शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टी अन थकबाकी वसुलीत विश्वासार्हता हवी

By admin | Updated: January 18, 2016 23:34 IST

आकारणीबाबत शेतकरी संभ्रमात : टंचाईतून वीज बिल भरावे

दादा खोत -- सलगरे -टंचाई निधीतून अगर शासनाने वीज बिल भरून ही योजना चालणार नाही. शेतकऱ्यांनीच या योजनेकडे सकारात्मकदृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. वर्षभर पाणी सोडण्याची शाश्वती शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. पाटबंधारे विभागाकडून यशस्वी योजना चालविण्यासाठी या पाण्याचे निश्चित लाभार्थी कोण, याचा सर्व्हे होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या पाणी मागणी अर्जावर पाणीपट्टीचे अगर पाणी सोडण्याचे नियोजन न करता, संभावित पाणी उपयोजित लाभक्षेत्राचा सर्व्हे होऊन त्यावर पाणीपट्टी आकारणे आवश्यक आहे. शिवाय हेक्टरी संभावित पाणीपट्टी किती आहे, याबाबतही शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत.संभावित पाणीपट्टी आणि पाणी आवर्तनाचे वेळापत्रक जाहीर करणे, ते प्रत्येकलाभक्षेत्रापर्यंत पोहोचवणे याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून केल्यास शेतकऱ्यांना पाण्याची शाश्वती मिळेल आणि त्यानुसार पिकांचे नियोजनही त्यांना करता येईल. सिंचनासाठी शेतकऱ्यांना इतर पर्यायी मार्गासाठी पैसे खर्च करण्याची गरज राहणार नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार नाही. थकबाकी भरण्याची कुवत त्यांच्यामध्ये निर्माण होणार आहे.ग्लोबल होण्याची भाषा करणाऱ्या शासनाला अजूनही दुष्काळातील शेतीला योजना तयार असूनही पाण्याचे योग्य नियोजन करता आले नाही. पाटबंधारे विभागाच्या काटेकोर नियोजनासाठी शासनाने आणि लोकप्रतिनिधीनी लक्ष वेधले पाहिजे. ज्या मूळ हेतूसाठी योजना तयार झाली, त्याचा विसर राज्यकर्त्यांना पडता कामा नये. राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना दुष्काळाचे (निधीचे) लालूच दाखवून वर्षातून एखादा महिना आवर्तन देऊन, लोकांची दिशाभूल करणे थांबविणे गरजेचे आहे. योजना यशस्वी होण्यासाठी पाटबंधारे विभागाने पुढील बाबींचा विचार गांभीर्याने केला पाहिजे. (क्रमश:)वर्षभर पाण्याची पाटबंधारे विभागाकडून शाश्वती दिली गेली पाहिजे. शेतकऱ्यांमध्ये योजनेविषयी विश्वासार्हता अजूनही आली नाही. सात-बारावर बोजा चढविण्यासारख्या धमक्या प्रशासनाने थांबवून, पाणी नियोजन आणि पाणीपट्टी थकबाकी वसुलीबाबत शेतकऱ्यांमध्ये विश्वासार्हता वाढविणे गरजेचे आहे.- आबासाहेब साळुंखे,माजी सरपंच, कोगनोळी.लाभक्षेत्र निश्चित करावेयोजनेअंतर्गत येणाऱ्या निश्चित लाभक्षेत्राचा शोध घेणे.लाभक्षेत्र निश्चित केल्यानंतर संभावित पाणीपट्टी जाहीर करणेपाण्याच्या आवर्तनाचे वेळापत्रक जाहीर करणेपाणीपट्टीचे निश्चित देयक तयार करून ते लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करणे.