शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

सांगलीकरांचा ‘लॅण्डलाईन’ला रामराम!

By admin | Updated: December 26, 2014 23:47 IST

मोबाईलचा परिणाम : आठ वर्षांत एक लाख दूरध्वनी संच घटले

नरेंद्र रानडे- सांगली -मोबाईलच्या आक्रमणामुळे सांगली जिल्ह्यात आठ वर्षांत भारत संचार निगमच्या (बीएसएनएल) दूरध्वनीची (लॅण्डलाईन) संख्या वेगाने घसरली आहे. २००६-०७ मध्ये जिल्ह्यात १ लाख ७४ हजार ४२३ ग्राहकांकडे दूरध्वनी संच होता; परंतु ‘कर लो दुनिया मुठ्ठीमे’ म्हणत आलेल्या मोबाईलच्या झंझावातामुळे सध्या केवळ ७४ हजार ७६६ ग्राहकांकडेच दूरध्वनीचा संच राहिला आहे. भारतात दूरध्वनीचे आगमन १८८२ मध्ये झाले. परंतु त्याचा वापर अत्यंत मर्यादित होता. १९८१ च्या सुमारास खऱ्याअर्थाने दूरध्वनीच्या वापरास सुरुवात झाली. त्याकाळी चाळीत अथवा सदनिकेत एखाद्याच घरी संच असे. कालांतराने बहुतांशी मध्यमवर्गींयांच्या घरी हमखास ‘दूरध्वनी’ संच दिसू लागला. कालांतराने भ्रमणध्वनी संच (मोबाईल) आल्याने दूरध्वनी संचाची उपयुक्तता कमी होत गेली. अनेकांनी दूरध्वनीची कनेक्शन बंद करून मोबाईल जवळ केला. सांगली जिल्ह्यात आठ वर्षांत मोबाईल कनेक्शनच्या संख्येत वेगाने वाढ होत गेली आणि दूरध्वनी संच घटले. मात्र घरी दूरध्वनी संच घेतल्याशिवाय ब्रॉडबँडची सेवा मिळत नसल्याने अनेकांनी नाईलाजाने घरी दूरध्वनी संच केवळ ‘इनकमिंग’साठीच वापरण्यास प्रारंभ केला आहे. एसटीडी दूरध्वनी संच सेवा ज्या पध्दतीने कालबाह्य झाली, त्याच मार्गावर सध्या दूरध्वनी संचाची वाटचाल सुरू असल्याचे आठ वर्षांतील आकडेवारीवरून दिसते. ग्राहक संख्या वर्षदूरध्वनी मोबाईल २००६-०७१७४४२३६६९१२२००७ -०८१५६५७६ ८७६६६२००८-०९१३२५३९११०६२३२००९-१०११७९५०१२८३८६२०१०-१११०४६४२१६०८६०२०११-१२ ९५९२४१५१६२६२०१२-१३ ८४४२४१६७१७२२०१३-१४ ७४६५७१६२४९३ब्रॉडबँडचे ग्राहक वाढलेइंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे ब्रॉडबँड कनेक्शनच्या संख्येत वाढ झाली आहे. २००६-०७ मध्ये ९२५ दूरध्वनी संच असणाऱ्यांनी ब्रॉडबँडचे कनेक्शन घेतले होते, तर २०१३-१४ मध्ये १६ हजार ३९२ इतकी संख्या झाल्याचे सांगितले.