शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

बावीस टक्के अंध ‘दृष्टी’ दुर्लक्षामुळे-- अंधदिन विशेष

By admin | Updated: October 14, 2014 23:21 IST

डॉक्टरांचा इशारा : काळजी घेण्यास टाळाटाळ--जागतिक

नरेंद्र रानडे - सांगली जिल्ह्यातील एकूण अंधांपैकी सुमारे २२ टक्के जणांचे अंधत्व केवळ डोळ्यांची काळजी घेण्यास टाळाटाळ केल्याने आले असल्याची माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे व्यसनाच्या आहारी गेलेल्या युवा पिढीचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे.मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्रतज्ज्ञ डॉ. अभिजित ढवळे यांनी याबाबतचे सर्वेक्षण केले आहे. त्यातून महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. पाश्चात्यांच्या अंधानुकरणामुळे अनेकांचे जीवनमान बदलत चालले आहे. साहजिकच अनेकांच्या खाण्यात फास्ट फूडचा भरणा आहे. परंतु त्यामुळे शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्वे मिळतात का, याकडे मात्र अनेकजण सोयीस्कररित्या दुर्लक्षच करतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वाचा पुरवठा होणे आवश्यक असते. प्रामुख्याने हिरव्या पालेभाज्या, फळे, शेवगा, आवळा, मांसाहारींसाठी यकृत आदींमधून आवश्यक जीवनसत्त्वाचा पुरवठा होतो. याची कमतरता जाणवल्यास रातांधळेपणा येण्याचा धोका असतो. बऱ्याच कालावधीपासून मधुमेह असणाऱ्या व्यक्तीच्या रक्तवाहिन्या अधू होतात. रक्तवाहिन्यांतील दोषांमुळे नेत्रपटलांमध्ये बदल होऊन त्यामध्ये दोष उत्पन्न होतो व दृष्टी अधू होण्यास प्रारंभ होतो. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी नियमित व्यायाम करुन साखर नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. हा आजार नियंत्रणात ठेवण्यात अपयश आल्याने संबंधितांना दृष्टिविकारांचा धोका संभवतो. व्यसनांच्या वाढत्या प्रमाणामुळे स्त्रियांपेक्षा पुरुषांना अंधत्वाचा धोका अधिक असल्याचेही निदर्शनास आले आहे. व्यस्त जीवनशैलीतून थोडा वेळ डोळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. वेळ काढून वर्षातून किमान एक वेळ तरी डोळ्यांची तपासणी केल्यास, अंधत्वापासून लांब राहता येते. अंधांची नेमकी आकडेवारी उपलब्ध नसली तरीही, अंधत्वामध्ये वाढ होताना दिसत आहे. तसेच मोतिबिंदू, काचबिंदू आदींवर वेळीच उपचार न केल्याने काहींची वाटचाल अंधत्वाच्या दिशेने सुरू आहे.नात्यात विवाह धोकादायकविवाह करताना शक्यतो नात्यामध्ये करु नये. त्यामुळे अंधत्वाची पहिली पायरी असणारे दष्टिदोष होण्याची शक्यता ६० टक्के असते. ज्या व्यक्तींना प्रथमपासूनच दृष्टिदोष आहे, त्यांनी नात्यात लग्न केल्यास, त्यांना होणाऱ्या अपत्यासही दृष्टिदोष होण्याचा संभव असतो.डोळस व्यक्तींना अंधत्व कधी येऊ शकते? नेत्रपटल म्हणजे असंख्य पेशींचा पडदा असतो. याच्या माध्यमातून प्रकाश, रंग आदी संवेदना या पेशीमार्फत मेंदूकडे पोहोचविल्या जातात. अतिरक्तदाब, मधुमेह व व्यसनाधिनता यामुळे नेत्रपटल बिघडते आणि दृष्टी अधू होत जाते. यावर वेळीच उपचार केले नाहीत.जिल्ह्यात अंधांची एकमेव शाळाकित्येकजण जन्मत:च जग पाहण्यास पारखे होतात. अशा चिमुकल्यांसाठी मिरज येथे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लार्इंड या संस्थेची जिल्ह्यातील एकमेव अंधशाळा आहे. त्यामध्ये ६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तंबाखूजन्य पदार्थ आणि दारूचे नियमित सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टीवर विपरित परिणाम होऊ लागतो. हा परिणाम सावकाश होत असल्याने त्याचे गांभीर्य आपल्या लक्षात येत नाही. परंतु कालांतराने दृष्टी जाण्याचा संभव असतो. त्यामुळे युवकांनी व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे.- डॉ. अभिजित ढवळे, साहाय्यक प्राध्यापक, नेत्र विभाग