शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

हजारो हातांनी उचलला स्वच्छतेचा विडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील पूर ओसरल्यानंतर महापालिकेने स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य दिले आहे. हजार ते दीड हजार कर्मचारी, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरातील पूर ओसरल्यानंतर महापालिकेने स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य दिले आहे. हजार ते दीड हजार कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांनी स्वच्छतेचा विडा उचलला आहे. शहरातील रस्ते, चौकांची स्वच्छता करून बुधवारी औषध फवारणी करण्यात आली. नागरिकांनी घरातील स्वच्छता मोहीमही हाती घेतली आहे.

सांगलीतील पुराने आता दम टाकला आहे. पूर ओसरलेल्या परिसराच्या स्वच्छतेबाबत आयुक्त नितीन कापडणीस यांनी नियोजन केले होते. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह अन्य महापालिका, स्वयंसेवी संस्थाही स्वच्छतेसाठी पुढे सरसावल्या होत्या. महापालिकेचे ८०० कर्मचारी, मुंबई व पिंपरी चिंचवड महापालिकेचे १८० कर्मचारी स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरले होते.

सांगली बसस्थानक, झुलेलाल चौक, पत्रकार नगर परिसराची स्वच्छता करून औषध फवारणी करण्यात आली. स्टेशन चौक, रतनशी नगर, शंभरफुटी रस्ता, बसस्थानक रस्ता. कोल्हापूर रोड, गणेश नगर काही गल्ल्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. ज्या भागात पाणी ओसरले आहे, तिथे स्वच्छता व औषध फवारणीला प्राधान्य देण्यात आले. टिंबर एरिया, गोकुळ नगर परिसराचीही स्वच्छता करण्यात आली. महापालिकेचे अग्निशमन दलही स्वच्छतेसाठी मदतीला धावले आहे. अग्निशमन दलाचे प्रमुख चिंतामणी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली रस्ते, चौकांची स्वच्छता केली जात आहे. अग्निशमन दलाच्या वाहनातून रस्त्यावर पाणी मारुन चिखल बाजूला केला जात आहे. दिवसभरात १५ वाहनांनी तब्बल १०० खेपा केल्या.

चौकट

बाजारपेठेतील रस्ते चकाचक

शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गणपती पेठ, कापडपेठ, मेन रोड, हरभट रोड या परिसरातील रस्ते एका दिवसात चकाचक करण्यात आले. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळपासूनच बाजारपेठेत स्वच्छता मोहीम राबविली. आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहूल रोकडे, वैद्यकीय आरोग्याधिकारी डाॅ. रवींद्र ताटे यांनी स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली.

चौकट

चार पालिका धावल्या

पूर ओसरल्यानंतर शहर स्वच्छतेसाठी राज्यातील चार पालिका धावून आल्या आहेत. मुंबई महापालिकेने ८३ सफाई कर्मचाऱ्यांसह दोन वाहनांचा ताफा दाखल झाला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून १०० कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सातारा नगरपालिकेने दोन जेसीबी यंत्रे पाठविली आहेत. तर पुणे महापालिकेकडून जेटींग मशीन, सक्शन मशीनसह पाच अत्याधुनिक वाहने आली आहेत.

कोट

पूर ओसरल्यानंतर महापालिकेने स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी इतर महापालिकांची मदत होत आहे. येत्या तीन ते चार दिवसांत पूर्ण शहर स्वच्छ होईल. त्यादृष्टीने नियोजन केले आहे. - डाॅ. रवींद्र ताटे, वैद्यकीय अधिकारी, महापालिका.