शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

‘टेंभू’चे पाणी आता बंद पाईपमधून

By admin | Updated: June 25, 2016 00:51 IST

भारत पाटणकर : राज्य शासनाकडून मंजुरी; आटपाडी-तासगाव तालुक्यातील गावांना लाभ

सांगली : पाण्याची वाढती टंचाई आणि त्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी जलसंपदा विभागाने टेंभू योजनेचे पाणी वाटप बंद पाईपद्वारे करण्यास मंजुरी दिली आहे. बंद पाईपद्वारे वितरण व्यवस्था असणारीही देशातील पहिली योजना असेल, अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. आटपाडी आणि तासगावसाठी समन्यायी पाणी वाटपालाही मंजुरी मिळाली आहे. यामुळे शंभर टक्के लाभक्षेत्राला पाणी मिळण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, पाण्याचे योग्य नियोजन होण्यासाठी बंद पाईपद्वारे टेंभू योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले पाहिजे, अशी आमची मागणी होती. या प्रश्नावर अनेक आंदोलनेही केली. त्यामुळे दि. २१ जूनरोजी मंत्रालयात जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव चहल, लाभक्षेत्र विकास विभागाचे सचिव उपासे, अधीक्षक अभियंता विजय घोगरे, कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक आणि डॉ. पाटणकर, पाणी संघर्ष चळवळीचे आनंदराव पाटील, अण्णासाहेब पत्की, विजयसिंह पाटील, मोहनराव यादव, संतोष गोटल आदींच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीमध्ये टेंभू उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचे वितरण शेतकऱ्यांना बंद पाईपद्वारे करण्यावर चर्चा झाली. अधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव पूर्वीच सादर केला होता. सविस्तर चर्चेनंतर प्रधान सचिव चहल यांनी टेंभू योजनेतून लाभक्षेत्रातील कऱ्हाड, कडेगाव, खानापूर, आटपाडी, तासगाव, सांगोला, कवठेमहांकाळ तालुक्यातील ८० हजार ४७२ हेक्टरला बंद पाईपद्वारे पाणी देण्यास मंजुरी देत असल्याचे घोषित केले. यासाठीचा निधी तातडीने देण्याचेही त्यांनी मान्य केले आहे. या निर्णयामुळे लाभक्षेत्र दीडपटीने वाढणार असून, योजनेचा खर्च मात्र कमी होणार आहे. यामुळे योजनेचे कामही गतीने पूर्ण होईल.ते म्हणाले की, बंद पाईपद्वारे पाणी वितरणाच्या ऐतिहासिक निर्णयाबरोबरच तासगाव आणि आटपाडी तालुक्यामध्ये समन्यायी पाणी वाटपाचा पथदर्शक प्रकल्प मंजूर झाला आहे. यामुळे तालुक्यातील शंभर टक्के लाभक्षेत्राला पाणी मिळण्यास मदत होणार आहे. प्रत्येक कुटुंबाला वार्षिक पाच हजार घनमीटर पाणी मिळणार आहे. यातून पाटाद्वारे तीन हेक्टर आणि ठिबक सिंचनद्वारे नऊ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. (प्रतिनिधी)