शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

शाळांची घंटा वाजणार ग्रामपंचायत, पालकांच्या एनओसीनंतरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:17 IST

फोटो ११ गिरीश रजपूत फोटो ११ सीमा शेटे फोटो ११ जितेंद्र डुडी लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या दीड ...

फोटो ११ गिरीश रजपूत

फोटो ११ सीमा शेटे

फोटो ११ जितेंद्र डुडी

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गेल्या दीड वर्षापासून सक्तीची सुट्टी अनुभवणारे विद्यार्थी आता शाळा सुरु होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. शासनाने शाळा सुरु करण्यासाठी परवानगी दिली असली तरी अंतिम निर्णय ग्रामपंचायत आणि पालकांवर सोपवला आहे. त्यांनी ना हरकत दिली तरच शाळेची घंटा वाजणार आहे.

कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. या लाटेत लहानग्यांना अधिक धोका संभवतो, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. फेब्रुवारीमध्ये दुसरी लाट सुरु होऊन जुलै उजाडला तरी कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे शाळा आणखी किती दिवस बंद ठेवायच्या, हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. मुलांसोबतच शिक्षकदेखील घरात थांबून वैतागल्याचे चित्र आहे. शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्यासंदर्भात पालकांकडून ऑनलाईन प्रतिक्रिया मागवल्या आहेत. आतापर्यंतच्या प्रतिसादानुसार ८० टक्क्यांहून अधिक पालकांनी शाळा सुरु कराव्यात, अशी भूमिका घेतली आहे.

कोरोनाचा धोका पाहता शाळांचा निर्णय ग्रामपंचायतींकडेच आहे. गेल्या महिन्याभरात ज्या गावात कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडलेला नाही, तेथेच शाळा सुरु कराव्यात, अशी सूचना दिली आहे. त्यासाठी ग्रामपंचायत व पालकांनीही होकाराची पत्रे देणे आवश्यक आहे.

बॉक्स

साडेतीन हजार शाळांना प्रतीक्षा

- जिल्ह्यातील शासकीय, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित अशा सर्वच म्हणजे सुमारे साडेतीन हजार शाळांना घंटा वाजण्याची प्रतीक्षा आहे.

- जिल्हा परिषदेच्या १ हजार ६८८ प्राथमिक शाळा ग्रामीण भागात आहेत, मात्र दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातच संसर्ग जास्त असल्याने शाळा चिंतेत आहेत.

- शहरी भागात विशेषत: महापालिका क्षेत्रात लोकसंख्येच्या तुलनेने रुग्णसंख्या नाममात्र आहे, त्यामुळे तेथे शाळा सुरु करण्यासाठी पालकांचा दबाव आहे.

बॉक्स

जिल्ह्यात कोरोनामुक्त गावांची संख्या फक्त १७० आहे, तेथे शाळा सुरु होऊ शकतात. पण अद्याप ग्रामपंचायतींनी होकारात्मक ठराव दिलेले नाहीत. उर्वरित ५३० गावांमध्ये सक्रिय रुग्ण असल्याने तेथे शाळा सुरु होऊ शकणार नाहीत. महापालिका क्षेत्रातही सक्रिय रुग्ण आहेत.

कोट

कधी एकदा शाळा सुरु होतेय...

दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने मुलांचे न भरुन येणारे शैक्षणिक नुकसान होत आहे. ऑनलाईन शिक्षण सुरु असले तरी शाळेसारखा अभ्यास होत नाही. कोरोनारुग्णांची संख्या कमी असलेल्या ठिकाणी काळजी घेत शाळा सुरु करायला हव्यात. रुग्ण सापडल्यास काटेकोर कारवाई करावी. संसर्ग फैलावू नये, याची दक्षता घ्यावी.

- गिरीश रजपूत, सांगली, पालक

मुलांना घरात शिकवण्यावरही मर्यादा येतात. दीड वर्षापासून सतावणारा कोरोना कधी आटोक्यात येईल, हे कोणालाच माहिती नाही. या स्थितीत कोरोनासोबतच जगायला शिकूया. संसर्ग टाळण्याचे काटेकोर प्रयत्न करत शाळा सुरु कराव्यात. प्राथमिक शिक्षणाअभावी या पिढीचा शैक्षणिक पाया ठिसूळ बनण्याचा धोका आहे.

- सीमा अविनाश शेटे, पालक, सांगली.

१७० गावे कोरोनामुक्त

सध्या जिल्ह्यातील १७० गावे पूर्णत: कोरोनामुक्त आहेत. तेथे एकही नवा किंवा सक्रिय कोरोनारुग्ण नाही. अर्थात ही गावे दररोजच कोरोनामुक्त राहतील, असे नाही. बाहेरील संसर्गामुळे कोणीतरी कोरोनाबाधित होऊ शकतो, त्यामुळे हा आकडा कमी-जास्त होऊ शकतो. वाळवा, कडेगावमध्ये रुग्णसंख्या जास्त आहे. या स्थितीतही मॉडेल स्कूलसारख्या प्रकल्पांना गती देण्याचा प्रयत्न आहे.

- जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.

पॉईंटर्स

जिल्ह्यातील एकूण शाळा २८२१

शासकीय १६८८

अनुदानित ८१४

विनाअनुदानित ३१९

जिल्ह्यातील एकूण गावे ७३५

सध्या कोरोनामुक्त असलेली गावे १७०

तालुकानिहाय कोरोनामुक्त गावे

मिरज ८, जत ७१, कडेगाव ६, खानापूर ९, कवठेमहांकाळ १६, शिराळा २६, तासगाव ८, पलूस ९, आटपाडी ११, वाळवा ६