शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल तीस टीएमसी पाणी दुष्काळी भागात वळविणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:26 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क आटपाडी : कृष्णा आणि कोयना नदीच्या महापुराला अटकाव करण्यासाठी कृष्णा-माणगंगा जाेड प्रकल्प प्रभावी उपाय ठरू शकतो. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

आटपाडी

: कृष्णा आणि कोयना नदीच्या महापुराला अटकाव करण्यासाठी कृष्णा-माणगंगा जाेड प्रकल्प प्रभावी उपाय ठरू शकतो. या प्रकल्पाद्वारे ३० टीएमसी पाणी दुष्काळी भागात वळविणे शक्य आहे. राजेवाडीचा तलाव साठवण तलाव म्हणून उपयोगात आणला, तर केवळ एक पंपगृह उभारून संपूर्ण आटपाडी तालुका ओलिताखाली आणणे शक्य हाेणार आहे. शिवाय, माणगंगा नदीचे पुनरुज्जीवन हाेेऊन सुमारे १६० किलोमीटर नदीकाठचा प्रदेश कायमचा सुजलाम् सुफलाम् होईल.

राजेवाडी तलावाची पाणी साठवण क्षमता १ टीएमसी आहे. पण, हा तलाव वर्षानुवर्षे कोरडाच असतो. जरी पाणी आले तरी या तलावाचे संपूर्ण पाणी कालव्याद्वारे सोलापूर जिल्ह्यास दिले जाते. आटपाडी तालुक्याला या तलावाचा कसलाच फायदा होत नाही. हे पाणी पुढे नदीतही वाहत नसल्याने गेली कित्येक वर्षे माणगंगा नदी मृतावस्थेत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलनही बिघडले आहे. इंग्रजांनी इथल्या पर्यावरणाचा अजिबात विचार केला नाही. मात्र, त्यानंतर आजच्या राज्यकर्त्यांनी माणगंगा नदी जिवंत व्हावी यासाठी कसलेही प्रयत्न केलेले दिसून येत नाहीत. केवळ पावसाळ्यात या नदीतून दर वर्षी पाणी वाहिले तशी नदी जिवंत होईल आणि या दुष्काळी भागातील कष्टाळू माणसे या संधीचे सोने करतील.

तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर अवघ्या चार वर्षांत त्यांनी सिंचनाचे सगळे प्रकल्प पूर्ण केले. मात्र, स्वातंत्र्यप्राप्तीपासून कोरडी राहिलेली माणगंगा आजही कोरडीच आहे. ही नदी प्रवाहित करणे म्हणजेच इथले जनजीवन सुरळीत करणे आहे. त्यासाठी नैसर्गिक प्रवाहाने कृष्णा नदीचे पाणी माणगंगा नदीत सोडणे हा एकमेव पर्याय आहे. यासाठी सकारात्मक प्रयत्नांची गरज आहे.

चौकट

राजकारण्यांकडून कायम उपेक्षा !

आटपाडी तालुका राजकीयदृष्ट्या कायम उपेक्षित राहिला आहे. आजही जगण्यासाठी तालुक्याबाहेर पडणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. देशभर जगण्यासाठी इथली माणसे गेली. याची लाज किंवा खंत कोणत्याच राज्यकर्त्यांना वाटत नाही. सत्तेतील राजकारणी केवळ राजकीयदृष्ट्या ज्या योजनांचा फायदा होईल तेवढ्याच योजनांसाठी प्रयत्न करताना दिसतात. परंतु पूर नियंत्रण म्हणून आणि पूर नियोजनाचा एक भाग म्हणून ही योजना करणे गरजेचे आहे.

कोट

ही योजना तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे केवळ एका वर्षात ही योजना पूर्ण होऊन त्याचा लाभ कृष्णाकाठ आणि दुष्काळग्रस्तांना होईल.

- दिनकर पवार

निवृत्त अभियंता पाटबंधारे विभाग