शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
5
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
6
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
7
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
8
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
9
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
10
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
11
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
12
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
13
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
14
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
15
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
16
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
17
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
18
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
19
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
20
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
Daily Top 2Weekly Top 5

आजची लोकशाही भांडवलदारांचीच

By admin | Updated: July 16, 2015 00:16 IST

भाई वैद्य : बदल घडविण्यासाठी क्रांतिवीर नागनाथअण्णांच्या विचारांची गरज

वाळवा : आजची लोकशाही ही गोरगरिबांची, कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची नसून, भांडवलदार अदानी व अंबानींची आहे. त्यात बदल करायचा असेल तर, डॉ. क्रांतिवीर नागनाथअण्णांच्या विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी केले. क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांची ९३ वी जयंती व ग्रंथ प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर जलबिरादरीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्रसिंह राणा, निमंत्रक वैभव नायकवडी, मोहनराव कदम, रामभाऊ लाड, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, कुसुमताई नायकवडी, अ‍ॅड. सुभाष पाटील, विशाखाताई खैरे, माजी आमदार संपतराव पाटील-पवार, विश्वासराव पाटील, प्रा. डॉ. बाबूराव गुरव, कारखान्याच्या उपाध्यक्षा वंदना माने, दूध संघाचे अध्यक्ष भगवान पाटील व ग्रंथलेखक जयवंत अहिर उपस्थित होते.भाई वैद्य म्हणाले की, वाळव्याच्या प्रत्येक कणात क्रांती ठासून भरली आहे. स्वातंत्र्य मिळविणे सोपे होते, परंतु तेच स्वातंत्र्य गरिबांच्या झोपडीपर्यंत नेणे कठीण बनले आहे. स्वातंत्र्याची किरणे झोपडीतील प्रत्येकाला मिळाली पाहिजेत, ही प्रेरणा नागनाथअण्णांची होती. आज शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन भांडवलदारांच्या घशात घालायचा एक उद्योग बनला आहे. आज देशात आतापर्यंत सव्वातीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दुसऱ्या देशातील नुसत्या ३२५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असत्या, तर तेथील जनतेने त्या शासनाला डच्चू दिला असता. अण्णांनी हुतात्मा साखर कारखाना हा आपला किंवा आपल्या कुटुंबाचा म्हणून उभारला नसून, तो शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांसाठी उभारला. व्यक्ती आणि समाजाचा विकास शिक्षणाने होतो, यासाठी त्यांनी दऱ्या खोऱ्यातून शाळा काढल्या. जलबिरादरीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्रसिंह राणा म्हणाले, देशातील दोनतृतीयांश छोट्या नद्या आज मृत झाल्या आहेत. त्या शेती फुलविण्यासाठी जिवंत केल्या पाहिजेत. पाणी प्रदूषण थांबविले पाहिजे. पाणी प्रदूषित करणाऱ्यांना तुरुंगात डांबले पाहिजे. त्यासाठी आता या क्रांतिकारी भागातील, अण्णांच्या भागातील लोकांनी शेतकऱ्यांची जमीन वाचविण्यासाठी व ती फुलविण्यास पाणी मिळविण्यासाठी शिवाय रोगराई नष्ट करण्यासाठी तीव्र लढा दिला पाहिजे. त्याचे नेतृत्व वैभव नायकवडी यांनी करावे, असे ते म्हणाले.प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या घामावर देश चालला आहे. तोच शेतकरी आज आत्महत्या करतो आहे. हेच काय ते अच्छे दिन आहेत. पाण्याचे खासगीकरण करण्याचे पाप ब्रिटिशांनीसुद्धा केले नव्हते. ते प्रयत्न सरकारने केलेले आहेत. यावेळी कुसुमताई नायकवडी यांनी अण्णांचा जीवनपट मांडला. वैभव नायकवडी व हुतात्मा कारखान्याच्या उपाध्यक्षा वंदना माने यांनी मान्यवरांचा सत्कार केला. क्रांतिगीते सादर करण्यात आली. सकाळी ६.३० वाजता क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांच्या समाधीस्थळी मान्यवरांनी अभिवादन केले. हुतात्मा बँकेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. बँकेच्या एटीएम सेवेचा प्रारंभ करण्यात आला. गावातून अण्णांच्या प्रतिमेची विद्यार्थ्यांनी घोषणा देत फेरी काढली. दुपारच्या सभेत ‘नागनाथअण्णांचे स्वातंत्र्यानंतरचे कार्य’ या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. राजा माळगी व प्रा. आर. एम. मुल्ला यांनी केले. प्रा. बाळासाहेब नायकवडी यांनी आभार मानले. सभेला सरपंच गौरव नायकवडी, उपसरपंच अपर्णा साळुंखे, प्राचार्य विश्वास सायनाकर, प्राचार्या सुषमा नायकवडी, सावकर कदम, नरेंद्र कापडणीस, संजय खोत, अशोक माने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)योजनेचे पाणी मिळेल, असे वाटत नाही!राजेंद्रसिंह राणा म्हणाले की, टेंभू योजनेचे पाणी सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील १३ दुष्काळग्रस्त तालुक्यांना मिळाले पाहिजे, हे क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी सतत २२ वर्षे संघर्ष केला. परंतु सध्याची एकूण परिस्थिती पाहिली तर, हे पाणी मिळेल असे अजूनही वाटत नाही. त्यामुळे नागनाथअण्णांसारखी भूमिका घेणे आवश्यक आहे.