शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात साखरेचा ७ हजार कोटींचा घोटाळा

By admin | Updated: November 1, 2015 23:53 IST

सदाभाऊ खोत : कारखानदार आणि व्यापाऱ्यांनी केले संगनमत, शासनाने चौकशी करावी

सांगली : कमी दराने साखरेची खरेदी करून बाजारात त्याची चढ्या दराने विक्री करून राज्यात ७ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. साखर कारखानदार आणि दलाल असलेल्या व्यापाऱ्यांनी संगनमताने हा घोटाळा केल्याने त्यांची चौकशी शासनाने करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, राज्यात साखरेच्या माध्यमातून सट्टा खेळला जात आहे. प्रति टन १९00 रुपयांनी साखरेची खरेदी करून बाजारात ती २५00 ते २६00 रुपयांनी विकली गेली. परराज्यात रेशनिंगच्या साखरेच्या निविदा ३२00 रुपयांनी भरण्यात आल्या. कमी दराने साखर खरेदी करून त्याची साठवणूक करून बाजारात चढ्या दराने त्याची विक्री करण्यात येत आहे. ज्यांनी साखरेची कमी दरात खरेदी करून नफेखोरीसाठी त्याचा वापर केला, अशा सर्व व्यापाऱ्यांची चौकशी करावी. डाळींचे भाव वाढल्यानंतर शासनाने ज्यापद्धतीने कारवाईची मोहीम हाती घेतली, तशीच मोहीम साखरेसाठी राबवावी. जे व्यापारी यामध्ये सापडतील, त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. कारखानदारही या साखळीत सामील आहेत. त्यांचीही चौकशी केली जावी. एकरकमी एफआरपी देणे कायद्यानेच बंधनकारक आहे. त्यामुळे ती प्रथम द्यावी आणि साखरेचे दर वाढले, तर रंगराजन समितीच्या शिफारशींप्रमाणे साखर व उपपदार्थ विक्रीतील रकमेचा ७0 टक्के हिस्सा शेतकऱ्यांना मिळायला हवा. हा कायदा किंवा त्यातील तरतुदी यांचा विचार न करता, अनेक नेते टीका करीत सुटले आहेत. त्यांना या कायद्याच्या प्रशिक्षणाची गरज आहे. राष्ट्रवादीचे जे नेते आमच्यावर टीका करीत आहेत, त्यांच्याच पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी रिकव्हरीचा बेस साडेआठ टक्क्यांवरून नऊ ते साडेनऊ टक्के केला. बारामतीच्या विकासाचे गोडवे सध्या गायिले जात असले तरी, राज्यातून आणि केंद्रातून दरोडा टाकून लुटलेला पैसा बारामतीच्या विकासाकरिता वापरण्यात आला आहे, अशी टीका केली. (प्रतिनिधी)  

जयंतरावांनी लोणी खाल्ले... राजू शेट्टी यांनी ३ हजार प्रतिटन दर मागून २७०० रुपयांवर तडजोड केल्याचा आरोप जयंत पाटील करीत आहेत. त्यांनी केंद्राच्या पॅकेजमधून प्रत्येकी १४७ रुपये काढून घेतले, त्याचे काय? मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचाच हा प्रकार आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. ४राज्य सहकारी बँकेने साखर पोत्याचे चालू तिमाही मूल्यांकन २0५0 रुपये केले आहे. हे मूल्यांकन चुकीचे आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे चुकीचे आहे. सध्याचा बाजारभाव विचारात घेऊन मूल्यांकन करावे, अशी मागणी खोत यांनी केली.  

आंदोलनाची दिशा ठरणार येत्या ६ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे होणाऱ्या ऊस परिषदेत एफआरपीप्रश्नी आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे. साखरेच्या प्रश्नावर शेतकऱ्यांना आपली मते मांडण्याचे हे एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मत खोत यांनी व्यक्त केले.