शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टी अन थकबाकी वसुलीत विश्वासार्हता हवी

By admin | Updated: January 18, 2016 23:34 IST

आकारणीबाबत शेतकरी संभ्रमात : टंचाईतून वीज बिल भरावे

दादा खोत -- सलगरे -टंचाई निधीतून अगर शासनाने वीज बिल भरून ही योजना चालणार नाही. शेतकऱ्यांनीच या योजनेकडे सकारात्मकदृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. वर्षभर पाणी सोडण्याची शाश्वती शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. पाटबंधारे विभागाकडून यशस्वी योजना चालविण्यासाठी या पाण्याचे निश्चित लाभार्थी कोण, याचा सर्व्हे होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या पाणी मागणी अर्जावर पाणीपट्टीचे अगर पाणी सोडण्याचे नियोजन न करता, संभावित पाणी उपयोजित लाभक्षेत्राचा सर्व्हे होऊन त्यावर पाणीपट्टी आकारणे आवश्यक आहे. शिवाय हेक्टरी संभावित पाणीपट्टी किती आहे, याबाबतही शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत.संभावित पाणीपट्टी आणि पाणी आवर्तनाचे वेळापत्रक जाहीर करणे, ते प्रत्येकलाभक्षेत्रापर्यंत पोहोचवणे याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून केल्यास शेतकऱ्यांना पाण्याची शाश्वती मिळेल आणि त्यानुसार पिकांचे नियोजनही त्यांना करता येईल. सिंचनासाठी शेतकऱ्यांना इतर पर्यायी मार्गासाठी पैसे खर्च करण्याची गरज राहणार नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार नाही. थकबाकी भरण्याची कुवत त्यांच्यामध्ये निर्माण होणार आहे.ग्लोबल होण्याची भाषा करणाऱ्या शासनाला अजूनही दुष्काळातील शेतीला योजना तयार असूनही पाण्याचे योग्य नियोजन करता आले नाही. पाटबंधारे विभागाच्या काटेकोर नियोजनासाठी शासनाने आणि लोकप्रतिनिधीनी लक्ष वेधले पाहिजे. ज्या मूळ हेतूसाठी योजना तयार झाली, त्याचा विसर राज्यकर्त्यांना पडता कामा नये. राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना दुष्काळाचे (निधीचे) लालूच दाखवून वर्षातून एखादा महिना आवर्तन देऊन, लोकांची दिशाभूल करणे थांबविणे गरजेचे आहे. योजना यशस्वी होण्यासाठी पाटबंधारे विभागाने पुढील बाबींचा विचार गांभीर्याने केला पाहिजे. (क्रमश:)वर्षभर पाण्याची पाटबंधारे विभागाकडून शाश्वती दिली गेली पाहिजे. शेतकऱ्यांमध्ये योजनेविषयी विश्वासार्हता अजूनही आली नाही. सात-बारावर बोजा चढविण्यासारख्या धमक्या प्रशासनाने थांबवून, पाणी नियोजन आणि पाणीपट्टी थकबाकी वसुलीबाबत शेतकऱ्यांमध्ये विश्वासार्हता वाढविणे गरजेचे आहे.- आबासाहेब साळुंखे,माजी सरपंच, कोगनोळी.लाभक्षेत्र निश्चित करावेयोजनेअंतर्गत येणाऱ्या निश्चित लाभक्षेत्राचा शोध घेणे.लाभक्षेत्र निश्चित केल्यानंतर संभावित पाणीपट्टी जाहीर करणेपाण्याच्या आवर्तनाचे वेळापत्रक जाहीर करणेपाणीपट्टीचे निश्चित देयक तयार करून ते लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करणे.