शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

खंजीर खुपसणारा मित्र कसला ?

By admin | Updated: October 4, 2014 23:59 IST

नारायण राणे : राष्ट्रवादी म्हणजे जनमानसांत बदनाम झालेला पक्ष

सांगली : आमच्या पाठीत खंजीर खुपसून पुन्हा स्वाभाविक मैत्रीचा आव राष्ट्रवादी आणत आहे. त्यांची मैत्री स्वाभाविक नव्हे, तर स्वार्थी आहे. त्यांचा हा खेळ त्यांच्याच अंगाशी येणार आहे, असे मत काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी आज, शनिवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ते म्हणाले की, भाजप आणि राष्ट्रवादीची छुपी युती असेल तर ती केव्हातरी समोर येणारच आहे. अशा गोष्टी लपत नाहीत. ती त्यांची जुनी सवय आहे. नांदायचे एकाशी आणि मैत्री दुसऱ्याशी, असा प्रकार ते करीत असतात. त्यामुळेच जनसामान्यांत बदनाम होण्यात राज्यात राष्ट्रवादी पुढे आहे. हा वादावादीचा पक्ष असल्याने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना ४० पेक्षा अधिक जागा मिळूच शकणार नाहीत. वादग्रस्त फायलींवर स्वाक्षऱ्या केल्याबद्दल आता अजित पवार बोलत आहेत. प्रत्यक्ष निर्णय होत असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी तोंड का बंद केले होते? इतके दिवस गळ्यात गळे घालून ते काम करीत होते. आघाडी तुटल्याबरोबर अचानक त्यांना आमचा कारभार चुकीचा वाटू लागला आहे. त्यांचे हे द्वेषाचे राजकारण आहे. राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत आमची मुख्य लढत भाजपशी असेल. राष्ट्रवादीला ४० च्या पुढे जागा मिळणार नाहीत आणि शिवसेना साडेपंचवीस जागांची धनी असेल. राज्यातील वातावरण पाहता काँग्रेसलाच स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपचे खरे रूप आता लोकांसमोर आले आहे. त्यांच्या केंद्रातील कारभाराबाबत जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यांनी जी आश्वासने निवडणूक काळात दिली, त्याच्या दिशेने त्यांची कोणतीही वाटचाल झालेली नाही. त्याउलट कारभार सुरू आहे. राज्यातील विरोधी पक्षाने गेल्या पाच वर्षांत त्यांची भूमिका योग्यरीत्या बजावली नाही. शिवसेनाही त्यात सहभागी असल्याने जनता आता काँग्रेसच्याच मागे आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)