शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
3
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
4
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
5
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
6
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
7
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
8
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
9
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
10
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
11
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
12
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
13
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
14
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
15
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
16
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
17
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
18
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
20
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा

बेभरवशाच्या अनुदानावर खर्चाची सर्कस

By admin | Updated: August 9, 2015 00:47 IST

महापालिकेची स्थिती : शासनाकडून अनुदान वाटपाच्या नियोजनाची आवश्यकता; घरपट्टी, पाणीपट्टीला मर्यादा

सांगली : महापालिकेच्या डोक्यावर सध्या आर्थिक संकटाचे ढग दाटले आहेत. साडेसात कोटीचे अनुदान देणाऱ्या राज्य शासनाने पुढील निधीची कोणतीही तजवीज किंवा नियोजन न केल्याने आर्थिक संकट वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेला एलबीटीच्या अभय योजनेपोटी ७ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. अद्याप हा निधी प्राप्त झालेला नाही. हा निधी प्राप्त होण्यासाठी अजून किमान दहा दिवस लागतील, अशी चिन्हे दिसत आहेत. त्यानंतरच्या अनुदानाचा प्रश्न अनुत्तरीतच आहे. कारण आता एलबीटीसुद्धा बंद झाल्याने शासकीय अनुदानावरच महापालिकेला अवलंबून राहावे लागणार आहे. शासनाच्या अनुदानाचे ठोस नियोजन अद्याप झालेले नाही. अनुदान महिन्याला मिळणार की कधी?, या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही. प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला अनुदान प्राप्त होणे आवश्यक असल्याचे महापालिकेतील काही जाणकार नगरसेवकांचे मत आहे. कारण वेळेत अनुदान आले नाही, तर वेळेत प्रत्येक गोष्टीची बिले व खर्च भागविणे शक्य होणार नाही. त्यामुळे महापालिकेच्या व पर्यायाने नागरिकांच्या अडचणी वाढू शकतात. अनुदानभरोसे बसलेल्या महापालिकेला आता भविष्याची चिंता सतावू लागली आहे. महापालिकेच्या स्थापनेनंतर प्रोत्साहन अनुदानावेळीही अशीच स्थिती झाली होती. थकित ११ कोटी रुपयांसाठी महापालिकेला वारंवार शासनाचे उंबरठे झिजवावे लागले होते. आता पुन्हा अनुदानासाठी अशीच कसरत महाालिकेला करावी लागते की काय?, अशी शंका उपस्थित होत आहे. महापालिकेच्या आस्थापनाचा खर्च अधिक आहे. महिन्याकाठी किमान १0 कोटी रुपये यासाठी खर्च होतात. यामध्ये वीज, पाणी, दूरध्वनी बिले, पेन्शन, पगार, मानधन अशा सर्व गोष्टींचा समावेश आहे. निव्वळ आस्थापना खर्च करतानाच महापालिकेची कसरत होत आहे. मग प्रत्यक्ष विकास कामांची काय परिस्थिती होणार, याची चिंता आता सतावत आहे. महापालिकेच्या विकास कामांची अवस्था यापुढे आणखी बिकट होण्याची चिन्हे आहेत. प्रतिमाह १0 कोटी १८ लाख रुपयांचा खर्च अनिवार्य असताना, महापालिकेच्या तिजोरीत ६ ते ७ कोटी रुपये जमा होत आहेत. म्हणजे प्रत्येक महिन्याला महापालिकेस सुमारे ४ कोटीची तूट दिसून येत आहे. त्यामुळेच पैशाची ही सर्कस नंतर खूप अवघड वळणावर जाण्याची शक्यता आहे. बेभरवशाच्या अनुदानावर पालिकेच्या खर्चाचे गणित घालावे लागणार आहे. हे गणित नंतर महापालिकेला मोठ्या आर्थिक संकटात टाकणार, हे निश्चित. विकासकामेही ठप्प होऊ शकतात. त्यामुळे महापालिकेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांबरोबरच नगरसेवकांचीही चिंता वाढली आहे. (प्रतिनिधी) एलबीटीच्या उत्पन्नाचा फुगा फुटणार एलबीटीच्या माध्यमातून आणखी १२५ कोटी रुपये मिळतील, अशी आशा बाळगणाऱ्या महापालिकेच्या पदरात दहा कोटींवर रक्कम पडेल, असे वाटत नाही. सध्याच्या वसुलीचे आकडे पाहिले, तर १५ आॅगस्टपूर्वी आठ ते दहा कोटी रुपयेच जमा होतील, अशी चिन्हे दिसत आहेत. जमा-खर्चाचा महापालिकेचा तराजू खर्चाच्या बाजूूला अधिक झुकलेला असेल. कोलमडणारे अंदाजपत्रक सावरायचे असेल तर, किमान ५० ते ६० कोटी रुपयांचे उत्पन्न नव्या स्रोतांमधून मिळवावे लागेल. उपलब्ध स्रोतांवर भरवसा ठेवून चालणार नाही. बजेटचा प्रवास धोकादायक वळणावर पोहोचला आहे. चालू बजेटच्या कालावधीतील चार महिने निघून गेले आहेत. उर्वरित आठ महिन्यांच्या कालावधित उत्पन्नाच्या बाजूस मोठा कायापालट होईल, याची कोणतीही शक्यता दिसत नाही.