शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

निवांत झोपायचे आणि दिवसभर मनसोक्त खेळायचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शिक्षणाच्या इतिहासात सुमारे दीड वर्षाची प्रदीर्घ सुटी पहिल्यांदाच मिळाली आहे. याचा पुरेपूर फायदा घराघरातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शिक्षणाच्या इतिहासात सुमारे दीड वर्षाची प्रदीर्घ सुटी पहिल्यांदाच मिळाली आहे. याचा पुरेपूर फायदा घराघरातील चिमुकली उठवत आहेत. शाळेच्या कटकटीपासून शंभर टक्के मुक्तता मिळाल्याने आळसावली आहेत. अभ्यासाचा तर अजिबात विसर पडला आहे.

ज्यांच्या मुलांनी शाळेचा उंबरठा नुकताच ओलांडला आहे, त्या पालकांसाठी ही मोठी चिंतेची बाब ठरली आहे. शिक्षणाचा श्रीगणेशा गिरवण्यापूर्वीच मुले उन्हाळी, पावसाळी आणि सणासुदीच्या सुट्ट्या एन्जॉय करीत आहेत. तब्बल ५०० दिवस घरात राहिलेल्या मुलांना अभ्यास पुन्हा आठवणार काय ही बाब डोकेदुखीची ठरली आहे. एरवी मुले दिवसभर शाळेत अभ्यासाच्या संपर्कात राहिल्याने संध्याकाळी खेळायला मुक्तता असायची. आता मात्र सकाळपासूनच मुक्त अवस्थेत असतात. पाचवीपासूनचा अभ्यास मोबाईलवर होतो, पण पहिली ते चौथीच्या चिमुरड्यांना मात्र कोणतीच बंधने नाहीत. त्यांचा सुट्टीचा मूड संपणार तरी कधी याची चिंता पालकांना लागून राहिली आहे.

बॉक्स

आई-बाबांनीच व्हावे आता गुरुजी

- या प्रदीर्घ सुट्टीच्या काळात आता आई-बाबांनीच गुरुजी व्हावे असा शहाणपणाचा व व्यवहारी सल्ला शिक्षणतज्ज्ञांनी दिला आहे.

- मुलांचे अभ्यासाचे वळण मोडू नये यासाठी दिवसभरात किमान तीन-चार तास मुलाच्या अभ्यासासाठी देण्याची गरज आहे.

- मुलाच्या क्षमतेनुसार अंकगणिते, सामान्यज्ञान, मराठी भाषा, चित्रकला आदी विषयांत त्यांना गुंतवून ठेवता येईल. अगदी मोबाईलवरही मनोरंजनातून शिक्षणाचा प्रवाह कायम ठेवता येईल.

बॉक्स

शाळा बंद आहे, तर अभ्यास कशासाठी?

- शाळा बंद असल्याने मुले स्वैर बनली आहेत. शाळा बंद आहे, तर अभ्यास कशासाठी हा त्यांचा प्रश्न पालकांना निरुत्तर करीत आहे.

- सकाळी उशिरापर्यंत झोपायचे, निवांत आवराआवर करायची आणि टिव्हीसमोर ठाण मांडायचे हे त्यांचे दैनंदिन वेळापत्रक आहे.

- कामावर जाणाऱ्या पालकांची मुले तर आणखी निवांत आहेत. मोबाईल आणि टिव्ही हेच त्यांचे वर्गमित्र ठरले आहेत.

- काही सजग पालकांनी मुलांचा अभ्यासाशी संपर्क कायम ठेवला आहे. त्यांचे किमान प्राथमिक शिक्षण सुरू राहील याची दक्षता घेतली आहे.

- मोठ्या भाऊ-बहिणीच्या ऑनलाईन शिक्षणातूही काही मुले शिक्षणाचे थोडेफार धडे घेत आहेत.

बॉक्स

पहिलीची ओळखच नाही, अन थेट दुसरीच्या वर्गात

- लॉकडाऊनमुळे वर्षभर शाळा बंद राहिली. मुलांना परीक्षा न घेताच थेट वरच्या वर्गात वर्गोन्नत करण्यात आले.

- गेल्या मार्चमध्ये पहिलीत प्रवेश घेतलेली मुले यामुळे प्रत्यक्ष शाळेत जाऊ शकली नाहीत, यंदा त्यांना थेट दुसरीत प्रवेश मिळाला आहे.

- पहिली-दुसरीत अक्षरओळख होते, पण शाळा बंद असल्याने अबकड आणि एबीसीडी मुलांच्या डोक्यात शिरलेली नाही.

कोट

शाळा सुरू असताना सकाळी-संध्याकाळी तास-दोन तास मुलांचा अभ्यास घेत होते. पण गेले दीड वर्ष मुले घरीच आहेत. त्यांचे दैनंदिन वेळापत्रक विस्कटले आहे. दिवसभर खेळण्याने अभ्यासाकडे लक्ष नसते.

- कविता मगदूम, मिरज

शासनाने कोरोनाची तीव्रता कमी असलेल्या गावांत वर्ग सुरू करावेत. रविवार वगळता अन्य सर्व सुट्ट्या रद्द कराव्यात. सुट्टीचे दीड वर्ष भरून काढावे. मुलांचे शैक्षणिक नुकसान न भरून येणारे आहे.

- अशोक रणदिवे, माधवनगर.

पॉईंटर्स

वर्गनिहाय विद्यार्थी

पहिली ३९,५२६, दुसरी ४२,६२७, तिसरी ४३,६५८, चौथी ४३,६१५

-