शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

निवांत झोपायचे आणि दिवसभर मनसोक्त खेळायचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शिक्षणाच्या इतिहासात सुमारे दीड वर्षाची प्रदीर्घ सुटी पहिल्यांदाच मिळाली आहे. याचा पुरेपूर फायदा घराघरातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शिक्षणाच्या इतिहासात सुमारे दीड वर्षाची प्रदीर्घ सुटी पहिल्यांदाच मिळाली आहे. याचा पुरेपूर फायदा घराघरातील चिमुकली उठवत आहेत. शाळेच्या कटकटीपासून शंभर टक्के मुक्तता मिळाल्याने आळसावली आहेत. अभ्यासाचा तर अजिबात विसर पडला आहे.

ज्यांच्या मुलांनी शाळेचा उंबरठा नुकताच ओलांडला आहे, त्या पालकांसाठी ही मोठी चिंतेची बाब ठरली आहे. शिक्षणाचा श्रीगणेशा गिरवण्यापूर्वीच मुले उन्हाळी, पावसाळी आणि सणासुदीच्या सुट्ट्या एन्जॉय करीत आहेत. तब्बल ५०० दिवस घरात राहिलेल्या मुलांना अभ्यास पुन्हा आठवणार काय ही बाब डोकेदुखीची ठरली आहे. एरवी मुले दिवसभर शाळेत अभ्यासाच्या संपर्कात राहिल्याने संध्याकाळी खेळायला मुक्तता असायची. आता मात्र सकाळपासूनच मुक्त अवस्थेत असतात. पाचवीपासूनचा अभ्यास मोबाईलवर होतो, पण पहिली ते चौथीच्या चिमुरड्यांना मात्र कोणतीच बंधने नाहीत. त्यांचा सुट्टीचा मूड संपणार तरी कधी याची चिंता पालकांना लागून राहिली आहे.

बॉक्स

आई-बाबांनीच व्हावे आता गुरुजी

- या प्रदीर्घ सुट्टीच्या काळात आता आई-बाबांनीच गुरुजी व्हावे असा शहाणपणाचा व व्यवहारी सल्ला शिक्षणतज्ज्ञांनी दिला आहे.

- मुलांचे अभ्यासाचे वळण मोडू नये यासाठी दिवसभरात किमान तीन-चार तास मुलाच्या अभ्यासासाठी देण्याची गरज आहे.

- मुलाच्या क्षमतेनुसार अंकगणिते, सामान्यज्ञान, मराठी भाषा, चित्रकला आदी विषयांत त्यांना गुंतवून ठेवता येईल. अगदी मोबाईलवरही मनोरंजनातून शिक्षणाचा प्रवाह कायम ठेवता येईल.

बॉक्स

शाळा बंद आहे, तर अभ्यास कशासाठी?

- शाळा बंद असल्याने मुले स्वैर बनली आहेत. शाळा बंद आहे, तर अभ्यास कशासाठी हा त्यांचा प्रश्न पालकांना निरुत्तर करीत आहे.

- सकाळी उशिरापर्यंत झोपायचे, निवांत आवराआवर करायची आणि टिव्हीसमोर ठाण मांडायचे हे त्यांचे दैनंदिन वेळापत्रक आहे.

- कामावर जाणाऱ्या पालकांची मुले तर आणखी निवांत आहेत. मोबाईल आणि टिव्ही हेच त्यांचे वर्गमित्र ठरले आहेत.

- काही सजग पालकांनी मुलांचा अभ्यासाशी संपर्क कायम ठेवला आहे. त्यांचे किमान प्राथमिक शिक्षण सुरू राहील याची दक्षता घेतली आहे.

- मोठ्या भाऊ-बहिणीच्या ऑनलाईन शिक्षणातूही काही मुले शिक्षणाचे थोडेफार धडे घेत आहेत.

बॉक्स

पहिलीची ओळखच नाही, अन थेट दुसरीच्या वर्गात

- लॉकडाऊनमुळे वर्षभर शाळा बंद राहिली. मुलांना परीक्षा न घेताच थेट वरच्या वर्गात वर्गोन्नत करण्यात आले.

- गेल्या मार्चमध्ये पहिलीत प्रवेश घेतलेली मुले यामुळे प्रत्यक्ष शाळेत जाऊ शकली नाहीत, यंदा त्यांना थेट दुसरीत प्रवेश मिळाला आहे.

- पहिली-दुसरीत अक्षरओळख होते, पण शाळा बंद असल्याने अबकड आणि एबीसीडी मुलांच्या डोक्यात शिरलेली नाही.

कोट

शाळा सुरू असताना सकाळी-संध्याकाळी तास-दोन तास मुलांचा अभ्यास घेत होते. पण गेले दीड वर्ष मुले घरीच आहेत. त्यांचे दैनंदिन वेळापत्रक विस्कटले आहे. दिवसभर खेळण्याने अभ्यासाकडे लक्ष नसते.

- कविता मगदूम, मिरज

शासनाने कोरोनाची तीव्रता कमी असलेल्या गावांत वर्ग सुरू करावेत. रविवार वगळता अन्य सर्व सुट्ट्या रद्द कराव्यात. सुट्टीचे दीड वर्ष भरून काढावे. मुलांचे शैक्षणिक नुकसान न भरून येणारे आहे.

- अशोक रणदिवे, माधवनगर.

पॉईंटर्स

वर्गनिहाय विद्यार्थी

पहिली ३९,५२६, दुसरी ४२,६२७, तिसरी ४३,६५८, चौथी ४३,६१५

-