळे यातून बोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.