शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

संगणक वाहन परवान्यामुळे हजारो अनुत्तीर्ण

By admin | Updated: May 7, 2015 00:33 IST

जिल्ह्यातील स्थिती : वाहतूक नियमांचे अज्ञान; वर्षभरात ७३४१ परीक्षार्थी उत्तीर्ण

सांगली : वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) घेण्यासाठी संगणकावर परीक्षा देण्याची सक्ती करण्यात आली असली, तरी त्यास कमी प्रतिसाद असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षभरात संगणकावर परीक्षा देऊन केवळ ७३४१ उमेदवार वाहन चालविण्यास पात्र ठरले आहेत. वाहतूक नियमांविषयी अजूनही वाहनधारकांत अज्ञानपणा असल्याचे दिसून येते. यामुळेच अनुत्तीर्णांच्या प्रमाणात घट झालेली नाही. सध्या हे प्रमाण २७ टक्के असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी सांगितले.पूर्वी मोटार वाहन निरीक्षकांकडून वाहतूक नियमांविषयी प्रश्न विचारले जायचे. ही तोंडी परीक्षा व्हायची. प्रत्येक वाहनधारक यात उत्तीर्ण व्हायचा. पुढे पक्के लायसन्स काढताना वाहनाची फेरी मारली की, लायसन्स काढण्याची प्रक्रिया पूर्ण व्हायची. यामध्ये यंत्रणेतील अनेक त्रुटी समोर आल्याने गेल्या दोन वर्षापासून लायसन्स काढण्याची जुनी पद्धत बंद करण्यात आली. कच्चे लायसन्स काढण्यासाठी प्रथम आॅनलाईन बुकिंग करण्याचा नियम करण्यात आला. तारीख मिळेल त्यादिवशी वाहनधारकाने जायचे. संगणकावर १५ गुणांची परीक्षा ठेवण्यात आली आहे. वाहतूक नियमांविषयी १५ प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला तीन पर्यायी उत्तरे दिलेली असतात. जे उत्तर बरोबर आहे, त्यावर केवळ अधोरेखित करायचे आहे. परीक्षा झाली की वाहनधारकास खुर्चीवरून उठण्यापूर्वीच तो उत्तीर्ण झाला आहे की अनुत्तीर्ण, हे समजते. ही अत्यंत व सोपी प्रक्रिया आहे.परीक्षेला एकावेळी १५ वाहनधारकांना बसण्याची सोय केली आहे. दररोज ५० ते ६० उमेदवार परीक्षेला येतात. यातील १३ ते १४ टक्के उमेदवार उत्तीर्ण होतात. कधी-कधी उत्तीर्णची ही टक्केवारी चार ते पाच टक्क्यावर येते. अनेकदा जेवढे उमेदवार दिवसभरात परीक्षेला बसले होते, ते सर्व अनुत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षभरात ९९९७ वाहनधारक परीक्षेला बसले होते. यातील ७३४१ उत्तीर्ण, तर २६५६ अनुत्तीर्ण झाले आहेत. वाहतूक नियम काय असतात, हे अनेकांना माहीतच नसल्याचे परीक्षेवेळी दिसून आले आहे. यामुळे अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे. (प्रतिनिधी)वाहने लाखावर... लायसन्स हजारोमहिन्याला तसेच सणासुदीला लाखो वाहने रस्त्यावर येतात. या वाहनांची नोंदणीही होते. मात्र वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) काढण्यासाठी हे वाहनधारक का पुढे येत नाहीत. वर्षभरात ९९९७ जणांनी लायसन्ससाठी परीक्षा दिली; पण या तुलेनत लाखो वाहने रस्त्यावर आली आहे. वाहन विक्रीच्या तुलनेत लायसन्स काढण्याची लोकांमध्ये अजूनही मानकिसता दिसत नाही. पोलीस ज्यादिवशी नाकाबंदी करतात, त्यावेळी शंभरहून अधिक वाहनचालक लायसन्स नसणारे सापडतात.