शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘टेंभू’चे पाणी आता बंद पाईपमधून

By admin | Updated: June 25, 2016 00:51 IST

भारत पाटणकर : राज्य शासनाकडून मंजुरी; आटपाडी-तासगाव तालुक्यातील गावांना लाभ

सांगली : पाण्याची वाढती टंचाई आणि त्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी जलसंपदा विभागाने टेंभू योजनेचे पाणी वाटप बंद पाईपद्वारे करण्यास मंजुरी दिली आहे. बंद पाईपद्वारे वितरण व्यवस्था असणारीही देशातील पहिली योजना असेल, अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. आटपाडी आणि तासगावसाठी समन्यायी पाणी वाटपालाही मंजुरी मिळाली आहे. यामुळे शंभर टक्के लाभक्षेत्राला पाणी मिळण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, पाण्याचे योग्य नियोजन होण्यासाठी बंद पाईपद्वारे टेंभू योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले पाहिजे, अशी आमची मागणी होती. या प्रश्नावर अनेक आंदोलनेही केली. त्यामुळे दि. २१ जूनरोजी मंत्रालयात जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव चहल, लाभक्षेत्र विकास विभागाचे सचिव उपासे, अधीक्षक अभियंता विजय घोगरे, कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक आणि डॉ. पाटणकर, पाणी संघर्ष चळवळीचे आनंदराव पाटील, अण्णासाहेब पत्की, विजयसिंह पाटील, मोहनराव यादव, संतोष गोटल आदींच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीमध्ये टेंभू उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचे वितरण शेतकऱ्यांना बंद पाईपद्वारे करण्यावर चर्चा झाली. अधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव पूर्वीच सादर केला होता. सविस्तर चर्चेनंतर प्रधान सचिव चहल यांनी टेंभू योजनेतून लाभक्षेत्रातील कऱ्हाड, कडेगाव, खानापूर, आटपाडी, तासगाव, सांगोला, कवठेमहांकाळ तालुक्यातील ८० हजार ४७२ हेक्टरला बंद पाईपद्वारे पाणी देण्यास मंजुरी देत असल्याचे घोषित केले. यासाठीचा निधी तातडीने देण्याचेही त्यांनी मान्य केले आहे. या निर्णयामुळे लाभक्षेत्र दीडपटीने वाढणार असून, योजनेचा खर्च मात्र कमी होणार आहे. यामुळे योजनेचे कामही गतीने पूर्ण होईल.ते म्हणाले की, बंद पाईपद्वारे पाणी वितरणाच्या ऐतिहासिक निर्णयाबरोबरच तासगाव आणि आटपाडी तालुक्यामध्ये समन्यायी पाणी वाटपाचा पथदर्शक प्रकल्प मंजूर झाला आहे. यामुळे तालुक्यातील शंभर टक्के लाभक्षेत्राला पाणी मिळण्यास मदत होणार आहे. प्रत्येक कुटुंबाला वार्षिक पाच हजार घनमीटर पाणी मिळणार आहे. यातून पाटाद्वारे तीन हेक्टर आणि ठिबक सिंचनद्वारे नऊ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. (प्रतिनिधी)